अमित शहांच्या महाराष्ट्रातील सर्व सभा रद्द

  73

नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात ४ सभा प्रस्तावित होत्या. या सभांसाठी अमित शहा शनिवारी संध्याकाळी नागपुरात पोहोचले होते. मात्र अचानक काही कारणांमुळे रविवारी सकाळी अमित शहा यांनी ४ बैठका रद्द करून तत्काळ दिल्लीला रवाना झाले. दरम्यान सभा रद्द करण्याचे नेमके कारण काय, याबाबत कुठलीही अधिकृत माहिती पुढे आलेली नाही.



भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे राजकीय वर्तुळात गेम चेंजर मानले जातात. त्यामुळे अमित शहा यांच्या निवडणुकीतील राज्यांतील उपस्थितीचे वेगळेच महत्त्व आहे. परिणामी महाराष्ट्रातील विदर्भातील वर्धा, सावनेर, काटोल आणि गडचिरोली येथे रविवारी अमित शहांच्या एकूण ४ सभा नियोजित होत्या. या सभांसाठी अमित शहा शनिवारी (१६ नोव्हेंबर) संध्याकाळी नागपुरात पोहोचले. नागपुरातील हॉटेल रेडिसन ब्लू येथे त्यांनी भाजपचे महत्त्वाचे अधिकारी आणि बड्या नेत्यांशी चर्चा केली. यानंतर अमित शहा यांनी स्थानिक संपादकांची भेट घेतली. मात्र रविवारी सकाळी अचानक या सर्व सभा रद्द करून अमित शहा दिल्लीला रवाना झाले. अमित शाह कुठल्या कारणामुळे अचानक दिल्लीला रवाना झालेत, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु, मणिपूरमध्ये पुन्हा भडकलेल्या हिंसाचारामुळे अमित शहांना दिल्लीत परतावे लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान अमित शहांऐवजी आता केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान आणि स्मृती इराणी या सभांना संबोधित करणार आहेत. यासोबतच नागपूर शहरात काँग्रेस नेत्या प्रियांका वड्रा यांच्या दोन रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. याला काऊंटर करण्यासाठी भाजपने हिमाचल प्रदेशच्या खासदार कंगना राणावत यांचा रोड शो आयोजित केला आहे.
Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या