नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात ४ सभा प्रस्तावित होत्या. या सभांसाठी अमित शहा शनिवारी संध्याकाळी नागपुरात पोहोचले होते. मात्र अचानक काही कारणांमुळे रविवारी सकाळी अमित शहा यांनी ४ बैठका रद्द करून तत्काळ दिल्लीला रवाना झाले. दरम्यान सभा रद्द करण्याचे नेमके कारण काय, याबाबत कुठलीही अधिकृत माहिती पुढे आलेली नाही.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे राजकीय वर्तुळात गेम चेंजर मानले जातात. त्यामुळे अमित शहा यांच्या निवडणुकीतील राज्यांतील उपस्थितीचे वेगळेच महत्त्व आहे. परिणामी महाराष्ट्रातील विदर्भातील वर्धा, सावनेर, काटोल आणि गडचिरोली येथे रविवारी अमित शहांच्या एकूण ४ सभा नियोजित होत्या. या सभांसाठी अमित शहा शनिवारी (१६ नोव्हेंबर) संध्याकाळी नागपुरात पोहोचले. नागपुरातील हॉटेल रेडिसन ब्लू येथे त्यांनी भाजपचे महत्त्वाचे अधिकारी आणि बड्या नेत्यांशी चर्चा केली. यानंतर अमित शहा यांनी स्थानिक संपादकांची भेट घेतली. मात्र रविवारी सकाळी अचानक या सर्व सभा रद्द करून अमित शहा दिल्लीला रवाना झाले. अमित शाह कुठल्या कारणामुळे अचानक दिल्लीला रवाना झालेत, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु, मणिपूरमध्ये पुन्हा भडकलेल्या हिंसाचारामुळे अमित शहांना दिल्लीत परतावे लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान अमित शहांऐवजी आता केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान आणि स्मृती इराणी या सभांना संबोधित करणार आहेत. यासोबतच नागपूर शहरात काँग्रेस नेत्या प्रियांका वड्रा यांच्या दोन रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. याला काऊंटर करण्यासाठी भाजपने हिमाचल प्रदेशच्या खासदार कंगना राणावत यांचा रोड शो आयोजित केला आहे.
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले? मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक…
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…