मविआला धडा शिकवण्याची वेळ आली- जे.पी.नड्डा

नाशिक : राजकीय स्वार्थासाठी काँग्रेस पक्ष देशविरोधी, विभाजनवादी शहरी नक्षलवाद्यांच्या आश्रयाला जाऊन बसला आहे. बाळासाहेब ठाकरेंची प्रखर राष्ट्रवादाची विचारसरणी गुंडाळून उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे. अशा उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला आता चांगला धडा शिकवीण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी येथे केले.


भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर आयोजित विशेष निमंत्रितांसाठी प्रज्ञावंत मेळाव्यात मंत्री नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत विकसित भारत विकसित महाराष्ट्र या विषयावर श्री तेज गार्डन व बँक्वेट हॉल येथे मार्ग दर्शन केले. व्यासपीठावर माजी मंत्री भारती पवार, आ.देवयानी फरांदे, सीमा हिरे, शहर अध्यक्ष प्रशांत जाधव, प्रदीप पेशकर, गुजरत आ.अमित ठाकर, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, जिल्हा ध्यक्ष शंकर वाघ, सुनिल बच्छाव, आशीष नहार, प्रकाश लोंढे, रंजन ठाकरे, गिरीश पालवे आदी उपस्थित होते.


नड्डा यांनी अभियंते, सनदी लेखापाल, डॉक्टर आदी विविध क्षेत्रातील व्यावसायिकांशी संवाद साधताना हे आवाहन केले. नड्डा यांनी देशातील विभाजनवादी शक्तींना शहरी नक्षलवादी टोळीकडून कशा प्रकारे सहाय्य मिळत आहे याचे विस्ताराने विवेचन केले. महाराष्ट्र ही क्रांतिकारकांची, समाजसुधारकांची भूमी आहे, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा मोदी सरकारचा निर्णय दूरगामी परिणाम करणारा ठरला आहे. मराठी सारख्या वैभवशाली परंपरा असलेल्या भाषेतील संंतांनी, साहित्यिकांनी भारताच्या सांस्कृतिक, अध्यात्मिक परंपरेची सामान्य माणसाला ओळख करून देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.


कार्यक्रमास व्यापारी, उद्योग व्यवसायिक, राजस्थानातून आलेले व्यवसायिक, चित्रपट, वैद्यकीय, कायदा व सुव्यवस्था क्षेत्रातील ज्येष्ठ विधीज्ञ, माजी सैनिक, शिक्षक, अभियंता, जैन समाजातील श्रेष्ठी उपस्थीत होते.



पाचव्या क्रमांकाची मजबूत अर्थव्यवस्था


जगात भारतााची पाचव्यां क्रमांकाची मजबूत अर्थव्यवस्था बनली आहे, लवकरच तिसऱ्या क्रमांकावर येणार आहे. या उलट १० वर्षांपूर्वी देशात घराणेशाही, भ्रष्टाचार याला प्रतिष्ठा मिळाली होती. राजकीय स्वार्थासाठी धर्म, राज्य, भाषा यांच्या आधारे जनतेला एकमेकांविरुद्ध झुंजवत ठेवले जात होते. मोदी यांनी पंतप्रधान झाल्यावर राजकारणाला विकासाची, उत्तरदायित्वाची, गरिबांच्या सेवेची भाषा केली. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने आपल्या कामगिरीचे प्रगती पुस्तक वारंवार जनतेपुढे ठेवलेच पाहिजे आपल्या प्रगती पुस्तकाबरोबरच पंतप्रधानांनी भविष्यकाळात देशाची वाटचाल कशी असेल हे स्पष्ट करणारी धोरणेही जनतेपुढे नियमित रूपाने मांडली. यामुळे देशाची राजकीय, संस्कृती आमूलाग्र बदलली. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ नावाची नवी राजकीय संस्कृती जन्माला आली असे नड्डा म्हणाले.

Comments
Add Comment

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर

Congress: काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर, नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचले, बैठकीत नेमकं घडलं काय?

दिल्ली: चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातील राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ