UP Accident : लग्नाची मिरवणूक जीवावर बेतली! अपघातात वधू-वरासह ७ जणांचा मृत्यू

उत्तरप्रदेश : उत्तर प्रदेशातील (UP Accident) बिजनौर येथे झालेल्या भीषण अपघातात वधू-वरासह सात जणांचा मृत्यू झाला आहे. लग्नानंतर लग्नाची मिरवणूक (Marriage Function) वधूसोबत परतत असताना हा भीषण अपघात घडला. यानंतर सर्व परिसरातून हळहळ व्यक्त होत असताना उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमध्ये लग्न आटोपून संपूर्ण कुटुंब ऑटोने बिजनौर येथील आपल्या घरी परतत असताना हा अपघात झाला. धामापूर पोलीस ठाणे हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर कार आणि टेम्पोमध्ये जोरदार धडक झाली. या भीषण धडकेत टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडला. टेम्पोमध्ये प्रवास करणाऱ्या वधू-वर आणि कुटुंबातील सहा सदस्यांचाही जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर उपचारादरम्यान टेम्पो चालकाचाही मृत्यू झाला.



मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली दखल


बिजनौर जिल्ह्यातील रस्ते अपघाताची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दखल घेतली आहे. मुख्यमंत्री योगी यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे. तसेच अपघातामधील इतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Comments
Add Comment

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.

Days In February : फेब्रुवारी महिन्यात 'इतके' दिवस बँका राहणार बंद! राज्यानुसार यादी जाहीर; पहा संपूर्ण वेळापत्रक

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) दरवर्षी बँकांच्या सुट्ट्यांची अधिकृत यादी जाहीर करत असते, ज्यामध्ये देशभरातील सार्वजनिक