Solapur: सोलापूर विद्यापीठालाही २० नोव्हेंबरला सुट्टी

सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला विधानसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी म्हणजेच २० नोव्हेंबरला सुटी राहील, असे प्र कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. याशिवाय संलग्नित उच्च महाविद्यालयांनाही त्या दिवशी सुटी असणार आहे. त्यानंतर २६ नोव्हेंबरपासून विद्यापीठाची सत्र परीक्षा सुरु होणार आहे. विद्यापीठाला सुटी देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश बंधनकारक असतात, पण तसे आदेश नसल्याने केवळ २० नोव्हेंबरलाच विद्यापीठ व संलग्नित उच्च महाविद्यालयांनाही सुट्टी असणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला (बुधवारी) जिल्ह्यातील तीन हजार ७२३ केंद्रांवर मतदान होत आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १३५९ शाळांमध्ये अडीच हजार मतदान केंद्रे आहेत. दुसरीकडे बहुतेक शिक्षकांना इलेक्शन ड्यूटी असल्याने १९ व २० नोव्हेंबरला जिल्हा परिषदेच्या शाळांसह खासगी प्राथमिक शाळांना सुटी असणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशावरून प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व शाळांसाठी तसे आदेश काढले आहेत.विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यांमुळे ज्या ठिकाणी शाळा भरविणे शक्य नसेल, त्या ठिकाणी संबंधित खासगी प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी १९ व २० नोव्हेंबर रोजी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय त्यांच्या स्तरावर घ्यावा, असे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तर जिल्हा परिषदेच्या शाळांसाठीही हा निर्णय लागू असणार आहे.



पण, ज्या शाळांमधील शिक्षकांना विशेषत: दिव्यांग किंवा ५३ वर्षांवरील शिक्षकांना इलेक्शन ड्यूटी आलेली नाही आणि त्या शाळेत मतदान केंद्र देखील नाही, अशा शाळा सुरु ठेवता येतील, असेही शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. रविवारी १७ नोव्हेंबरला शाळांना सुटी असणार आहे आणि त्यानंतर मंगळवार व बुधवारी देखील मतदानामुळे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे बहुतेकजण सोमवारी एक दिवस शाळेत येण्यापेक्षा रजाच घेतील, अशी शक्यता आहे.

Comments
Add Comment

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील