Solapur: सोलापूर विद्यापीठालाही २० नोव्हेंबरला सुट्टी

  51

सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला विधानसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी म्हणजेच २० नोव्हेंबरला सुटी राहील, असे प्र कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. याशिवाय संलग्नित उच्च महाविद्यालयांनाही त्या दिवशी सुटी असणार आहे. त्यानंतर २६ नोव्हेंबरपासून विद्यापीठाची सत्र परीक्षा सुरु होणार आहे. विद्यापीठाला सुटी देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश बंधनकारक असतात, पण तसे आदेश नसल्याने केवळ २० नोव्हेंबरलाच विद्यापीठ व संलग्नित उच्च महाविद्यालयांनाही सुट्टी असणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला (बुधवारी) जिल्ह्यातील तीन हजार ७२३ केंद्रांवर मतदान होत आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १३५९ शाळांमध्ये अडीच हजार मतदान केंद्रे आहेत. दुसरीकडे बहुतेक शिक्षकांना इलेक्शन ड्यूटी असल्याने १९ व २० नोव्हेंबरला जिल्हा परिषदेच्या शाळांसह खासगी प्राथमिक शाळांना सुटी असणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशावरून प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व शाळांसाठी तसे आदेश काढले आहेत.विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यांमुळे ज्या ठिकाणी शाळा भरविणे शक्य नसेल, त्या ठिकाणी संबंधित खासगी प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी १९ व २० नोव्हेंबर रोजी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय त्यांच्या स्तरावर घ्यावा, असे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तर जिल्हा परिषदेच्या शाळांसाठीही हा निर्णय लागू असणार आहे.



पण, ज्या शाळांमधील शिक्षकांना विशेषत: दिव्यांग किंवा ५३ वर्षांवरील शिक्षकांना इलेक्शन ड्यूटी आलेली नाही आणि त्या शाळेत मतदान केंद्र देखील नाही, अशा शाळा सुरु ठेवता येतील, असेही शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. रविवारी १७ नोव्हेंबरला शाळांना सुटी असणार आहे आणि त्यानंतर मंगळवार व बुधवारी देखील मतदानामुळे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे बहुतेकजण सोमवारी एक दिवस शाळेत येण्यापेक्षा रजाच घेतील, अशी शक्यता आहे.

Comments
Add Comment

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती