Pollution : मुंबईत प्रदूषणाचा विळखा कायम; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल

मुंबई : मुंबईत प्रदूषणाचा (Pollution) विळखा कायम असून, मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल असल्याचे दिसत आहे.


गेल्या आठवड्यात मुंबईतील काही भागात हवेचा स्तर अतिशय वाईट (Pollution) झाला होता. शिवडी, वरळी, बीकेसी, भायखळा या भागातील हवेची गुणवत्ता खालावली होती. याची दखल घेऊन गेल्या आठवड्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई महानगरातील महापालिकांच्या प्रमुखांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत प्रदूषणाबाबत उपाययोजना करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. विभाग कार्यालयातील बहुतांशी कर्मचारी सध्या निवडणुकीच्या कामावर गेले असल्यामुळे या उपाययोजना सुरू करणे सहाय्यक आयुक्तांना अवघड झाले आहे.



मुंबईतील हवामानाचा स्तर (Pollution) गेल्या काही दिवसापासून बिघडत चाललेला असला तरी गेल्यावर्षीप्रमाणे यंदा पालिकेने प्रदूषणावरील उपाययोजना करण्यास अद्याप सुरूवात केलेली नाही. गेल्याच आठवड्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकांच्या प्रमुखांशी एक बैठक आयोजित केली होती व उपयायोजना करण्याबाबत सूचनाही केल्या होत्या. मात्र या उपाययोजना करण्यासाठी निवडणुकीच्या कामामुळे मनुष्यबळच नसल्याची मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयातील स्थिती आहे.


त्यामुळे प्रदूषण (Pollution) थांबवणाऱ्या उपाययोजना करण्यासाठी निवडणुकीनंतरचाच मुहूर्त मिळणार आहे. त्यामुळे निवडणूक होईपर्यंत मुंबईकरांना प्रदूषित वातावरणाचा त्रास सोसावा लागणार आहे. गेल्या दोन तीन वर्षांपासून हिवाळ्याची चाहूल लागताच मुंबईतील हवेचा स्तर बिघडत आहे.

Comments
Add Comment

अवयव प्रत्यारोपणासाठी देशव्यापी एकसमान धोरणाचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

दानकर्त्यांची प्रत्यारोपणानंतर वैद्यकीय काळजी बंधनकारक… मुंबई : देशभर अवयव प्रत्यारोपणासाठी एकसमान व

मालाड, कांदिवली, माटुंगा, परळमधील उद्याने, क्रीडांगणाचा होणार विकास

महापालिकेने मागवली २६ कोटींची निविदा मुंबई (खास प्रतिनिधी) : मालाड (पूर्व), येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे

मुंबईत २०० पेक्षा वायू गुणवत्ता निर्देशांक असल्यास उद्योग आणि बांधकामे बंद करा

महापालिका आयुक्त अश्विनी जोशी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्यांचा गय

मुंबईत निवडणुकीची चाहूल; राज्य सरकारचा पुनर्विकासाला चालना देणारा मोठा निर्णय

मुंबई : मुंबईतील बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच राज्य सरकारने नागरिकांना थेट लाभ

मुंबईकर गारठले; थंडीमुळे पारा १६.२ अंशावर !

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत हिवाळ्याची चाहूल

मुंबईत बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार ; कारमध्ये झाडल्या गोळ्या

मुंबई : मुंबईत भर दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवली चारकोप परिसरातील एका व्यावसायिकांवर हल्ला झाला.