Maharashtra Assembly Election: मतदानाच्या दिवशी मासेमारी बंद ठेवण्याच्या मच्छिमारांना सूचना

  64

रत्नागिरी: विधानसभा निवडणुकीसाठी(Maharashtra Assembly Election) येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ते २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मासेमारी बंद ठेवण्याच्या मच्छिमारांना सूचना देण्यात आल्या आहेत.


जिल्ह्यातील सर्व मच्छीमार नौका बंदरांमध्ये ठेवण्याबाबत आणि मच्छीमारीशी संबंधित कोणतीही कामकाज न करण्याबाबत सर्व मच्छीमार सहकारी संस्थांमार्फत मच्छीमार नौका मालकांना सूचना देण्यात आली आहे, अशी माहिती सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय आनंद पालव यांनी दिली.



मासळी उतरविण्याच्या केंद्रावर नेमणूक करण्यात आलेले सुरक्षा रक्षक व सागर मित्र यांच्यामार्फत मतदानादिवशी देखरेख ठेवण्यात येणार आहे. याबाबत जिल्ह्यातील सर्व मच्छिमारी संस्थांची दूरदृश्यप्रणालीद्वारे १३ नोव्हेंबर रोजी बैठक घेऊन सूचना देण्यात आली आहे. मतदान केल्याशिवाय कोणतीही नौका मासेमारीस जाणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सर्व मच्छिमारांना माहिती देण्याबाबत कळविण्यात आले आहे.


Comments
Add Comment

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय, पुण्यात 27 ते 6 तारखेपर्यंत दारू बंदी

पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दारूबंदीचा निर्णय घेतला आहे. पुण्यात २७ ते ६

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड, पालिकेआधी भाजपचा मोठा निर्णय, कोण आहेत अमित साटम?

मुंबई पालिका निवडणुकीच्याआधी भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड झाली आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांची नाराजी, बैठकीला शिंदे उपस्थित नसल्याची माहिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत असताना

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी