जोहान्सबर्ग: भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात धावांचा डोंगर उभा केला आहे. संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांच्या शानदार शतकांच्या जोरांवर भारताने आफ्रिकेविरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करताना तब्बल २८३ धावा केल्या.
संपूर्ण २० षटकांच्या खेळादरम्यान आफ्रिकेला केवळ भारताचा एकच गडी बाद करता आला. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा दोन्ही सलामीसाठी आले होते. मात्र अभिषेक शर्माला ३६ धावाच करता आल्या. त्यानंतर तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांनी जबरदस्त खेळी करताना भारताला अडीचशे पार धावा करून दिल्या.
गेल्या दोन सामन्यात निराशाजनक खेळी केलेल्या संजू सॅमसनने या सामन्यात शानदार शतक ठोकले. त्याने ५६ बॉलमध्ये ६ चौकार आणि ९ षटकार ठोकत १०९ धावांची नाबाद खेळी केली. त्यानंतर तिलक वर्माने नाबाद १२० धावा तडकावल्या. त्याने ४७ बॉलमध्ये ९ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने ही खेळी साकारली.
चार सामन्यांच्या भारतीय संघ सध्या २-१ने आघाडीवर आहे. त्यामुळे हा सामना जिंकत भारतीय संघ मालिका जिंकण्यांसाठी पुरेपूर प्रयत्न करेल.