शिर्डी : कोविड संकट काळात शिर्डीतील (Shirdi) साई मंदिरात (Sai temple) फुले नेण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र, ती बंदी सुरूच राहिल्याने फुल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांना मोठा फटका बसला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने ही फुल हार बंदी उठविण्याचा निर्णय गुरूवारी घेतला. यामुळे फुल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याचे मोठे यश मानले जात आहे.
कोविड काळात सन २०२३ मध्ये साई मंदिरात फुले नेण्यास बंदी घालण्यात आली होती. स्थानिक फुल उत्पादक शेतक-यांनी या बंदी विरोधात याचिका दाखल केली होती. तसेच, यासंदर्भात शासन स्तरावरही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून या प्रश्नाचा पाठपुरावा सुरु होता. संस्थानवर कार्यरत असलेल्या त्रिसदस्यीय समितीकडे याबाबतची मागणी करण्यात येत होती. मात्र, निर्णय होत नसल्यामुळे फुल उत्पादक शेतकरी अनुक्रमे कचेश्वर चौधरी, अर्जुनराव चौधरी, संदिप गोर्डे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
तर साईबाबा संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीने १३ एप्रिल २०२३ रोजी ठराव करुन, कर्मचारी पतपेढीच्या माध्यमातून रास्त दरात फुल विक्री करण्याची परवानगी मिळावी असे म्हणणे न्यायालयात मांडले होते. यापुर्वीही या प्रकरणाची सुनावणी उच्च तसेच सर्वोच्च न्यायालयात झालेली होती. फुल उत्पादक शेतकरी तसेच फुल उत्पादक तसेच विक्रेत्यांच्या मागणीची सामाजिक दृष्टीकोनातून विचार होण्यासाठी मंत्री विखे पाटील यांनी सर्वच स्तरांवर आपला पाठपुरावा सुरुच ठेवला होता.
साईबाबा विश्वस्त व्यवस्थापन समितीकडून एक ठराव उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला होता. तसेच संभाजीनगर येथील उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होवून न्यायालयाने श्री. साईबाबा मंदिर व परिसरामध्ये फुले विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय दिल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. या सुनावणी प्रसंगी फुल उत्पादक शेतक-यांच्या वतीने जेष्ठ विधीज्ञ विनायकराव होन, संस्थानच्या वतीने विधीज्ञ बजाज आणि शासनाच्या वतीने विधीज्ञ सुभाष तांबे यांनी बाजू मांडली.
दरम्यान, या झालेल्या निर्णयाबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ सुजय विखे पाटील यांचे फुल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांनी अभिनंदन करून जल्लोष केला.शिर्डी शहरात फटाक्यांची अतिषबाजी करून या निर्णयाचे स्वागत केले. फुल विक्रेत्यांनी मंत्री विखे यांचे शिर्डी (Shirdi) विमानतळावर जल्लोषात स्वागत करून त्यांचे आभार मानले.
मंदिर (Shirdi)आणि परिसरात फुल विक्रीबाबत उच्च न्यायालयाने निर्णयाचे आपण स्वागत करीत असून,या निर्णयामुळे तालुक्यातील फुल उत्पादक शेतक-यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मागील काही वर्षात फुल उत्पादक शेतक-याचे झालेल्या आर्थिक नकसानीचे गांभीर्य न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. यासाठी करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…
मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण…
हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…
वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…