Shirdi : साई मंदिरातील फुल-हार बंदी उठवली

  104

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपुर्ण निर्णय


मंत्री विखे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश


शिर्डी : कोविड संकट काळात शिर्डीतील (Shirdi) साई मंदिरात (Sai temple) फुले नेण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र, ती बंदी सुरूच राहिल्याने फुल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांना मोठा फटका बसला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने ही फुल हार बंदी उठविण्याचा निर्णय गुरूवारी घेतला. यामुळे फुल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याचे मोठे यश मानले जात आहे.


कोविड काळात सन २०२३ मध्ये साई मंदिरात फुले नेण्यास बंदी घालण्यात आली होती. स्थानिक फुल उत्पादक शेतक-यांनी या बंदी विरोधात याचिका दाखल केली होती. तसेच, यासंदर्भात शासन स्तरावरही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून या प्रश्नाचा पाठपुरावा सुरु होता. संस्थानवर कार्यरत असलेल्या त्रिसदस्यीय समितीकडे याबाबतची मागणी करण्यात येत होती. मात्र, निर्णय होत नसल्यामुळे फुल उत्पादक शेतकरी अनुक्रमे कचेश्वर चौधरी, अर्जुनराव चौधरी, संदिप गोर्डे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.


तर साईबाबा संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीने १३ एप्रिल २०२३ रोजी ठराव करुन, कर्मचारी पतपेढीच्या माध्यमातून रास्त दरात फुल विक्री करण्याची परवानगी मिळावी असे म्हणणे न्यायालयात मांडले होते. यापुर्वीही या प्रकरणाची सुनावणी उच्च तसेच सर्वोच्च न्यायालयात झालेली होती. फुल उत्पादक शेतकरी तसेच फुल उत्पादक तसेच विक्रेत्यांच्या मागणीची सामाजिक दृष्टीकोनातून विचार होण्यासाठी मंत्री विखे पाटील यांनी सर्वच स्तरांवर आपला पाठपुरावा सुरुच ठेवला होता.


साईबाबा विश्वस्त व्यवस्थापन समितीकडून एक ठराव उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला होता. तसेच संभाजीनगर येथील उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होवून न्यायालयाने श्री. साईबाबा मंदिर व परिसरामध्ये फुले विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय दिल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. या सुनावणी प्रसंगी फुल उत्पादक शेतक-यांच्या वतीने जेष्ठ विधीज्ञ विनायकराव होन, संस्थानच्या वतीने विधीज्ञ बजाज आणि शासनाच्या वतीने विधीज्ञ सुभाष तांबे यांनी बाजू मांडली.


दरम्यान, या झालेल्या निर्णयाबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ सुजय विखे पाटील यांचे फुल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांनी अभिनंदन करून जल्लोष केला.शिर्डी शहरात फटाक्यांची अतिषबाजी करून या निर्णयाचे स्वागत केले. फुल विक्रेत्यांनी मंत्री विखे यांचे शिर्डी (Shirdi) विमानतळावर जल्लोषात स्वागत करून त्यांचे आभार मानले.


मंदिर (Shirdi)आणि परिसरात फुल विक्रीबाबत उच्च न्यायालयाने निर्णयाचे आपण स्वागत करीत असून,या निर्णयामुळे तालुक्यातील फुल उत्पादक शेतक-यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मागील काही वर्षात फुल उत्पादक शेतक-याचे झालेल्या आर्थिक नकसानीचे गांभीर्य न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. यासाठी करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले - मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Comments
Add Comment

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या