कणकवली : सिंधुदुर्गमध्ये काल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा (Maharashtra Election Sabha) झाली. या सभेनंतर सिंधुदुर्गमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या उपजिल्हाप्रमुखासह पदाधिका-यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश केल्याने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
आमदार नितेश राणे हे मुस्लिम समाजाच्या विरोधात नाहीत
सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख रज्जब रमदुल यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजपात प्रवेश केला. यावेळी रमदुल म्हणाले की, आमदार नितेश राणे हे मुस्लिम समाजाच्या विरोधात नाहीत तर जे चुकीचे कार्य करत आहेत, ज्या कारवाया होत आहेत आणि जे अतिक्रमण सुरु आहे त्याविरोधात नितेश राणे आहेत. कोकणातील मुस्लिम समाजाच्या लोकांना सर्वात जास्त आधार हा राणेंनी दिला आहे. त्यामुळे मुस्लिम समाज बहुसंख्येने नितेश राणे यांच्या सोबत असल्याची प्रतिक्रिया यावेळी रज्जब रमदुल यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, मी सुरुवातीपासूनच राणे कुटुंबाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता होतो. २००८ पासून स्वाभिमान संघटनेचे कार्य मी करत होतो. या ठिकाणी गेली १४ वर्ष राणे कुटुंबाशी मी एकनिष्ठ होतो. काही गैरसमज झाल्यामुळे मी वर्षभर पक्षापासून नितेश राणेंसोबत दूर गेलो आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केला. या एक वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा नितेश राणे यांनी माझ्याशी सतत संपर्क ठेवला. माझ्या सुखदुःखामध्ये साहेब नेहमी विचारपूस करायचे, ईद सणानिमित्त साहेब आशीर्वाद द्यायचे, धन्यवाद द्यायचे, फोन करून शुभेच्छा द्यायचे, माझ्यावर वैयक्तिक संकट आले असताना सुद्धा साहेबांनी धीर देण्याचा प्रयत्न केला आणि आज साहेबांची असलेली निष्ठा साहेबांवरती असलेल्या प्रेम आणि या निवडणुकीमध्ये साहेबांच्या निष्ठेमुळे प्रेमामुळेच या ठिकाणी आणि विकास कामांचा जोर साहेबांचा असल्यामुळे मी आज राणे कुटुंबामध्ये पुन्हा एकदा स्वगृही येण्याचा मी या ठिकाणी आज प्रयत्न केलेला आहे, असे ते म्हणाले.
कोकणातील मुस्लिम बांधवांना सर्वात जास्त आधार राणेसाहेबांचाच
कोकणातील मुस्लिम बांधवांना सर्वात जास्त आधार हा राणेसाहेबांनी दिलेला आहे आणि आजपर्यंत त्यांचा तो कायम आहे यामुळे राणे साहेबांची भूमिका ही पूर्ण मुस्लिम समाजाच्या विरोधात नसल्याने साहेबांना त्याची आम्हाला समजूत खात्री घातलेली आहे, त्यामुळे नक्कीच मुस्लिम समाज सुद्धा बहुसंख्येने साहेबांसोबत आज आहे, असे रमदुल यांनी सांगितले.
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…