INd vs PCB : भारतीय संघाच्या नकारानंतर पाकिस्तानचा थयथयाट; भारतामुळे पीसीबीला ५४८ कोटींचा फटका

इस्लामाबाद : पूर्वनियोजित रूपरेषेप्रमाणे पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स चषक (ICC Champions Trophy) स्पर्धेसाठी भारताने पाकिस्तानच्या भूमीत येण्यास नकार दिल्यानंतर (INd vs PCB) याचे विविध पडसाद क्रिकेट वर्तुळात उमटत आहेत. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाला मोठा फटका बसणार आहे. भारतीय व्यवस्थापनाची ही भूमिका कायम राहिल्यास पीसीबीला सुमारे ५४८ कोटी रुपयांचा फटका बसू शकतो.


पाकिस्तानला २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद जेव्हा जाहीर झाले, त्याचवेळी सहभागावरून गोंधळ उडणार, हे स्पष्ट झाले होते. हायब्रीड आयोजनाचा प्रस्ताव येणार, हे देखील साहजिक होते. याशिवाय, भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाणार नाही, हे स्पष्टच होते. बीसीसीआने आयसीसीला तसे कळवले आणि नंतर आयसीसीने ई मेल करून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला त्याची माहिती दिली.


आयसीसीने ICC Champions Trophy या स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ६५ मिलियन अमेरिकन डॉलर जाहीर केले होते. जर ही स्पर्धा (INd vs PCB) स्थगित झाली किंवा दुस-या देशात हलवण्यात आली, तर पाकिस्तानला ही रक्कम मिळणार नाही. भारतीय चलनात ही रक्कम ५४८ कोटींच्या घरात पोहोचते. शिवाय कराची, रावळपिंडी व लाहोर येथील स्टेडियमसाठी केला जाणारा खर्चही वाया जाण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

अमेरिका-व्हेनेझुएला यांच्यातील तणाव वाढला, अमेरिकेचा ड्रग्ज जहाजावर मोठा हल्ला

वॉशिंग्टन: अमेरिकेने व्हेनेझुएलाहून अमेरिकेकडे येत असलेल्या एका संशयित ड्रग्ज जहाजावर पुन्हा एकदा लष्करी

नेपाळमध्ये सुशीला सरकारचा मोठा निर्णय, आंदोलनादरम्यान प्राण गमावलेल्या Gen-Z ला मिळणार शहीदांचा दर्जा

काठमांडू: नेपाळमध्ये सुशीला कार्की सरकार स्थापन झाल्यानंतर देश हळूहळू आता स्थिरस्थावर होत आहे. सोमवारी सुशीला

नेपाळ, फ्रान्सनंतर आता इंग्लंडमध्ये निदर्शन रॅली, लाखो लोकं रस्त्यावर

लंडन: नेपाळ आणि फ्रान्सनंतर आता आंदोलनाचे वारे ब्रिटनच्या रस्त्यावर देखील दिसून आले आहे. सर्वात महत्वाचे

अमेरिका रशियावर कठोर निर्बंध लादणार

नाटोला चीनवर ५० ते १०० टक्के टॅरिफ लादण्याची मागणी वॉशिंग्टन डीसी (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

सुशीला कार्की नेपाळच्या नव्या हंगामी पंतप्रधान

नेपाळची संसद बरखास्त, हंगामी सरकारचे नेतृत्व करणार नवी दिल्ली : नेपाळमध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या

‘या’ देशातील ९९ टक्के लोक वापरत नाहीत सोशल मीडिया

इंटरनेट सुविधा अत्यंत मर्यादित नैरोबी : आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतो, ज्यात सोशल मीडियावर लोक