INd vs PCB : भारतीय संघाच्या नकारानंतर पाकिस्तानचा थयथयाट; भारतामुळे पीसीबीला ५४८ कोटींचा फटका

  38

इस्लामाबाद : पूर्वनियोजित रूपरेषेप्रमाणे पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स चषक (ICC Champions Trophy) स्पर्धेसाठी भारताने पाकिस्तानच्या भूमीत येण्यास नकार दिल्यानंतर (INd vs PCB) याचे विविध पडसाद क्रिकेट वर्तुळात उमटत आहेत. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाला मोठा फटका बसणार आहे. भारतीय व्यवस्थापनाची ही भूमिका कायम राहिल्यास पीसीबीला सुमारे ५४८ कोटी रुपयांचा फटका बसू शकतो.


पाकिस्तानला २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद जेव्हा जाहीर झाले, त्याचवेळी सहभागावरून गोंधळ उडणार, हे स्पष्ट झाले होते. हायब्रीड आयोजनाचा प्रस्ताव येणार, हे देखील साहजिक होते. याशिवाय, भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाणार नाही, हे स्पष्टच होते. बीसीसीआने आयसीसीला तसे कळवले आणि नंतर आयसीसीने ई मेल करून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला त्याची माहिती दिली.


आयसीसीने ICC Champions Trophy या स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ६५ मिलियन अमेरिकन डॉलर जाहीर केले होते. जर ही स्पर्धा (INd vs PCB) स्थगित झाली किंवा दुस-या देशात हलवण्यात आली, तर पाकिस्तानला ही रक्कम मिळणार नाही. भारतीय चलनात ही रक्कम ५४८ कोटींच्या घरात पोहोचते. शिवाय कराची, रावळपिंडी व लाहोर येथील स्टेडियमसाठी केला जाणारा खर्चही वाया जाण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Russia Ukraine War: रशियाचा युक्रेनवर ४० क्षेपणास्त्रे आणि ४०० ड्रोनचा भयंकर हल्ला!

रशियाचा युक्रेनवर ड्रोन, क्रूझ आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वर्षाव कीव्ह: रशियाने शुक्रवारी सकाळी

बांगलादेशमध्ये एप्रिल २०२६मध्ये होणार निवडणूक, मुहम्मद युनूस यांनी केली घोषणा

ढाका: बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद यूनुस यांनी देशातील पुढील राष्ट्रीय निवडणुकीची

या ठिकाणी पाच रुपयांचा पार्ले जी बिस्किटांचा पुडा २३०० रुपयांत मिळतो

गाझा : पार्ले जी बिस्कीट एक लोकप्रिय ब्रँड आहे. भारतात मागील अनेक दशकांपासून पार्ले जी बिस्किटांची विक्री सुरू

विनाश ७ जून नंतर अटळ, बाबा वेंगाचे भाकीत

बल्गेरिया : बल्गेरिया येथील बाबा वेंगा यांनी केलेली भविष्यवाणी या नावाने एक भाकीत व्हायर होत आहे. या भाकितानुसार

Shashi Tharoor : 'भारताला कोणत्याही तिसऱ्या पक्षाची गरज नाही', राहुल गांधींच्या विधानावर थरूर यांची प्रतिक्रिया

राहुल गांधींच्या ‘सरेंडर’ विधानाशी शशी थरूर असहमत वॉशिंग्टन : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान