Eknath Shinde : काँग्रेस आघाडी खोटं बोलणाऱ्यांचे दुकान, त्याच्या गल्ल्यावर उबाठा बसलेत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उबाठावर घणाघाती टीका


मुंबई : बाळासाहेब होते तेव्हा दिल्लीतले नेते मातोश्रीवर येत होते. मात्र आज उलटं झालंय, दिल्लीतल्या गल्लीगल्लीत फिरावं लागतंय, बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळेच ही परिस्थिती आली. महाविकास आघाडीच्या काळात भ्रष्टाचाराचा डोंगर होता, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उबाठावर केली. छत्रपती संभाजी नगर येथे महायुतीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. महाविकास आघाडीचे सरकार अहंकारी होते. महाराष्ट्रासाठी केंद्राकडे मदत मागणे हा कमीपणा नाही. राज्याला विकासासाठी निधी मिळवण्यासाठी आम्ही जातो, पण ते मला मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करा, यासाठी दिल्लीत जातात, असा टोला मुख्यमंत्र्यांनी यावेळी उबाठाला लगावला.


महायुतीच्या योजनांवर बोटं मोडली आणि त्या योजना चोरून थापासुत्री आणली, अशी बोचरी टीका मुख्यमंत्र्यांनी महाआघाडीच्या जाहीरनाम्यावर केली. काँग्रेस आघाडी खोटं बोलणाऱ्यांचे दुकान असून त्याच्या गल्ल्यावर उबाठा बसले आहेत. महाराष्ट्रातील जनतेला गिऱ्हाईक बनवण्याचा त्यांचा डाव आहे पण इथली जनता सुज्ञ आहे येत्या २० तारखेला महाआघाडीच्या दुकानाचे शटर कायमचे बंद झाल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) केला.


अडीच वर्षात त्यांनी घरात बसून फेसबुकने लाईव्ह करुन सरकार चालवले. खंडणीच्या आरोपाखाली गृहमंत्री जेलमध्ये गेले. सगळे बडे प्रकल्प बंद केले. कामात स्पीडब्रेकर घालून जलयुक्त शिवार, मराठवाडा वॉटरग्रीड, मेट्रो असे अनेक प्रकल्प बंद होते. मंदिरे बंद होती तर भ्रष्टाचाराची दुकाने राजरोस सुरु होती. आम्ही ती सत्ता उलथवून टाकली आणि महाराष्ट्रातील जनतेच्या मनातले आणि मोदींच्या आशिर्वादाचे सरकार आणले, असे ते मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.


राज्याला मराठवाड्याने चार मुख्यमंत्री दिले पण इथला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही. मराठवाड्यावर लागलेला दुष्काळाचा कलंक पुसून टाकण्याचा निर्धार आपल्या सरकारने केलाय. महाविकास आघाडीने बंद केलेला मराठवाडा वॉटर ग्रीड आणि नदीजोड प्रकल्प आपण सुरु केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पांना पाठबळ दिले आहे. त्यामुळे इथल्या महायुतीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी (Eknath Shinde) केले.

Comments
Add Comment

Raigad News: आईने चार मुलांना विषारी थंडपेय पाजून स्वतःही केले विषप्राशन; तिघांचा मृत्यू, दोन मुलांची प्रकृती गंभीर

रायगड : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण

Palghar Crime : पालघरमध्ये भररस्त्यात तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; CCTV व्हायरल, प्रकृती चिंताजनक

Palghar Crime : पालघर : पालघर (Palghar) शहरात भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला (Attack) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली

Crime News: धक्कादायक! लग्नात अडथळा ठरत असल्याने प्रेयसीची निर्घृण हत्या; शिक्षकासह वडील आणि मामा अटकेत

दोडामार्ग: प्रेमसंबंधातून सुरू झालेल्या नात्याचा शेवट एका धक्कादायक हत्याकांडात (Murder) झाला आहे. कर्नाटकातील

Maharashtra Monsoon Weather Alert : महाराष्ट्रात निसर्गाचा लहरी खेळ! कुठे मुसळधार पाऊस, तर कुठे उष्णतेची लाट; मान्सून कधी येणार?

केरळमध्ये वेळेवर दाखल झाल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे ६ जून रोजी महाराष्ट्रात प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर

Bhimashankar Temple : भाविकांसाठी आनंदाची बातमी! 5 महिन्यांनंतर भीमाशंकर मंदिर 15 जूनपासून खुले; गर्दी नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था

पुणे: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर मंदिर (Bhimashankar Temple) हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र तब्बल पाच ते सहा

Wari 2026: लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रशासन सज्ज, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला आढावा

मुंबई दि. १३ जून : पंढरपूरच्या (Pandharpur) दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि त्यांना