AUS vs PAK: ७ षटकांच्या सामन्यात पाकिस्तानचे ९ खेळाडू बाद, लाजिरवाणा पराभव

मुंबई: ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला टी-२० मालिकेच्या पहिल्या सामन्यात २९ धावांनी हरवले. हा सामना केवळ ७ षटकांचा होता. मात्र पाकिस्तानच्या संघाने यात ९ विकेट गमावले. त्यांच्यासाठी हा लाजिरवाणा पराभव होता. बाबर आझम आणि कर्णधार मोहम्मद रिझवानसह अनेक दिग्गज खेळाडू फ्लॉप झाले. हा सामना २०-२० षटकांचा होणार होता. मात्र खराब हवामानामुळे षटके कमी करण्यात आली.


ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ षटकांत ४ विकेट गमावताना ९३ धावा केल्या. या दरम्यान ग्लेन मॅक्सवेलने ४३ धावांची शानदार खेळी केली. त्याने १९ चेंडूंचा सामना करताना ५ चौकार आणि ३ षटकार लगावले. मॅक्सवेलने पाकिस्तानी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. राहिलेली कसर मार्क स्टॉयनिसने पूर्ण केली. त्याने ७ बॉलमध्ये नाबाद २१ धावा केल्या.



पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव


ऑस्ट्रेलियाला दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तान संघाने ७ षटकांत ६४ धावा केल्या. त्यांनी ९ विकेट गमावले. रिझवान शून्यावर बाद झाला. त्याला खातेही खोलता आले नाही. बाबर आझम ३ धावा करून बाद झाला. उस्मान खान ४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. साहिबजादा फरहान ८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. आगा सलमानलाही ४ धावा करता आल्या. या पद्धतीने पाकिस्तानला २९ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

Comments
Add Comment

अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सर; प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला देणार ४.५ कोटी रुपये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या