साईच्या द्वारकामाईतील तुलसी विवाह सोहळ्याची परंपरा आजही कायम !

  77

शिर्डी: विश्वाला श्रद्धा आणी सबुरीचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांनी ६० वर्ष वास्तव केलेल्या शिर्डीतील पवित्र द्वारकामाई मध्ये रूढी परंपरेनुसार बुधवारी सायंकाळी तुळसी विवाह मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री साईबाबा संस्‍थानच्या वतीने तुलसी विवाहाचे श्री द्वारकामाई मंदीर येथे आयोजन करण्यात आले होते.


तुलसी विवाह निमित्ताने सायंकाळी साडेसहा ते साडेसात यावेळेत द्वारकामाई मंदीराच्‍या सभामंडपात साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांच्‍या हस्‍ते तुलसी विवाह पूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी श्रीगणेश पूजन, नैवेद्य दाखविणे आदी कार्यक्रम पार पडले.


तर शिर्डी ग्रामस्थांनी देखील आपापल्या घरी तुलसी विवाह मोठ्या उत्साहात साजरा केला असून शहरात सर्वत्र आकाशात फटाक्यांची अतिशबाजी बघायला मिळाली. साईबाबांच्या द्वारकामाई मंदिरातील हा आगळ्यावेगळा तुलसी विवाह सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने साईभक्त उपस्थित होते.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या