साईच्या द्वारकामाईतील तुलसी विवाह सोहळ्याची परंपरा आजही कायम !

शिर्डी: विश्वाला श्रद्धा आणी सबुरीचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांनी ६० वर्ष वास्तव केलेल्या शिर्डीतील पवित्र द्वारकामाई मध्ये रूढी परंपरेनुसार बुधवारी सायंकाळी तुळसी विवाह मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री साईबाबा संस्‍थानच्या वतीने तुलसी विवाहाचे श्री द्वारकामाई मंदीर येथे आयोजन करण्यात आले होते.


तुलसी विवाह निमित्ताने सायंकाळी साडेसहा ते साडेसात यावेळेत द्वारकामाई मंदीराच्‍या सभामंडपात साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांच्‍या हस्‍ते तुलसी विवाह पूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी श्रीगणेश पूजन, नैवेद्य दाखविणे आदी कार्यक्रम पार पडले.


तर शिर्डी ग्रामस्थांनी देखील आपापल्या घरी तुलसी विवाह मोठ्या उत्साहात साजरा केला असून शहरात सर्वत्र आकाशात फटाक्यांची अतिशबाजी बघायला मिळाली. साईबाबांच्या द्वारकामाई मंदिरातील हा आगळ्यावेगळा तुलसी विवाह सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने साईभक्त उपस्थित होते.

Comments
Add Comment

“राष्ट्रप्रेम, सेवा आणि संघटनशक्तीचा संगम म्हणजे रेशीमबाग”

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांनी दिली नागपूरच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

जुन्नर वनविभागात ६८ बिबटे पकडले

पुणे : जुन्नर वनविभागात बिबट्यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १३

पन्नासपेक्षा अधिक बिबटे ‘वनतारा’ला नकोत!

राज्य सरकारसमोर नवा पेच; राज्यात सध्या २ हजार बिबट्यांचा वावर नागपूर : गुजरातमधील ‘वनतारा’ या प्राणी संरक्षण

नागपूरला मिळणार आधुनिक मासळी बाजार- मुख्यमंत्र्यांनी मानले मंत्री नितेश राणेंचे आभार; नाथूबाबा यांचे नाव देण्याबाबत सकारात्मक विचार

नागपूर : "प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत नागपूर शहरात आधुनिक मासळी बाजार केंद्र उभारले जाणार आहे. आमचे

'फनेल झोन'सह मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा - हाऊसिंग फॉर ऑल’ योजनेची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा; दहिसर आणि जुहूतील रडारचे स्थलांतर होणार

नागपूर : 'फनेल झोन'सह मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रांच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. त्यासाठी राज्य

महाराष्ट्राची सागरी सुरक्षा बळकट होणार- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे; १५ हाय स्पीड गस्ती नौका लवकरच दाखल होणार

नागपूर : परराज्यातून महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रात येणाऱ्या मच्छिमार नौकांमुळे राज्यातील मच्छिमारांचे