Diabetes: मुंबईकरांमध्ये वाढतोय मधुमेहाचा धोका

मुंबई: मुंबई म्हणजे दिवसरात्र चालणारे शहर. या शहराला आराम असा नाही. त्यामुळेच मुंबई महानगरामध्ये मधुमेह(Diabetes), उच्चरक्तदाब, ह्दयरोग यासारख्या आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. नागरिकांमध्ये व्यायामाचा अभाव आणि आहाराच्या चुकीच्या सवयी या कारणांमुळे या आजाराचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः प्रौढ वर्गामध्ये मधुमेहाचा टाइप २ हा प्रकार वाढून येत आहे.


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जागतिक मधुमेह दिन निमित्ताने दिनांक १४ नोव्हेंबरपासून मधुमेह आणि आहार विषयक जनजागृती राबविण्यात येणार आहे. मधुमेह दिनाची यंदाच्या वर्षीची संकल्पना 'ब्रेकिंग बॅरिअर्स, ब्रिजिंग गॅप्स' ही आहे. याअनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये मधुमेह संबंधित विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. रक्तदाब, मधुमेह तपासणी केंद्र याठिकाणी समुपदेशन करतानाच जनजागृती मोहीमदेखील आयोजित करण्यात आली आहे.



जागतिक आरोग्य संघटना व बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी संयुक्तपणे मुंबईमध्ये सन २०२१ मध्ये केलेल्या स्टेप्स सर्वेक्षणानुसार, १८ ते ६९ वर्ष या वयोगटातील सुमारे १८ टक्के व्यक्तींमध्ये उपाशीपोटी असताना रक्तातील साखरेचे प्रमाण १२६ मिलिग्रॅम (mg/dl) पेक्षा अधिक वाढलेले आढळले आहे. प्री-डायबेटिस - (Impaired fasting glycemia) ची टक्केवारी १५ टक्के आहे. लठ्ठ आणि बैठे काम करणाऱया व्यक्तींमध्ये टाइप २ मधुमेहाचा धोका अधिक असतो.



मधुमेह(Diabetes) जनजागृती मोहिमेत खाली नमूद विविध प्रकारचे संदेश


• ३० वर्षांवरील सर्व मुंबईकरांनी रक्तांमधील साखरेची व रक्तदाब चाचणी करणे आवश्यक.


• प्रक्रिया केलेले अन्न (processed food) खाणे टाळावे. त्यावरील सूचना (food Label) वाचावी.


• दैनंदिन आहारात साखरेचा वापर कमी करणे.


• मिठाचा कमी प्रमाणात वापर करणे. ( ≤5g/day- साधारण १ छोटा चमचा).


• नियमित व्यायाम (कमीत-कमी अर्धा तास रोज चालणे) आणि योगा अभ्यास.


Comments
Add Comment

अरबी शिकवणाऱ्या व्यक्तीवर अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

मुंबई: अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन केल्याच्या गंभीर आरोपाखाली मुंबई पोलिसांनी शिवडी येथील एका धार्मिक संस्थेतून

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर सोयी-सुविधांची कमतरता नको!

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे निर्देश मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा

डिसेंबर २०२८ नंतर सिग्नल फ्री आणि वाहतूक कोंडीशिवाय होणार प्रवास, महापालिकेच्या या प्रकल्पाची वाढतेय गती

मुंबई (खास प्रतिनिधी) : दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंडदरम्‍यान नवीन जोडमार्ग स्‍थापित होत आहे. पश्चिमेकडील

मुंबईत चार नवीन कबूतर खाने, पण बाकीचे बंद म्हणजे बंदच....

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील विद्यमान कबुतरखाने उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये बंद करण्यात आले आहेत. दरम्यान,

पवईतील एन्काऊंटरवर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा काय म्हणाले ?

मुंबई : पवईतील स्टुडिओत घडलेल्या ओलीस नाट्य आणि त्यानंतर झालेले आरोपी रोहित आर्य याच्या एन्काऊंटरवर अनेक प्रश्न

'वाचाळवीर' राऊतांना सक्तीची विश्रांती? महापालिका निवडणुकीपूर्वी ‘राजकीय ब्रेक’

प्रकृतीच्या कारणामुळे संजय राऊत दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार; राजकीय वर्तुळात अनेक