डेहराडूनमध्ये भीषण अपघात, सहा जणांचा जागीच मृत्यू, कारचा चक्काचूर

  81

डेहराडून: उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये(Dehradun) सोमवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. यात सहा जणांचा मृ्त्यू झाला. मृतांमध्ये तीन मुले आणि तीन मुलींचा समावेश आहे. याशिवाय एका मुलाची स्थिती नाजूक आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात कारचा पार चक्काचूर झाला.


या अपघातात ज्या तीन मुलींचा मृत्यू झाला त्यात गुनीत तेजप्रकाश सिंह(१९), नव्या पल्लव गोयल(२३) आणि कामाक्षी तुषार सिंघल(२०) यांचा समावेश आहे. या तीनही मुली डेहराडूनमधील विविध शहरात राहणाऱ्या होत्या. याशिवाय ज्या मुलांचा मृत्यू झाला आहे त्यांची नावे कुणाल कुकरेजा(२३), अतुल सुनील अग्रवाल(२४) आणि ऋषभ जैन(२४) अशी आहेत. यात कुणाल कुकरेजा हा हिमाचलच्या चंबा येथे राहाणारा होता. तर बाकी सगळे डेहराडून येथे राहाणारे होते.



याशिवाय या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव सिद्धेश विपिनकुमार अग्रवाल असे आहे. तो डेहराडूनमध्ये(Dehradun) राजपूर रोड येथे राहणारा होता. त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Comments
Add Comment

PM Modi : मातृभाषांचा सन्मान, मोदींचा संकल्प! मोदींची ११ वर्षे, ११ भाषांचा सुवर्णकाळ

नेहरूंनी बाजूला सारलं, मोदींनी भाषांना तारलं मातृभाषांला नवजीवन: मोदींचा ऐतिहासिक निर्णय भाषा ही फक्त

Cargo Ship Catches Fire: न्हावा शेवाच्या दिशेने येणाऱ्या मालवाहक जहाजाला भर समुद्रात महाकाय आग, क्रू मेंबर्स आगीत होरपळले

केरळ: सोमवारी सकाळी केरळच्या कोझिकोड किनाऱ्याजवळ WAN HAI 503 नावाच्या मालवाहू जहाजाला महाकाय आग (Cargo Ship Catches Fire) लागल्याची

सप्तकुंडमध्ये पर्यटकांवर मधमाशांचा कहर; २०० हून अधिक जखमी!

छत्रपती संभाजीनगर : प्रसिद्ध अंजिठा लेण्यांजवळील सप्तकुंड धबधबा बघायला आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी अचानक

Indore Missing Couple चा अखेर खुलासा झालाच! 'या' कारणामुळे सोनमनेच दिली होती पती राजाला मारण्याची सुपारी

शिलाँग: मेघालयमध्ये हनिमूनसाठी गेलेले इंदूरचे दाम्पत्य बेपत्ता झाल्याप्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे आता समोर

हनिमूनला गेलेल्या बेपत्ता जोडप्याचं गूढ अखेर उलगडलं! सोनमनेच काढला पतीचा काटा

शिलाँग: मेघालयातील शिलाँग इथं हनिमूनसाठी गेलेलं दाम्पत्य राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांच्या बेपत्ता

काळाच्या ओघातही टिकून संयुक्त कुटुंबाचे महत्त्व

संघाचे साहित्य प्रत्येक घरांत पोहोचवा : सरसंघचालक मोहन भागवतांची पंच परिवर्तनावर चर्चा कानपूर: कुंभमेळ्यात आपण