डेहराडूनमध्ये भीषण अपघात, सहा जणांचा जागीच मृत्यू, कारचा चक्काचूर

डेहराडून: उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये(Dehradun) सोमवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. यात सहा जणांचा मृ्त्यू झाला. मृतांमध्ये तीन मुले आणि तीन मुलींचा समावेश आहे. याशिवाय एका मुलाची स्थिती नाजूक आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात कारचा पार चक्काचूर झाला.


या अपघातात ज्या तीन मुलींचा मृत्यू झाला त्यात गुनीत तेजप्रकाश सिंह(१९), नव्या पल्लव गोयल(२३) आणि कामाक्षी तुषार सिंघल(२०) यांचा समावेश आहे. या तीनही मुली डेहराडूनमधील विविध शहरात राहणाऱ्या होत्या. याशिवाय ज्या मुलांचा मृत्यू झाला आहे त्यांची नावे कुणाल कुकरेजा(२३), अतुल सुनील अग्रवाल(२४) आणि ऋषभ जैन(२४) अशी आहेत. यात कुणाल कुकरेजा हा हिमाचलच्या चंबा येथे राहाणारा होता. तर बाकी सगळे डेहराडून येथे राहाणारे होते.



याशिवाय या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव सिद्धेश विपिनकुमार अग्रवाल असे आहे. तो डेहराडूनमध्ये(Dehradun) राजपूर रोड येथे राहणारा होता. त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे