कापसाच्या कवडीमोल भावामुळे शेतकरी हवालदिल

अमरावती: कापसाचे उत्पादन यंदा समाधानकारक असले तरी हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्यामुळे शेतकरी रडकुंडीला आला आहे. शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली आहे. भाव वाढतील या आशेवर शेतकरी आहेत; परंतु काही गरीब शेतकऱ्यांना पैशांची गरज असल्यामुळे नाइलाजास्तव कापूस विकावा लागत आहे. भाऊबीजेला बहीण आलेली असताना या पांढऱ्या सोन्याची साठवणूक कुठवर शक्य आहे, असा त्यांचा सवाल आहे. दिवाळीच्या निमित्ताने कापसाची खासगी बाजारपेठेत आवक वाढली आहे. कापूस खरेदीसाठी व्यापाऱ्यांचीही ग्रामीण भागात लगबग दिसून येत आहे. व्यापारी शेतकऱ्यांना मनमानी भावात कापूस मागतो व शेतकऱ्याला देण्यास भाग पाडतो, असा आता शिरस्ता झाला आहे. केंद्राकडून जाहीर झालेला कापसाचा हमीभाव सात हजारांच्या वर आहे. मात्र, खासगी बाजारपेठेत कापसाचे दर नीचांकीवर आहेत.


खासगी व्यापारी कापसाला ६५०० ते ६९०० रुपये प्रतिक्विंटल भाव देत आहेत. केंद्र सरकारने २०२४-२५ साठी कापसाच्या हमीभावात ५०१ रुपयांची वाढ केली. चालू हंगामात मध्यम धाग्याच्या कापसासाठी ७१२१ रुपये आणि लांब धाग्याच्या कापसासाठी ७५२१ रुपये हमीभाव जाहीर केला; परंतु व्यापारी त्यापेक्षा कमी दर देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. हमीभावापेक्षा कमी दराने कापूस विकावा लागत आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय वायदे बाजारात कापसाचे दर वाढले आहेत. वायदे बाजारात मागील आठवड्यात ७२.३४ सेंट प्रति पाउंडवर कापसाचे दर होते. ते आता ७२.६९ सेंट प्रति पाउंडवर गेले. त्यामुळे देशातील बाजारपेठेतही कापसाचे दर वाढणार आहेत. कापसाचे पीक समाधानकारक होईल व कापसाला चांगला भाव मिळेल, अशी होती.


यासंदर्भात कापूस उत्पादक शेतकरी प्रदीप बंड यांनी सांगितले की, कापूस वेचण्याकरिता मजुरी १०-१२ रुपये प्रतिकिलो या लागली. त्यामुळे एक क्चिटल हजार ते बाराशे रुपये खर्च अत्ताच येतो. तो देण्याकरिता कापूस गावातील व्यापारालाच विकावा लागत आहे.मागच्या वर्ष ही अशीच परिस्थिति होती आणि या वर्ष ही अशीच परिस्थिति आहे.
Comments
Add Comment

वनजमीन शेतीसाठी भाड्याने देणे बेकायदेशीर

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नागपूर : वनसंरक्षण अधिनियम, १९८० च्या कलम २ अंतर्गत केंद्र सरकारची पूर्वपरवानगी न

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी शाळांना नोंदणी करण्याचे आवाहन

मुंबई : राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) या

मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, तत्काळ तिकीट बुकिंगसाठी नवे नियम

पुणे : तत्काळ तिकीट बुकिंगमधील गैरप्रकार रोखण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांसाठी

शेतकऱ्यांना पीक विम्याचे हेक्टरी १७ हजार ५०० रुपये मिळणार; पण काय सांगतो नियम आणि शेतकऱ्यांना मिळणार किती फायदा ?

पुणे : यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी पिके

Pench : पेंच व्याघ्र प्रकल्पात आता 'सोलर बोट'ची सफारी लवकरचं पर्यटकांच्या सेवेत!

किरंगीसरा ते नवेगाव खैरी दरम्यान धावणार पर्यावरणपूरक 'सोलर बोट' पेंच : निसर्गप्रेमी आणि वन्यजीव पर्यटकांसाठी एक

शिल्पांच्या माध्यमातून राम सुतारांची कला शतकानुशतके स्मरणात राहील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: ज्येष्ठ शिल्पकार महाराष्ट्रभूषण, डॉ. राम सुतार यांचे बुधवारी (१७ डिसेंबर) रात्री निधन झाले. त्यांच्या