कापसाच्या कवडीमोल भावामुळे शेतकरी हवालदिल

अमरावती: कापसाचे उत्पादन यंदा समाधानकारक असले तरी हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्यामुळे शेतकरी रडकुंडीला आला आहे. शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली आहे. भाव वाढतील या आशेवर शेतकरी आहेत; परंतु काही गरीब शेतकऱ्यांना पैशांची गरज असल्यामुळे नाइलाजास्तव कापूस विकावा लागत आहे. भाऊबीजेला बहीण आलेली असताना या पांढऱ्या सोन्याची साठवणूक कुठवर शक्य आहे, असा त्यांचा सवाल आहे. दिवाळीच्या निमित्ताने कापसाची खासगी बाजारपेठेत आवक वाढली आहे. कापूस खरेदीसाठी व्यापाऱ्यांचीही ग्रामीण भागात लगबग दिसून येत आहे. व्यापारी शेतकऱ्यांना मनमानी भावात कापूस मागतो व शेतकऱ्याला देण्यास भाग पाडतो, असा आता शिरस्ता झाला आहे. केंद्राकडून जाहीर झालेला कापसाचा हमीभाव सात हजारांच्या वर आहे. मात्र, खासगी बाजारपेठेत कापसाचे दर नीचांकीवर आहेत.


खासगी व्यापारी कापसाला ६५०० ते ६९०० रुपये प्रतिक्विंटल भाव देत आहेत. केंद्र सरकारने २०२४-२५ साठी कापसाच्या हमीभावात ५०१ रुपयांची वाढ केली. चालू हंगामात मध्यम धाग्याच्या कापसासाठी ७१२१ रुपये आणि लांब धाग्याच्या कापसासाठी ७५२१ रुपये हमीभाव जाहीर केला; परंतु व्यापारी त्यापेक्षा कमी दर देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. हमीभावापेक्षा कमी दराने कापूस विकावा लागत आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय वायदे बाजारात कापसाचे दर वाढले आहेत. वायदे बाजारात मागील आठवड्यात ७२.३४ सेंट प्रति पाउंडवर कापसाचे दर होते. ते आता ७२.६९ सेंट प्रति पाउंडवर गेले. त्यामुळे देशातील बाजारपेठेतही कापसाचे दर वाढणार आहेत. कापसाचे पीक समाधानकारक होईल व कापसाला चांगला भाव मिळेल, अशी होती.


यासंदर्भात कापूस उत्पादक शेतकरी प्रदीप बंड यांनी सांगितले की, कापूस वेचण्याकरिता मजुरी १०-१२ रुपये प्रतिकिलो या लागली. त्यामुळे एक क्चिटल हजार ते बाराशे रुपये खर्च अत्ताच येतो. तो देण्याकरिता कापूस गावातील व्यापारालाच विकावा लागत आहे.मागच्या वर्ष ही अशीच परिस्थिति होती आणि या वर्ष ही अशीच परिस्थिति आहे.
Comments
Add Comment

राजस्थान, गुजरातमधून येणाऱ्या कांद्याने आणखी भाव कोसळण्याची शक्यता, शेतकरी अडचणीत

लासलगाव : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश ही देशातील प्रमुख कांदा उत्पादक राज्ये आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर

आत्महत्या करण्याऐवजी आमदाराला कापा; शेतकरी परिषदेत बच्चू कडूंची जीभ घसरली

बुलढाणा: गेल्या दोन महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान

दिवाळीचा आकाश कंदील बांधण्यासाठी झाडावर चढलेल्या तरुणाचा झाडावरून खाली कोसळून दुर्दैवी मृत्यू

पुणे : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आकाशकंदील बांधण्यासाठी झाडावर चढलेल्या एका तरुणाचा तोल जाऊन खाली पडल्याने

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर पुणेकरांची वाहनखरेदी धडाक्यात, गतवर्षी पेक्षा यंदा १,१५२ वाहनांची वाढ

पुणे : पुणेकरांनी यंदाच्या दिवाळीत वाहन खरेदीसाठी उत्साहाने सहभाग नोंदवला आहे. वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मी

गोखले बिल्डर्सच्या कंपन्यांमधून बाहेर पडल्याची कागदपत्रे सार्वजनिकरित्या उपलब्ध आहेत, मुरलीधर मोहोळ यांचे स्पष्टीकरण

पुणे: पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीनीच्या व्यवहारावरून केंद्रीय राज्यमंत्री तथा भारतीय

अमरावतीत सलग २५ तासांत १५ हजार ७७३ डोसे !

विख्यात शेफ विष्णू मनोहर यांचा विक्रम अमरावती : विख्यात शेफ विष्णू मनोहर यांनी अमरावती शहरात सलग २५ तासांत एकूण