कापसाच्या कवडीमोल भावामुळे शेतकरी हवालदिल

अमरावती: कापसाचे उत्पादन यंदा समाधानकारक असले तरी हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्यामुळे शेतकरी रडकुंडीला आला आहे. शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली आहे. भाव वाढतील या आशेवर शेतकरी आहेत; परंतु काही गरीब शेतकऱ्यांना पैशांची गरज असल्यामुळे नाइलाजास्तव कापूस विकावा लागत आहे. भाऊबीजेला बहीण आलेली असताना या पांढऱ्या सोन्याची साठवणूक कुठवर शक्य आहे, असा त्यांचा सवाल आहे. दिवाळीच्या निमित्ताने कापसाची खासगी बाजारपेठेत आवक वाढली आहे. कापूस खरेदीसाठी व्यापाऱ्यांचीही ग्रामीण भागात लगबग दिसून येत आहे. व्यापारी शेतकऱ्यांना मनमानी भावात कापूस मागतो व शेतकऱ्याला देण्यास भाग पाडतो, असा आता शिरस्ता झाला आहे. केंद्राकडून जाहीर झालेला कापसाचा हमीभाव सात हजारांच्या वर आहे. मात्र, खासगी बाजारपेठेत कापसाचे दर नीचांकीवर आहेत.


खासगी व्यापारी कापसाला ६५०० ते ६९०० रुपये प्रतिक्विंटल भाव देत आहेत. केंद्र सरकारने २०२४-२५ साठी कापसाच्या हमीभावात ५०१ रुपयांची वाढ केली. चालू हंगामात मध्यम धाग्याच्या कापसासाठी ७१२१ रुपये आणि लांब धाग्याच्या कापसासाठी ७५२१ रुपये हमीभाव जाहीर केला; परंतु व्यापारी त्यापेक्षा कमी दर देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. हमीभावापेक्षा कमी दराने कापूस विकावा लागत आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय वायदे बाजारात कापसाचे दर वाढले आहेत. वायदे बाजारात मागील आठवड्यात ७२.३४ सेंट प्रति पाउंडवर कापसाचे दर होते. ते आता ७२.६९ सेंट प्रति पाउंडवर गेले. त्यामुळे देशातील बाजारपेठेतही कापसाचे दर वाढणार आहेत. कापसाचे पीक समाधानकारक होईल व कापसाला चांगला भाव मिळेल, अशी होती.


यासंदर्भात कापूस उत्पादक शेतकरी प्रदीप बंड यांनी सांगितले की, कापूस वेचण्याकरिता मजुरी १०-१२ रुपये प्रतिकिलो या लागली. त्यामुळे एक क्चिटल हजार ते बाराशे रुपये खर्च अत्ताच येतो. तो देण्याकरिता कापूस गावातील व्यापारालाच विकावा लागत आहे.मागच्या वर्ष ही अशीच परिस्थिति होती आणि या वर्ष ही अशीच परिस्थिति आहे.
Comments
Add Comment

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर

'एआय' तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार; मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू