थंडीत सतत सर्दी होतेय का? सकाळी रिकाम्या पोटी प्या हे ड्रिंक

मुंबई: थंडीचे दिवस सुरू होताच नाक गळणे, घसा खवखवणे या समस्या सुरू होतात. ऋतू बदलताच शरीरातही ते बदल होतात आणि त्यामुळे हे आजार सतावतात. मात्र नाक गळत असेल अथवा गळ्यात खवखव होत असेल तर कशात मनही लागत नाही. अशा वेळेस सकाळी चहा कॉफी पिण्याऐवजी लिंबू आणि लवंगाचे पाणा एक गरम कप प्या. यामुळे सर्दीचा त्रास दूर होण्यास मदत होते.


लिंबामध्ये व्हिटामिन सीचे प्रमाण अधिक असते. यामुळे इम्युनिटी वाढते. सोबतच हे प्यायल्याने घसा मोकळा होण्यास मदत होते. यामुळे कफ बाहेर पडण्यास मदत होते.


दुसरीकडे लवंगामध्ये सूजविरोधी आणि किटाणूविरोधी घटक असतात. यातील युजेनॉल आणि गॅलिक अॅसिड असते. जे अँटीऑक्सिडंटसारखे काम करतात.


लवंगामुळे खोकला कमी होण्यास मदत होते. तसेच सर्दीमध्ये श्वास घेण्यास मदत होते. यामुळे आरामात झोप लागते.



असे बनवा ड्रिंक


आधी लवंग टाकून पाणी गरम करून घ्या. त्यानंतर आरामदायक तापमानावर थंड करा. पाण्यामध्ये व्हिटामिन सीचे प्रमाण कायम राखण्यासाठी थंड झाल्यावर लिंबू टाका. त्यानंतर त्याच एक चमचा मध टाका.

Comments
Add Comment

International Yoga Day 2026 : 'Yoga for Healthy Ageing' या संकल्पनेतून निरोगी आयुष्याचा मंत्र

२१ जून हा दिवस संपूर्ण जगासाठी आरोग्याचा उत्सव म्हणून ओळखला जातो. 'आंतरराष्ट्रीय योग दिन' जवळ येत असताना,

Magic of Science : आता 'मेंढीची लोकर' जोडणार मानवाची तुटलेली हाडे; संशोधनाला मोठे यश

LONDON: स्वेटर किंवा शालीसाठी वापरली जाणारी मेंढीची लोकर आता मानवी शरीराच्या उपचारासाठी वापरली जाणार आहे, हे ऐकून

शहरी जीवनातील वाढता मानसिक तणाव: ८२ टक्के नागरिक विळख्यात; अहवालातून धक्कादायक वास्तव समोर

आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात प्रगतीची शर्यत जिंकण्याच्या नादात माणूस स्वतःच्या आरोग्याकडे

JAMUN : हवामान बदलाचा 'गोड' साक्षीदार: उन्हाळ्याचा निरोप घेताना जांभळाचा मनसोक्त आनंद घ्या!

कडक उन्हाचा तडाखा आता ओसरू लागला असून, पावसाळ्याच्या पहिल्या सरींची चाहूल लागली आहे. ऋतू बदलाच्या या काळात

EAT GOOD : तुम्ही तुमच्या अन्नामुळेच आजारी पडत आहात का? जाणून घ्या सुरक्षित आहाराचे महत्त्व!

अन्न हे केवळ भूक भागवण्याचे साधन नसून ते आपल्या आरोग्याचा मुख्य आधार आहे. निरोगी जीवनासाठी सुरक्षित, पौष्टिक आणि

Thyroid : थायरॉईडच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका ; वेळीच लक्ष द्या !

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत थकवा किंवा वजनातील बदल या गोष्टी सामान्य मानल्या जातात. मात्र अनेकदा ही लक्षणे