भाजपा असेपर्यंत धर्मावर आधारित आरक्षण नाहीच

  81

'मुस्लीम आरक्षणा'वरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची काँग्रेसवर टीका


रांची: जोपर्यंत भारतीय जनता पक्ष सत्तेवर आहे, तोपर्यंत या देशात अल्पसंख्याक समुदायाला आरक्षण मिळणार नाही. काँग्रेस पार्टी मुस्लिमांना आरक्षण देण्याचे आश्वासन देत आहे; परंतु संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची कोणतीही तरतूद नाही. आम्ही कधीही कोणत्याही धर्माला विशेष आरक्षण देऊ शकत नाही, अशी रोखठोक भूमिका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडत रांची येथे काँग्रेसवर टीका केली.


महाराष्ट्रात उलेमांचा एक गट त्यांच्या काँग्रेसकडे गेला आणि मुस्लिमांना १० टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी त्यांना आश्वासन दिले की, आम्ही यामध्ये तुम्हाला मदत करू. यावर शहा म्हणाले, “काँग्रेस अन्य मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणाविरोधात आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कधीही धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यास परवानगी देणार नाही.”


अमित शहा यांनी सांगितले की, मी झारखंडच्या जनतेला विचारायला आलो आहे की, जर मुस्लिमांना १० टक्के आरक्षण दिले गेले, तर कोणाचे आरक्षण कमी होईल?, मागासवर्गीय, दलित आणि आदिवासी यांचे आरक्षण कमी होईल. मात्र, काँग्रेसकडून ओबीसी, आदिवासी आणि दलितांचे आरक्षण हिरावून घेण्याचा प्रयत्न केला
जात आहे.


काश्मीरमध्ये कलम ३७० पुनर्स्थापित करण्याच्या काँग्रेसच्या कथित प्रयत्नांवरही शहा यांनी हल्ला चढवला. शहा म्हणाले, “काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. मी राहुल गांधींना आव्हान देतो की, तुमची चौथी पिढी आली तरी कलम ३७० पुन्हा आणू शकत नाही.

Comments
Add Comment

२५० कोटींचा अलिशान बंगला तयार, रणबीर-आलिया लवकरच करणार गृहप्रवेश

मुंबई : बॉलिवूडचे लोकप्रिय कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे स्वप्नातील घर अखेर तयार झाले आहे. गेल्या अनेक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच मराठी चित्रपट ‘अरण्य’ च्या पोस्टरचे अनावरण करण्यात

Square Yards चा आर्थिक तिमाही निकाल जाहीर! कंपनीच्या महसूलात ४५% वाढ तर ईबीटा ११३% वाढला

मोहित सोमण:देशातील मोठा रिअल इस्टेट क्षेत्रातील ऑनलाईन व्यासपीठ (Platform) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्क्वेअर यार्ड (Square

सेंच्युरी मिलची जागा गिरणी कामगारांच्या घरांसाठी मिळण्याचा मार्ग मोकळा

सेंच्युरी मिल व्यवस्थापनाने जागा देणार; गिरणी कामगार संघर्ष समितीच्या मागणीला यश मुंबई : वरळी येथील सेंच्युरी

संघाची जोधपूरमध्ये ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान बैठक

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत

बँक ऑफ इंडियाकडून आता अनिल अंबानी 'Fraud' घोषित आरकॉमकडून आरोपांचे खंडन म्हणाले,'हे प्रकरण..

प्रतिनिधी:उद्योगपती अनिल अंबानी यांना आणखी एक धक्का बसला आहे. विघ्नाचे शुक्लकाष्ट संपत नाही तोपर्यंत आता