भाजपा असेपर्यंत धर्मावर आधारित आरक्षण नाहीच

'मुस्लीम आरक्षणा'वरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची काँग्रेसवर टीका


रांची: जोपर्यंत भारतीय जनता पक्ष सत्तेवर आहे, तोपर्यंत या देशात अल्पसंख्याक समुदायाला आरक्षण मिळणार नाही. काँग्रेस पार्टी मुस्लिमांना आरक्षण देण्याचे आश्वासन देत आहे; परंतु संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची कोणतीही तरतूद नाही. आम्ही कधीही कोणत्याही धर्माला विशेष आरक्षण देऊ शकत नाही, अशी रोखठोक भूमिका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडत रांची येथे काँग्रेसवर टीका केली.


महाराष्ट्रात उलेमांचा एक गट त्यांच्या काँग्रेसकडे गेला आणि मुस्लिमांना १० टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी त्यांना आश्वासन दिले की, आम्ही यामध्ये तुम्हाला मदत करू. यावर शहा म्हणाले, “काँग्रेस अन्य मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणाविरोधात आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कधीही धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यास परवानगी देणार नाही.”


अमित शहा यांनी सांगितले की, मी झारखंडच्या जनतेला विचारायला आलो आहे की, जर मुस्लिमांना १० टक्के आरक्षण दिले गेले, तर कोणाचे आरक्षण कमी होईल?, मागासवर्गीय, दलित आणि आदिवासी यांचे आरक्षण कमी होईल. मात्र, काँग्रेसकडून ओबीसी, आदिवासी आणि दलितांचे आरक्षण हिरावून घेण्याचा प्रयत्न केला
जात आहे.


काश्मीरमध्ये कलम ३७० पुनर्स्थापित करण्याच्या काँग्रेसच्या कथित प्रयत्नांवरही शहा यांनी हल्ला चढवला. शहा म्हणाले, “काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. मी राहुल गांधींना आव्हान देतो की, तुमची चौथी पिढी आली तरी कलम ३७० पुन्हा आणू शकत नाही.

Comments
Add Comment

यंदा कधी आहे कोजागिरी पौर्णिमा ? जाणून घ्या या तिथीचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त

कोजागिरी पौर्णिमा हा आश्विन पौर्णिमेला येणार भारतीय हिंदू संस्कृतीमधील महत्वाचा दिवस आहे. आणि इंग्रजी

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे चिपळूणमध्ये पुराचा धोका

चिपळूण (वार्ताहर) : चिपळूण शहराला असलेल्या पुराच्या धोक्याबाबत उपाययोजना सूचविण्यासाठी राज्य सरकारने जलसंपदा

मंत्री नितेश राणेंचा वैभववाडीत उबाठावर मोठा घाव!

मंगेश लोकेंसह शेकडो कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा भाजप प्रवेश ओरोस (वार्ताहर) : वैभववाडी तालुक्यात उद्धव

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

रायगड जिल्हा परिषदेत २ हजार ६०९ पदे रिक्त

अलिबाग (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील विकासाला गती देण्याचे काम रायगड जिल्हा परिषदेचे असले, तरी जिल्हा परिषदेत

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

शब्दापलीकडे कृती’ची महायुतीकडून वचनपूर्ती युवकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध : राणे म्हणाले की, राज्यातील