Mumbai Pune Highway : भीषण अपघात! खासगी बसची ट्रकला जोरदार धडक

१५ प्रवाशी जखमी, ८ जण गंभीर


मुंबई : पहाटेच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai Pune Highway) भीषण अपघात (Accident News) झाल्याची बातमी समोर आली आहे. कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या खासगी बसची आणि ट्रकची जोरदार धडक झाल्याने हा अपघात घडला. यामध्ये १५ प्रवाशी जखमी झाले असून त्यामधील ८ जण गंभीर जखमी असल्याचे समोर आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, खोपोलीजवळ पहाटे चार वाजेच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावर हा अपघात घडला. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडकली. या भीषण अपघातामध्ये १५ प्रवाशी जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ८ जणांची प्रकृती चिताजनक असल्याची माहिती मिळत आहे.


दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, खोपोली पोलीस, आयआरबी यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी गृप , देवदूत यंत्रणा , वाहतूक पोलीस अपघात ठिकाणी दाखल झाले. तात्काळ बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी वाहतूककोंडी निर्माण झाली होती. परंतु सध्या वाहतूक सुरळीत सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

Comments
Add Comment

Thane : मेट्रो, टनेल, पॉड टॅक्सी ते परवडणारी घरे; ठाणे बनतंय सुपर सिटी

ठाणे : “पूर्वी ‘पुणे तिथे काय उणे’ म्हटले जायचे; आता ‘ठाणे तिथे काय उणे’ असे आत्मविश्वासाने म्हणण्याची वेळ आली

Jitendra Shelke Death : अशोक खरात यांचे निकटवर्तीयाचा ट्रकखाली चिरडून मृत्यू, पत्नी आणि मुलगा गंभीर

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, शुक्रवारी झालेल्या एका भीषण अपघातात

Heat wave : १३ राज्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा, काळजी घेण्याचे आवाहन

- अकोला देशातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक उष्ण शहर मुंबई : सध्या देशभरातील हवामानात मोठे बदल होत आहेत. काही

Corporate Jihad : कॉर्पोरेट जिहादवर काय म्हणाले मंत्री नितेश राणे ?

पिंपळगाव बसवंत : जबरदस्तीने नमाज पढायला लावणे आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याच्या अधिकृत तक्रारी प्राप्त

Transfer : जी. श्रीकांत छत्रपती संभाजीनगरचे नवे विभागीय आयुक्त

चार वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; जितेंद्र पापळकर यांची जीएसटी विभागात नियुक्ती मुंबई : राज्य शासनाने

Animal Beauty Parlor : तुम्हाला माहित आहे का? या गावाने चक्क सुरु केलंय, महाराष्ट्रात जनावरांच पाहिलं ब्युटी पार्लर; जाणून घ्या सविस्तर

सातारा : महाराष्ट्रातील गावं आता सुजलाम आणि सुफलाम होण्याच्या दिशेने आपली पाऊले उचलत आहेत. शासनाच्या अनेक योजना