Mumbai Pune Highway : भीषण अपघात! खासगी बसची ट्रकला जोरदार धडक

१५ प्रवाशी जखमी, ८ जण गंभीर


मुंबई : पहाटेच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai Pune Highway) भीषण अपघात (Accident News) झाल्याची बातमी समोर आली आहे. कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या खासगी बसची आणि ट्रकची जोरदार धडक झाल्याने हा अपघात घडला. यामध्ये १५ प्रवाशी जखमी झाले असून त्यामधील ८ जण गंभीर जखमी असल्याचे समोर आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, खोपोलीजवळ पहाटे चार वाजेच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावर हा अपघात घडला. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडकली. या भीषण अपघातामध्ये १५ प्रवाशी जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ८ जणांची प्रकृती चिताजनक असल्याची माहिती मिळत आहे.


दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, खोपोली पोलीस, आयआरबी यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी गृप , देवदूत यंत्रणा , वाहतूक पोलीस अपघात ठिकाणी दाखल झाले. तात्काळ बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी वाहतूककोंडी निर्माण झाली होती. परंतु सध्या वाहतूक सुरळीत सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

Comments
Add Comment

Pune Crime : नसरापूर प्रकरणी न्यायालयात तीन लहान मुलांची साक्ष

पुणे : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि खून प्रकरणाच्या खटल्यात एक मोठी घडामोडी

Sex Determination Tests : धक्कादायक! व्हिडिओमुळे काळा धंदा उघड; आरोपी थेट घरी जाऊन करत होता गर्भलिंग निदान चाचणी

पुण्यातील दौंड (Daund Crime) तालुक्यात अवैध गर्भलिंग निदान चाचण्या केल्याच्या संशयावरून यवत पोलिसांनी एका

Solapur Sucide News : पत्नीसाठी शेवटचा संदेश रेकॉर्ड केला, नंतर घेतला टोकाचा निर्णय; सोलापूरमध्ये धक्कादायक घटना!

सोलापूर : सोलापूर (Solapur) शहरात एकाच दिवशी तिघांनी आत्महत्या (Sucide) केल्याच्या धक्कादायक घटनांमुळे खळबळ उडाली आहे.

New MIDC : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत नवी एमआयडीसी; मावळ तालुक्यात १,१०० एकरांवर औद्योगिक प्रकल्प

सरकारी नोकरी हवीय? मग 'ही' रेल्वे भरतीची संधी चुकवू नका

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने (Indian Railway) टेक्निशियन पदांसाठी मोठी

Government Employees: सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता ‘स्वग्राम’ बदलण्यासाठी मिळणार अतिरिक्त संधी

 महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. सामान्य प्रशासन