Narayan Rane : आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना गोळ्या घातल्या असत्या!

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा घणाघात


सिंधुदुर्ग : राज्यभरात सुरु असलेल्या विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) रणसंग्रामासाठी सर्व राजकीय पक्षांची जय्यत तयारी सुरु आहे. अशातच आज कुडाळमध्ये निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाजपा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे उपस्थित असून त्यांनी विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला आहे.



उबाठा गटाचे २५ आमदारही निवडून येणार नाहीत


यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उबाठा गटाचे २५ पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाही, असा दावा नारायण राणे यांनी केला. कारण उद्धव ठाकरे यांची भाषा सुसंस्कृत नाही, ते शिव्या देतात. ही भाषा बाळासाहेब ठाकरे यांच्या घराण्याला शोभत नाही. उद्धव ठाकरे यांची भाषा संस्कृत नसून बाळासाहेबांच्या घराण्याच्याला अशी भाषा शोभत नाही. आज बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असते तर त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना गोळ्या घातल्या असत्या, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली.


उद्धव ठाकरे हे हिंदुत्त्व पणाला लावून मुख्यमंत्री झाले. त्यावेळी अडीच वर्षात केवळ दोन दिवस मंत्रालयात काम केले आणि आता पुन्हा मला मुख्यमंत्री करा, असे म्हणतात. अशा लोकांना सत्ता कोण देईल? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.



पवारांची देखील कुंडली काढली आहे


शरद पवार (Sharad Pawar) याचे वय ८३-८४ इतके आहे. तरीदेखील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकास पाहून त्यांना असह्य झाल्याने त्यांनी राणेंच्या दोन्ही मुलांवर संस्कार नाहीत, अशी टीका केली. मात्र माझ्या घरात त्यांच्यावर संस्कार झाले. मी देखील पवारांची कुंडली काढलेली आहे. गेली अनेक वर्षे आम्ही देखील राजकारणात आहोत. पवार साहेब तुम्ही चार वेळा मुख्यमंत्री होता. विकासावर आणि मराठा आरक्षणावर बोलू नका, असा घणाघात नारायण राणे यांनी शरद पवार यांच्यावर केला.


दरम्यान, २३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकालात निलेश राणे हे आमदार होतील असेच जाहीर होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद