Narayan Rane : आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना गोळ्या घातल्या असत्या!

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा घणाघात


सिंधुदुर्ग : राज्यभरात सुरु असलेल्या विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) रणसंग्रामासाठी सर्व राजकीय पक्षांची जय्यत तयारी सुरु आहे. अशातच आज कुडाळमध्ये निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाजपा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे उपस्थित असून त्यांनी विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला आहे.



उबाठा गटाचे २५ आमदारही निवडून येणार नाहीत


यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उबाठा गटाचे २५ पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाही, असा दावा नारायण राणे यांनी केला. कारण उद्धव ठाकरे यांची भाषा सुसंस्कृत नाही, ते शिव्या देतात. ही भाषा बाळासाहेब ठाकरे यांच्या घराण्याला शोभत नाही. उद्धव ठाकरे यांची भाषा संस्कृत नसून बाळासाहेबांच्या घराण्याच्याला अशी भाषा शोभत नाही. आज बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असते तर त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना गोळ्या घातल्या असत्या, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली.


उद्धव ठाकरे हे हिंदुत्त्व पणाला लावून मुख्यमंत्री झाले. त्यावेळी अडीच वर्षात केवळ दोन दिवस मंत्रालयात काम केले आणि आता पुन्हा मला मुख्यमंत्री करा, असे म्हणतात. अशा लोकांना सत्ता कोण देईल? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.



पवारांची देखील कुंडली काढली आहे


शरद पवार (Sharad Pawar) याचे वय ८३-८४ इतके आहे. तरीदेखील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकास पाहून त्यांना असह्य झाल्याने त्यांनी राणेंच्या दोन्ही मुलांवर संस्कार नाहीत, अशी टीका केली. मात्र माझ्या घरात त्यांच्यावर संस्कार झाले. मी देखील पवारांची कुंडली काढलेली आहे. गेली अनेक वर्षे आम्ही देखील राजकारणात आहोत. पवार साहेब तुम्ही चार वेळा मुख्यमंत्री होता. विकासावर आणि मराठा आरक्षणावर बोलू नका, असा घणाघात नारायण राणे यांनी शरद पवार यांच्यावर केला.


दरम्यान, २३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकालात निलेश राणे हे आमदार होतील असेच जाहीर होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार