Narayan Rane : आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना गोळ्या घातल्या असत्या!

  77

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा घणाघात


सिंधुदुर्ग : राज्यभरात सुरु असलेल्या विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) रणसंग्रामासाठी सर्व राजकीय पक्षांची जय्यत तयारी सुरु आहे. अशातच आज कुडाळमध्ये निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाजपा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे उपस्थित असून त्यांनी विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला आहे.



उबाठा गटाचे २५ आमदारही निवडून येणार नाहीत


यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उबाठा गटाचे २५ पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाही, असा दावा नारायण राणे यांनी केला. कारण उद्धव ठाकरे यांची भाषा सुसंस्कृत नाही, ते शिव्या देतात. ही भाषा बाळासाहेब ठाकरे यांच्या घराण्याला शोभत नाही. उद्धव ठाकरे यांची भाषा संस्कृत नसून बाळासाहेबांच्या घराण्याच्याला अशी भाषा शोभत नाही. आज बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असते तर त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना गोळ्या घातल्या असत्या, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली.


उद्धव ठाकरे हे हिंदुत्त्व पणाला लावून मुख्यमंत्री झाले. त्यावेळी अडीच वर्षात केवळ दोन दिवस मंत्रालयात काम केले आणि आता पुन्हा मला मुख्यमंत्री करा, असे म्हणतात. अशा लोकांना सत्ता कोण देईल? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.



पवारांची देखील कुंडली काढली आहे


शरद पवार (Sharad Pawar) याचे वय ८३-८४ इतके आहे. तरीदेखील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकास पाहून त्यांना असह्य झाल्याने त्यांनी राणेंच्या दोन्ही मुलांवर संस्कार नाहीत, अशी टीका केली. मात्र माझ्या घरात त्यांच्यावर संस्कार झाले. मी देखील पवारांची कुंडली काढलेली आहे. गेली अनेक वर्षे आम्ही देखील राजकारणात आहोत. पवार साहेब तुम्ही चार वेळा मुख्यमंत्री होता. विकासावर आणि मराठा आरक्षणावर बोलू नका, असा घणाघात नारायण राणे यांनी शरद पवार यांच्यावर केला.


दरम्यान, २३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकालात निलेश राणे हे आमदार होतील असेच जाहीर होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Monsoon Update : विदर्भात मान्सून निराशाजनक; नागपूरसह पाच जिल्हे रेड झोनमध्ये? शेतकरी चिंताग्रस्त!

नागपूर : विदर्भात यंदा मान्सूनचे अपेक्षेपेक्षा पंधरा दिवस लवकर आगमन झाल्यानंतर शेतकरी व सामान्य जनतेला

व्होट जिहादचे उत्तर हिंदूंनी एकत्रितपणे दिले : डॉ. विखे

अ.नगर : आ.संग्राम जगताप हे एक हिंदुत्वाचा विचार आहे.त्यांना समर्थन देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहे.माझ्या

नांदगाव राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

माजी नगरसेवक वाल्मीक टिळेकर यांचा शेकडो सर्मथकांसह शिवसेनेत प्रवेश नांदगाव : नांदगाव नगरपालिकेचे राष्ट्रवादी

वारीतलं रिंगण : चैतन्य फुलवणारा सोहळा!

इंदापूर : आषाढी वारी म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नाही, ती आहे विश्वासाची, भक्तीची आणि नित्य उत्साहाची

पुण्यात दिसले इराणचे झेंडे आणि खामेनेईंचे पोस्टर

पुणे : इस्रायल - इराण दरम्यान युद्धबंदी झाल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले असले तरी दोन्ही देशांमध्ये तणाव कायम

आमदाराची मुलगी शासकीय आश्रम शाळेत शिकणार !

गडचिरोली : आजच्या काळात सर्व पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण देण्याच्या तयारीत असतात ,