मुंबई: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-२० मालिका ८ ते १५ नोव्हेंबरदरम्यान खेळवली जाणार आहे. या दरम्यान दोन्ही संघादरम्यान चार सामने खेळवले जाणार आहेत. आता या मालिकेची ट्रॉफी समोर आली आहे. दोन्ही कर्णधारांनी एकत्र फोटोशूट केले आहे.
टी-२० रँकिंगमध्ये भारत सध्या जगात नंबर १ टीम आहे. तर दक्षिण आफ्रिका सहाव्या स्थानावर आहे. एकीकडे भारतीय संघ टी-२० मालिका जिंकण्याची लय कायम राखण्याचा प्रयत्न करेल. तर आफ्रिकेचा संघ दीर्घ कालावधीनंतर एखादी टी-२० मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
भारताच्या कामगिरीवर नजर टाकल्यास गेल्या ९ टी-२० मालिका भारतीय संघ हरलेला नाही. या ९ मालिकांमध्ये आठ वेळा भारतीय संघाने विजय मिळवलेला आहे. तर एक मालिका अनिर्णीत ठरली. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेला २०२२मध्ये आयर्लंडला २-० असे हरवल्यानंतर एकही टी-२० मालिका जिंकता आलेली नाही. आयर्लंडविरुद्ध मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेने एकूण ९ टी-२० मालिका खेळल्या आहेत. यात ७ वेळा त्यांना पराभव सहन करावा लागला. तर दोन मालिका अनिर्णिीत ठरल्या होत्या.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत ९ टी२० मालिका खेळवल्या गेल्या आहेत. यात चार वेळा टीम इंडियाला विजय मिळवता आला तर दोन वेळा आफ्रिकेने बाजी मारली. तीन वेळा मालिका बरोबरीत सुटली.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…