IND vs SA: चमचमणाऱ्या ट्रॉफीसह दिसला सूर्यकुमार यादव, टी-२० मालिकेआधी फोटोशूट

मुंबई: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-२० मालिका ८ ते १५ नोव्हेंबरदरम्यान खेळवली जाणार आहे. या दरम्यान दोन्ही संघादरम्यान चार सामने खेळवले जाणार आहेत. आता या मालिकेची ट्रॉफी समोर आली आहे. दोन्ही कर्णधारांनी एकत्र फोटोशूट केले आहे.


टी-२० रँकिंगमध्ये भारत सध्या जगात नंबर १ टीम आहे. तर दक्षिण आफ्रिका सहाव्या स्थानावर आहे. एकीकडे भारतीय संघ टी-२० मालिका जिंकण्याची लय कायम राखण्याचा प्रयत्न करेल. तर आफ्रिकेचा संघ दीर्घ कालावधीनंतर एखादी टी-२० मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.


भारताच्या कामगिरीवर नजर टाकल्यास गेल्या ९ टी-२० मालिका भारतीय संघ हरलेला नाही. या ९ मालिकांमध्ये आठ वेळा भारतीय संघाने विजय मिळवलेला आहे. तर एक मालिका अनिर्णीत ठरली. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेला २०२२मध्ये आयर्लंडला २-० असे हरवल्यानंतर एकही टी-२० मालिका जिंकता आलेली नाही. आयर्लंडविरुद्ध मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेने एकूण ९ टी-२० मालिका खेळल्या आहेत. यात ७ वेळा त्यांना पराभव सहन करावा लागला. तर दोन मालिका अनिर्णिीत ठरल्या होत्या.


 


भारत वि दक्षिण आफ्रिका हेड टू हेड


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत ९ टी२० मालिका खेळवल्या गेल्या आहेत. यात चार वेळा टीम इंडियाला विजय मिळवता आला तर दोन वेळा आफ्रिकेने बाजी मारली. तीन वेळा मालिका बरोबरीत सुटली.

Comments
Add Comment

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतही जसप्रीत बुमराहच अव्वल

दुबई (वृत्तसंस्था): आयसीसीने बुधवारी त्यांची ताजी क्रमवारी जाहीर केली. भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि कुलदीप

महिला क्रिकेट विश्वचषक : भारतीय संघाला विजयी हॅट्ट्रिकची संधी

विशाखापट्टणम: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने

IND vs AUS : फक्त १० धावा करताच रोहित शर्मा रचणार इतिहास

पर्थ/मेलबर्न: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय (ODI)

Asia Cup 2025 : बक्षीस मिळालेली कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकत नाही, जाणून घ्या कारण !

मुंबई : आशिया कप २०२५ मध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याने चमकदार कामगिरी करत "प्लेअर ऑफ द टूर्नामेंट"चा किताब

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून