IND vs SA: चमचमणाऱ्या ट्रॉफीसह दिसला सूर्यकुमार यादव, टी-२० मालिकेआधी फोटोशूट

मुंबई: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-२० मालिका ८ ते १५ नोव्हेंबरदरम्यान खेळवली जाणार आहे. या दरम्यान दोन्ही संघादरम्यान चार सामने खेळवले जाणार आहेत. आता या मालिकेची ट्रॉफी समोर आली आहे. दोन्ही कर्णधारांनी एकत्र फोटोशूट केले आहे.


टी-२० रँकिंगमध्ये भारत सध्या जगात नंबर १ टीम आहे. तर दक्षिण आफ्रिका सहाव्या स्थानावर आहे. एकीकडे भारतीय संघ टी-२० मालिका जिंकण्याची लय कायम राखण्याचा प्रयत्न करेल. तर आफ्रिकेचा संघ दीर्घ कालावधीनंतर एखादी टी-२० मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.


भारताच्या कामगिरीवर नजर टाकल्यास गेल्या ९ टी-२० मालिका भारतीय संघ हरलेला नाही. या ९ मालिकांमध्ये आठ वेळा भारतीय संघाने विजय मिळवलेला आहे. तर एक मालिका अनिर्णीत ठरली. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेला २०२२मध्ये आयर्लंडला २-० असे हरवल्यानंतर एकही टी-२० मालिका जिंकता आलेली नाही. आयर्लंडविरुद्ध मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेने एकूण ९ टी-२० मालिका खेळल्या आहेत. यात ७ वेळा त्यांना पराभव सहन करावा लागला. तर दोन मालिका अनिर्णिीत ठरल्या होत्या.


 


भारत वि दक्षिण आफ्रिका हेड टू हेड


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत ९ टी२० मालिका खेळवल्या गेल्या आहेत. यात चार वेळा टीम इंडियाला विजय मिळवता आला तर दोन वेळा आफ्रिकेने बाजी मारली. तीन वेळा मालिका बरोबरीत सुटली.

Comments
Add Comment

शुभमन गिलच्या तब्येतीमध्ये सुधारणा, मात्र दुसरा कसोटी सामना खेळणार का?

कोलकाता: कोलकातामधील ईडन गार्डन्सवर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय

गुवाहाटीत पहिल्यांदाच होणार कसोटी सामना! दक्षिण आफ्रिकेच्या पराभवासाठी काय असणार भारताची रणनीती ?

गुहावटी: भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्कारावी लागली. फिरकीपटूंसाठी फायदेशीर

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे