कार्तिकीसाठी बिदर-पंढरपूर, आदिलाबाद-पंढरपूर-नांदेड विशेष रेल्वे

  55

सोलापूर: पंढरपूर येथे होणार्‍या कार्तिकी यात्रेत भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने बिदर-पंढरपूर-बिदर, आदिलाबाद-पंढरपूर-नांदेड आणि नांदेड-पंढरपूर-आदीलाबाद अशा तीन विशेष एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत विविध स्थानकावरून पंढरपूरला जाणार्‍या भक्तांची सोय होणार आहे.कार्तिकी शुद्ध एकादशी ही मोठी एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णव पंथीय एक दिवसाचे उपासाचे व्रत करतात. कार्तिकी एकादशी १२ नोव्हेंबरला आहे.


दरम्यान विठ्ठल भक्तांची पंढरपूरला जाण्याची सोय व्हावी यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे.बिदर-पंढरपूर ही गाडी बिदर येथून ११ नोव्हेंबरला रात्री सव्वादहा वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसर्‍या दिवशी सकाळी सहा वाजून २० मिनिटांनी पोहोचेल. तर, १२ नोव्हेंबरला पंढरपूर येथून रात्री आठ वाजता सुटेल आणि बिदर येथे दुसर्‍या दिवशी पहाटे साडेचार वाजता पोहोचेल. या गाडीस अनारक्षित १० डबे असतील.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या