लातूरमध्ये टेम्पो-कारच्या अपघातात आईसह दोन लेकी आणि नातीचा मृत्यू

लातूर: लातूरच्या नांदेड-बिदर महामार्गावरील एकुर्का रोड येथे टेम्पो आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या अपघातात आई, दोन विवाहित मुली आणि नातीचा मृत्यू झाला आहे.


या अपघातात कारचा संपूर्ण चेंदामेंदा झाला आहे. मृतांमध्ये मंगलाबाई जाधव(वय ४८), प्रतिभा भंडे(वय २४), प्रणिता बिरादार(वय २६) आणि अन्यया भंडे यांचा समावेश आहे. एकुर्का रोड येथील जाधव कुटुंबिय जावयाची कार घेऊन उद्गीरला खरेदी निमित्त जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने कारला समोर जोरदार धडक दिली.


यात या चार जणींचा जागीच मृत्यू झाला. तर इतर जखमी व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच गावातील ग्रामस्थांनी तातडीने मदत केली.

Comments
Add Comment

Mumbai Crime : संतापजनक! मुंबईत सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार, संतप्त नागरिकांचा रस्ता रोको आंदोलन

मुंबई : मुंबई (Mumbai) येथील पायधुनी परिसरात अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका ७ वर्षांच्या

Thane Crime : क्लिनिंगसाठी आलेल्या महिलेने चोरले ३.५ लाखांचे मंगळसूत्र; ठाणे पोलिसांनी तासाभरात परत मिळवले

ठाणे पोलिसांची कामगिरी, अवघ्या एका तासात मिळवले चोरी झालेले दागिने  ठाणे  : ठाण्यातील (Thane) राबोडी पोलिसांनी जलद

Sunetra pawar : संत ज्ञानेश्वर माऊली'च्या चरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार; वारकऱ्यांसोबत भोजनाचा घेतला

पुणे - सासवड, दि. १२ जुलै - अखंड हरिनामाच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती

Swapnapurti Housing Project : नागपूरमध्ये 'स्वप्नपूर्ती' गृहनिर्माण प्रकल्पाचा शुभारंभ; स्वच्छता कर्मचाऱ्यांना मोफत घरे देणार - मुख्यमंत्री फडणवीस

नागपूर: नागपूरमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या 'स्वप्नपूर्ती' गृहनिर्माण

Girija Raut Case : खासदार विनायक राऊत यांच्या सुनेच्या तक्रारीची डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली दखल; निष्पक्ष चौकशीची मागणी

मुंबई : खासदार विनायक राऊत (Vinayak raut) यांच्या सून गिरीजा राऊत (Girija Raut) यांनी पती, सासरे आणि कुटुंबातील अन्य

Devendra Fadnavis : रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या तीन वर्षात 145 रेल्वे उडाण पुलांचे बांधकाम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील ४८४ कोटी रुपयांच्या ९ पायाभूत सुविधांचे लोकार्पण सुरक्षित व जलद दळणवळण सुविधांच्या बांधकामांना