Devendra Fadnavis : टंचाईग्रस्त नांदेडमध्ये गोदावरीचे पाणी आणणार!

देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन


नांदेड : महायुतीचे उमेदवार भिमर्सव केराम यांच्या प्रचारार्थी सभा आयोजित केली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली असून नांदेडमधील टंचाईग्रस्तांसाठी गोदावरीचे पाणी आणणार असल्याचे आश्वासन केले आहे.



५४ टीएमसी पाणी गोदावरी नदीच्या खोऱ्यात आणणार


महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर केराम यांनी हजारो कोटी रुपयांची कामे मतदार संघामध्ये केली आहेत. यापुढेही पुढ देखील आपलंच सस्कार येणार आहे, त्यामुळे नागरिकांनी चिंता करु नका. कारण पुढील काळात टंचाईग्रस्त नांदेडमध्ये पाणीप्रश्न सोडवण्यासाठी महायुती सरकार नांदेडमध्ये ५४ टीएमसी पाणी गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये आणणार आहेत, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.


त्याचबरोबर, दुष्काळी भाग म्हणून मराठवाडा विभागाची ओळख आहे. कारण मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला पुढच्या पिढीला आम्ही दुष्काळ पाहू देणार नाही. गोदावरीचे पाणी आणण्याचे काम सुरु केले असून लवकरच पूर्ण करून आम्ही शेतकयांच्या तसेच नागरिकांच्या जीवनातील पाणीप्रश्न कायमचा सोडवणार आहे असेही त्यांनी म्हटले.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये