Aalandi Kartiki Yatra : आळंदीत कार्तिकी यात्रेची लगबग सुरू!

विधानसभा निवडणुकीमुळे प्रशासनाचा वाढला ताण


पुणे : विधानसभा निवडणुकीत प्रशासन व्यस्त असताना कार्तिकी यात्रेमुळे प्रशासनावर दुहेरी ताण येणार आहे. निवडणुकीबरोबरच कार्तिकी यात्रेसाठी आळंदीत येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी स्थानिक प्रशासन, खेड तहसील, एसटी महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा आरोग्य विभाग, पोलिस आयुक्तालय व्यस्त झाले आहे. या यात्रेसाठी आठ लाख भाविक येण्याचा अंदाज आहे.


कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. यात कार्तिकी वारी नियोजनाचा आढावा घेण्यात आला. या वेळी सहायक पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह गौर, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अ‍ॅड. राजेंद्र उमाप, विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके, वाहतुकीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश नांदुरकर, दिघी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक विनायक पाटील, वारकरी महामंडळ उपाध्यक्ष डी. डी. भोसले पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे आदी उपस्थित होते.



भाविकांच्या सोयीसुविधांबाबत प्राधान्य


सदर बैठकीत पाणीपुरवठा, विद्युत, वाहतूक प्रश्न, पथ विक्रेत्यांची व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, अतिक्रमण कारवाई, कायदा व सुव्यवस्था आदी महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. तसेच विभागवार आढावा घेण्यात आला. पोलिस बंदोबस्त व पर्यायी मार्गांचा वापर, याबाबत नियोजन करण्यात आले. शहराच्या वेशीवर चारही बाजूंना पार्किंग व्यवस्था व वाहतूक वळविण्याबाबत चर्चा करण्यात आली. भाविकांच्या सोयीसुविधांबाबत प्राधान्याने उपाययोजना करण्याबाबत सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या.



काय आहेत बैठकीतील मुद्दे?



  • आळंदीत २१ तारखेला पोलिस बंदोबस्त तैनात.

  • आळंदीत वाहनांना २१ नोव्हेंबरपासून प्रवेशबंदी.

  • पासधारक वाहनांना प्रवेश देण्यात येणार.

  • निवडणूक निकालानंतर आळंदीत मिरवणुकीवर बंदी.

  • इंद्रायणीला पाणी सोडण्यात येणार.

  • दर्शनबारी जागेचा प्रश्न तात्पुरता मार्गी.

  • देवस्थानकडून दिंड्यांना राहण्यासाठी जागा.

  • प्रदक्षिणा मार्गावर नो हॉकर्स झोन.

  • २४ तास आरोग्य सुविधा.

Comments
Add Comment

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर