Vinod Tawde: ना फडणवीस, ना तावडे, मग कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी तर स्पष्टच सांगितले...

मुंबई: येत्या १४ दिवसांत राज्यात एकाच टप्प्यात २८८ मतदारसंघामध्ये निवडणूक पार पडणार आहे. पण आता यासोबतच चर्चा सुरू आहे ती मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याची. कोणत्याही पक्षाने अद्यापही आपला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. पण महायुतीत मात्र एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील, असे म्हटले जात आहे. पण याच मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी केलेल्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या तर आहेत, पण जर का महायुती विजयी झाली तर कोणाच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडेल, याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी मंगळवारी (ता. ०५ नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत तावडेंना मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी म्हटले की, भारतीय जनता पक्षात ज्या नावांची चर्चा असते ते मुख्यमंत्री होत नाहीत. माझ्या नावाची चर्चा झाली तर मग मी मुख्यमंत्री होणार नाही हे नक्की. त्यामुळे हे पक्के लक्षात ठेवा. काही काळजी करू नका. तुम्हाला राजस्थानचे भजनलाल शर्मा माहिती होते?, मोहन यादव माहिती होते? ओडीशाचे माहिती होते का? त्यामुळे माझ्या नावाची चर्चा झाली ना? याचा अर्थ मी नक्की होणार नाही हे ठरवा. बाकी बघू. पण विधानसभेच्या निवडणुकीत महायुती जिंकेल आणि महायुतीचा मुख्यमंत्री होईल, असा विश्वास विनोद तावडे यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

शिवजन्मभूमीचा विकास करणे आमचे भाग्य

जुन्नरला देशातील क्रमांक-१ पर्यटन तालुका करणार एमआयडीसी, आयटी पार्क चांगले रस्ते तयार करून जुन्नरचा कायापालट

नाशिकच्या ६२२ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासक राज’

नाशिक : यंदा मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. सार्वत्रिक

राष्ट्रीय खोखोपटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

मुंबई : राष्ट्रीय खोखोपटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना

kajol : मी मारण्यापूर्वी..., अभिनेत्री काजोलच खळबळजनक वक्तव्य

kajol : बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री काजोल ही प्रेक्षकांच्या मनावर आजही तेवढंच राज्य करते जेवढं ती आधी करत होती.

तुम्हाला माहित आहे का डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे ?

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चॉकलेट खायला आवडतं. सध्या बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट

Raj Thackeray: रस्ता बांधला आणि टोल वसुल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का ?

मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. यानंतर नेहमीप्रमाणे