Vinod Tawde: ना फडणवीस, ना तावडे, मग कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी तर स्पष्टच सांगितले...

  144

मुंबई: येत्या १४ दिवसांत राज्यात एकाच टप्प्यात २८८ मतदारसंघामध्ये निवडणूक पार पडणार आहे. पण आता यासोबतच चर्चा सुरू आहे ती मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याची. कोणत्याही पक्षाने अद्यापही आपला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. पण महायुतीत मात्र एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील, असे म्हटले जात आहे. पण याच मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी केलेल्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या तर आहेत, पण जर का महायुती विजयी झाली तर कोणाच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडेल, याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी मंगळवारी (ता. ०५ नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत तावडेंना मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी म्हटले की, भारतीय जनता पक्षात ज्या नावांची चर्चा असते ते मुख्यमंत्री होत नाहीत. माझ्या नावाची चर्चा झाली तर मग मी मुख्यमंत्री होणार नाही हे नक्की. त्यामुळे हे पक्के लक्षात ठेवा. काही काळजी करू नका. तुम्हाला राजस्थानचे भजनलाल शर्मा माहिती होते?, मोहन यादव माहिती होते? ओडीशाचे माहिती होते का? त्यामुळे माझ्या नावाची चर्चा झाली ना? याचा अर्थ मी नक्की होणार नाही हे ठरवा. बाकी बघू. पण विधानसभेच्या निवडणुकीत महायुती जिंकेल आणि महायुतीचा मुख्यमंत्री होईल, असा विश्वास विनोद तावडे यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

मिस्टर ३६०' एबी डिव्हिलियर्सचे आरसीबीमध्ये पुनरागमनाचे संकेत, पण नव्या भूमिकेत!

बंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाचा लाडका खेळाडू, 'मिस्टर ३६०'

'आपले सरकार' पोर्टलवरील सेवा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून द्याव्यात', मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्य शासनाच्या विविध विभागांकडून नागरिकांना सेवा पुरवल्या जातात, या सेवांसाठी आपले सरकार हे पोर्टल

वास्तुुशास्त्रानुसार, 'या' तीन गोष्टी घरात ठेवल्यास घरात सुख-समृद्धी नांदेल आणि होईल आर्थिक भरभराट

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी हवी असते. वास्तूशास्त्रानुसार, घरात काही विशिष्ट

Hartalika 2025: अखंड सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी केले जाते हरतालिकेचे व्रत

मुंबई : हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेला हरतालिका व्रताचा सण यंदा २६ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा होत

Mumbai Police: मुंबई पोलिसांची कौतुकास्पद मोहीम, चोरीला गेलेले ८,००० मोबाईल परत मिळवून दिले

मुंबई: मुंबई पोलिसांनी चोरीला गेलेले मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली

Ganeshotsav 2025: वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने साकारले ५२ फूटी काशी विश्वनाथ मंदिर

मुंबई: दरवर्षी प्रसिध्द मंदिरांची हुबेहुब आरास साकारणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे