Vinod Tawde: ना फडणवीस, ना तावडे, मग कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी तर स्पष्टच सांगितले...

मुंबई: येत्या १४ दिवसांत राज्यात एकाच टप्प्यात २८८ मतदारसंघामध्ये निवडणूक पार पडणार आहे. पण आता यासोबतच चर्चा सुरू आहे ती मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याची. कोणत्याही पक्षाने अद्यापही आपला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. पण महायुतीत मात्र एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील, असे म्हटले जात आहे. पण याच मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी केलेल्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या तर आहेत, पण जर का महायुती विजयी झाली तर कोणाच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडेल, याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी मंगळवारी (ता. ०५ नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत तावडेंना मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी म्हटले की, भारतीय जनता पक्षात ज्या नावांची चर्चा असते ते मुख्यमंत्री होत नाहीत. माझ्या नावाची चर्चा झाली तर मग मी मुख्यमंत्री होणार नाही हे नक्की. त्यामुळे हे पक्के लक्षात ठेवा. काही काळजी करू नका. तुम्हाला राजस्थानचे भजनलाल शर्मा माहिती होते?, मोहन यादव माहिती होते? ओडीशाचे माहिती होते का? त्यामुळे माझ्या नावाची चर्चा झाली ना? याचा अर्थ मी नक्की होणार नाही हे ठरवा. बाकी बघू. पण विधानसभेच्या निवडणुकीत महायुती जिंकेल आणि महायुतीचा मुख्यमंत्री होईल, असा विश्वास विनोद तावडे यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

जनगणना २०२७च्या पूर्वचाचणीसाठी चेंबूरमध्ये १३५ प्रगणक, २२ पर्यवेक्षकांची नेमणूक

मुंबई (खास प्रतिनिधी) - जनगणनेच्या तयारीचा एक भाग म्हणून, मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागात पूर्वचाचणी

राणीबागेत बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शन

मुंबई (खास प्रतिनिधी) : निसर्गसौंदर्य आणि सर्जनशीलतेचा अनोखा मिलाफ नोव्हेंबरच्या अखेरीस मुंबईकरांना अनुभवायला

विख्यात कंपनी अनंत राजकडून डेटा सेंटर उभारण्यासाठी ४५०० कोटी गुंतवणूकीची घोषणा

प्रतिनिधी: विख्यात रिअल्टी कंपनी अनंत राज लिमिटेडने आपल्या पोर्टफोलिओ विस्तार करण्यासाठी आंध्र प्रदेशात

Utakarsh Small Finance Bank Q2Results: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा तिमाही निकाल जाहीर यंदा तिमाहीत बँकेला ३४८ कोटींचा निव्वळ तोटा

मोहित सोमण: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने आपला तिमाही निकाल आज जाहीर केला आहे. या निकालातील माहितीनुसार, बँकेला

सनातन एकता पदयात्रेदरम्यान बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांची प्रकृती चिंताजनक

मथुरा : सनातन एकता पदयात्रेच्या आठव्या दिवशी बागेश्वर धामाचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ

उत्पन्ना एकादशीचे महत्त्व आणि पाळा हे नियम! जाणून घ्या सविस्तर...

दर महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास आणि व्रत केले जाते. प्रत्येक एकादशीला विशिष्ट असे