आगरदांडा येथील जंगल जेटीवर टेम्पो समुद्रात कोसळला

मुरुड: मुरुड आगरदांडा येथील जंगल जेटीवर आज सकाळी आठच्या फेरीबोटीला जाण्यासाठी आलेल्या पाणी बॉटल वाहतूक करणारा पिकअप टेम्पो तीव्र उतारामुळे चालकाच्या नियंत्रणात न राहिल्याने फेरी बोटीवर चढण्याआधीच जेटी वरून समुद्रात कोसळला.


या अपघाताच्या वेळी चालक टेम्पो कोसळल्यानंतर सुखरूप बाहेर आला. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. समुद्राचे पाणी पोटात गेल्यामुळे चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो सुखरूप असल्याचे समजते.



शासनाने श्रीवर्धन तालुका व मुरुड तालुका जोडण्यासाठी आगरदांडा ते दिघी अशी फेरीबोट व्यवस्था सुरू केली आहे. यासाठी आगरदांडा येथे बांधण्यात आलेल्या जेटीला तीव्र उतार असल्यामुळे मालवाहतूक करणारे लोडिंग वाहने चालकाच्या नियंत्रणात राहत नाहीत. त्यामुळे हा अपघात झाला असल्याची चर्चा स्थानिक व इतर वाहन चालकांकडून होत आहे.


या जेटीमुळे दुचाकी व इतर चार चाकी वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागते. त्यामुळे शासनाने ही लाखो रुपये खर्चून बांधलेली जेटी निष्फळ ठरली आहे.

Comments
Add Comment

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला