आगरदांडा येथील जंगल जेटीवर टेम्पो समुद्रात कोसळला

  76

मुरुड: मुरुड आगरदांडा येथील जंगल जेटीवर आज सकाळी आठच्या फेरीबोटीला जाण्यासाठी आलेल्या पाणी बॉटल वाहतूक करणारा पिकअप टेम्पो तीव्र उतारामुळे चालकाच्या नियंत्रणात न राहिल्याने फेरी बोटीवर चढण्याआधीच जेटी वरून समुद्रात कोसळला.


या अपघाताच्या वेळी चालक टेम्पो कोसळल्यानंतर सुखरूप बाहेर आला. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. समुद्राचे पाणी पोटात गेल्यामुळे चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो सुखरूप असल्याचे समजते.



शासनाने श्रीवर्धन तालुका व मुरुड तालुका जोडण्यासाठी आगरदांडा ते दिघी अशी फेरीबोट व्यवस्था सुरू केली आहे. यासाठी आगरदांडा येथे बांधण्यात आलेल्या जेटीला तीव्र उतार असल्यामुळे मालवाहतूक करणारे लोडिंग वाहने चालकाच्या नियंत्रणात राहत नाहीत. त्यामुळे हा अपघात झाला असल्याची चर्चा स्थानिक व इतर वाहन चालकांकडून होत आहे.


या जेटीमुळे दुचाकी व इतर चार चाकी वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागते. त्यामुळे शासनाने ही लाखो रुपये खर्चून बांधलेली जेटी निष्फळ ठरली आहे.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक