आजपासून खायला सुरूवात करा या गोष्टी, कधीच येणार नाही व्हिटामिन बी, बी१२ची कमतरता

मुंबई: व्हिटामिन बी१२ हे अत्यंत गरजेचे पोषकतत्व आहे जे शरीराच्या विवइध कार्यांमध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात. लाल रक्तपेशींचे उत्पादन, हेल्दी नर्व्हस सिस्टीम आणि डीएनएच्या कामांसाठी गरजेचे आहे.


कारण आपले शरीर स्वत:हून बी १२ ची निर्मिती करत नाही. यासाठी आपल्या आहारातून बी१२चा शरीराला पुरवठा करणे गरजेचे असते. व्हिटामिन बी१२ची मात्र ३००Pg/ml पेक्षा जास्त असणे नॉर्मल मानले जाते. जेव्हा हा स्तर सातत्याने की होतो तेव्हा व्हिटामिन बी १२ची कमतरता मानली जाते. जर वेळेवर याकडे लक्ष दिले नाही तर गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.


व्हिटामिन बी१२च्या कमतरतेमुळे हात-पाय सुन्न होतात. तसेच चेहरा पिवळा पडणे, स्किन ड्राय होणे तसेच स्मरणशक्ती कमी होणे, स्वभाव चिडचिडा होणे यासारखी लक्षणे दिसतात.


कोणत्याही व्यक्तीच्या शरीरात बी१२ ची कमतरता निर्माण होऊ शकते. मात्र शाकाहारी लोकांच्या शरीरात बी१२ची कमतरता अधिक आढळते.


बी१२ची कमतरता भरून काढण्यासाठी डेअरी पदार्थ जसे दूध, दही आणि पनीर हा व्हिटामिन बी१२चा चांगला स्त्रोत आहे. आपल्या दररोजच्या डाएटमध्ये सामील करून तुम्ही व्हिटामिन बी१२ची कमतरता भरून काढू शकता.


सीवीड्समध्येही व्हिटामिन बी१२ असते. जपानी आणि कोरियन खाण्यामध्ये सीवीड्सचा समावेश अधिक केला जातो.


टीप - वरील लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. प्रहार कोणत्याही प्रकारे याची पुष्टी करत नाही. संबंधित गोष्टींसाठी तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

Comments
Add Comment

International Yoga Day 2026 : 'Yoga for Healthy Ageing' या संकल्पनेतून निरोगी आयुष्याचा मंत्र

२१ जून हा दिवस संपूर्ण जगासाठी आरोग्याचा उत्सव म्हणून ओळखला जातो. 'आंतरराष्ट्रीय योग दिन' जवळ येत असताना,

Magic of Science : आता 'मेंढीची लोकर' जोडणार मानवाची तुटलेली हाडे; संशोधनाला मोठे यश

LONDON: स्वेटर किंवा शालीसाठी वापरली जाणारी मेंढीची लोकर आता मानवी शरीराच्या उपचारासाठी वापरली जाणार आहे, हे ऐकून

शहरी जीवनातील वाढता मानसिक तणाव: ८२ टक्के नागरिक विळख्यात; अहवालातून धक्कादायक वास्तव समोर

आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात प्रगतीची शर्यत जिंकण्याच्या नादात माणूस स्वतःच्या आरोग्याकडे

JAMUN : हवामान बदलाचा 'गोड' साक्षीदार: उन्हाळ्याचा निरोप घेताना जांभळाचा मनसोक्त आनंद घ्या!

कडक उन्हाचा तडाखा आता ओसरू लागला असून, पावसाळ्याच्या पहिल्या सरींची चाहूल लागली आहे. ऋतू बदलाच्या या काळात

EAT GOOD : तुम्ही तुमच्या अन्नामुळेच आजारी पडत आहात का? जाणून घ्या सुरक्षित आहाराचे महत्त्व!

अन्न हे केवळ भूक भागवण्याचे साधन नसून ते आपल्या आरोग्याचा मुख्य आधार आहे. निरोगी जीवनासाठी सुरक्षित, पौष्टिक आणि

Thyroid : थायरॉईडच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका ; वेळीच लक्ष द्या !

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत थकवा किंवा वजनातील बदल या गोष्टी सामान्य मानल्या जातात. मात्र अनेकदा ही लक्षणे