मध्य रेल्वेद्वारे आज दोन विशेष रेल्वे गाड्या

अमरावती: दिवाळी आटोपल्याने गृहनगरातून कामासाठी मुंबई, पुणे, नागपूर, अहमदाबाद या महानगरात परत जाण्यासाठी प्रवाशांची रेल्वेत चांगलीच गर्दी होत आहे. त्या अनुषंगाने मध्य रेल्वेद्वारे दररोज विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले. याअंतर्गतच लोकमान्य टिळक टर्मिनस-संत्रागाच्छी सुपर फास्ट विशेष रेल्वेसह पुणे-नागपूर विशेष गाडीची सोय करण्यात आली आहे. ज्यांना मुंबई व पुण्याहून बडनेरा, अमरावती येथे परतायचे अशा प्रवाशांसाठी ही विशेष सुविधा आहे.

३० ऑक्टोबरपासून मध्य रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी दररोज विशेष रेल्वे गाड्या चालवत आहे. नियमित गाड्यांव्यतिरिक्त या गाड्या आहेत. त्यामुळे या गाड्यांमुळे प्रवाशांना प्रवासाचे अतिरिक्त पर्याय मिळाले आहेत. १० नोव्हेंबरपर्यंत या विशेष गाड्या चालणार आहेत. त्यानंतर नियमित गाड्या आहेतच. जरी मध्य रेल्वेने अतिरिक्त विशेष गाड्या दिल्या तरी रेल्वेत प्रवाशांची गर्दी मात्र कायम आहे.
Comments
Add Comment

Tuljabhavani VIP Darshan: तुळजाभवानी देवीचं व्हीआयपी दर्शन होणार महाग!

सोलापूर: शारदीय नवरात्रोत्सव (Navratri 2025) अवघ्या १० दिवसांवर आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची कुलस्वामिनी

‘दशावतार’ सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ दिवसांत केली इतकी कमाई !

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन आलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच

हत्ती हटेना... वनविभाग पथक हतबल!

गोवा वन खात्याचे पथक सिंधुदुर्ग सीमेवर सतर्क ओंकार हत्ती आज दिवसभर नेतर्डे परिसरात ठाण मांडून असल्याने गोवा

सात वर्षांच्या बांधकामांनंतर खड्डेमय ‘पलावा’चे उद्घाटन

७२ कोटींच्या खर्चानंतरही उड्डाणपुलाला ‘निसरडा भागा’ची उपमा मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील कल्याण-शीळ

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व