मोठी बातमी! संजय वर्मांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती!

मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली केली होती. गृहविभगाने त्यानंतर विवेक फळसणकर यांना प्रभारी महासंचालक पदाचा प्रभारी कार्यभार सोपविला होता. मात्र आता राज्याच्या पोलीस महासंचालकपदी आयपीएस दर्जाचे अधिकारी असणारे संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाविकास आघाडी आणि अन्य पक्षांच्या तक्रारीनंतर रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवले होते. त्यानंतर विवेक फळसणकर यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता संजय वर्मा हे राज्याचे नवीन पोलीस महासंचालक असणार आहेत.


कॉँग्रेस आणि अन्य पक्षांच्या तक्रारीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ल यांना डिजीपी पदावरून हटवले होते. त्यानंतर राज्याच्या मुख्य सचिवांनी ३ नावे निवडणूक आयोगाकडे पाठवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार विवेक फळसणकर, रितेश कुमार, संजय वर्मा, ही तीन नावे देण्यात आली होती. अखेर आज वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय वर्मा यांची राज्याच्या पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.




संजय वर्मा यांचा अल्पपरिचय


१९९० च्या बॅचचे संजय वर्मा आयपीएस अधिकारी आहेत. महाराष्ट्रात सध्या ते कायदा आणि तंत्रज्ञान विभागाचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. राज्याच्या पोलीस महासंचालक पदासाठी संजय वर्मा यांचे नाव आघाडीवर होते. एप्रिल २०२८ मध्ये ते पोलीस सेवेतून निवृत्त होतील




अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल्या


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, मात्र काँग्रेसकडून पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या बदलीबाबत अडथळे निर्माण केले जात आहेत. २० नोव्हेंबरपूर्वी त्यांची बदली करण्याची विनंती काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आहे. ते वादग्रस्त अधिकारी असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. रश्मी शुक्ला यांच्या बदलीसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आयोगाला पत्रही पाठवले होते. जोपर्यंत ते या पदावर आहेत, तोपर्यंत राज्यात निष्पक्ष निवडणुका घेणे कठीण जाईल, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता.

Comments
Add Comment

Meghana Sakore-Bordikar : रायगड महावितरणची अपूर्ण कामे मान्सून पूर्वी गतीने पूर्ण करावीत; १०० केव्हीचे २५ ट्रान्सफॉर्मर देण्याचे निर्देश

MUMBAI : रायगड जिल्ह्यातील महावितरणची अपूर्ण असणारी सर्व कामे मान्सून सुरू होण्याअगोदर गतीने पूर्ण करावीत. अलिबाग

Pune Water Cut : पुण्यावर पाणीकपातीचे संकट, महापालिकेने दिली माहिती

पुणे : पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटत आहे. अद्याप पाऊस सुरू झालेला नाही. या

Agriculture Minister Dattatray Bharne : शेतकरी कर्जमाफी योजनेची १० दिवसांत अंमलबजावणी - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

- ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ, राज्याच्या तिजोरीवर ३६ हजार कोटी रुपयांचा भार पडणार मुंबई : सततचा अवकाळी पाऊस, दुष्काळ,

Pune-Miraj Railway 21 Days Block : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! पुणे-मिरज मार्गावर २१ दिवसांचा मेगा ब्लॉक; अनेक गाड्या रद्द

- जाणून घ्या वेळापत्रकातले मोठे बदल पुणे : पुणे-मिरज रेल्वे मार्गावरील दुहेरीकरणाचे काम आणि नीरा यार्डच्या

Jalgaon Accident : जळगावात भीषण अपघात! देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला धडक; दोन महिलांचा मृत्यू

जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात रविवारी एक भीषण अपघात झाला. देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या

Satara Suicide : WhatsApp स्टेटसमुळे वाचले महिला पोलिसाचे प्राण; नेमकं काय घडलं?