Olympic 2036 : ऑलिम्पिक २०३६ च्या आयोजनासाठी भारत सज्ज!

आयओसीकडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा


नवी दिल्ली : यावर्षी जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीत भारतीय खेळाडू व्यस्त असतील, पण भारत सरकारने २०३६ ऑलिम्पिकचे आयोजन करण्याची तयारी सुरू केली आहे. २०३० मध्ये युवा ऑलिम्पिक आणि २०३६ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात भारत कोणतीही कसर सोडणार नाही, असे केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी सांगितले.


भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) २०३६ च्या ऑलिम्पिक यजमानपदासाठी इच्छा व्यक्त केली, अशा आशयाचे पत्र आयओएने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला (आयओसी) पाठवले. सूत्रांनुसार, २०३६ मध्ये ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळांचे आयोजन करण्याची भारताची इच्छा आहे असे पत्र १ ऑक्टोबर २०२४ रोजी ऑलिम्पिक समितीला पाठवण्यात आले आहे. भारत सरकारला आशा आहे की २०३६ च्या ऑलिम्पिकचे आयोजन करण्याची संधी भारताला मिळेल आणि यामुळे संपूर्ण देशामध्ये आर्थिक वाढ, सामाजिक प्रगती आणि युवा सक्षमीकरणासाठी फायदा होईल.



पंतप्रधान मोदींचे स्वप्न


२०२३ मध्ये मुंबईच्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी)च्या वार्षिक सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०३६ उन्हाळी ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी भारत इच्छुक असल्याचे सांगितले. यावेळी ''भारत ऑलिम्पिक आयोजित करण्यासाठी खूप उत्सुक आहे. २०३६ ऑलिम्पिक आयोजित करण्याच्या प्रयत्नांमध्ये भारत कोणतीही कसर सोडणार नाही. हे १४० कोटी भारतीयांचे स्वप्न आहे आणि आयओसीच्या पाठिंब्याने आम्हाला हे स्वप्न पूर्ण करायचे आहे.' 'खेळ हा केवळ पदके जिंकण्यासाठी नसून मन जिंकण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. खेळ चॅम्पियन्ससोबतच आनंदही देतो,” मोदी म्हणाले.



पत्राद्वारे अनौपचारिक बोली सुरु


भारताने पत्राद्वारे २०३६ ऑलिम्पिकची अनौपचारिक बोली जुलै २०२४ मध्ये लावल्याचे करत आहे. आगामी ऑलिम्पिक आयोजनासाठी आयओाए आणि आयाओसी यांच्यातील संवाद जुलै २०२४ मध्येच सुरू झाला आहे, असे माहितीनुसार समोर आले आहे. २०३६ ऑलिम्पिकचे आयोजन अहमदाबाद येथे करण्यात येणार असून नवीन प्रकल्पांचे बांधकाम आधीच सुरू झाल्याचे समोर येत आहे.

Comments
Add Comment

Ramdas Athawale: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभा खासदार पदाची केली हॅट्ट्रिक

मुंबई: रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची तिस-यांदा

Delhi: हातात पुष्पगुच्छ घेऊन थेट शिरला विधानसभेत, अध्यक्षांच्या गाडीजवळ फुलांचा गुच्छ ठेवला अन्...

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेत सुरक्षेचा मोठा भंग झाल्याचे वृत्त आहे. एका वाहनाने बॅरियर तोडून गेट क्रमांक २ मधून

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

Crime News : पाटण्यात माणुसकीला काळीमा; सख्ख्या काकाकडूनच ३ वर्षांच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार

पाटणा : बिहारची राजधानी पाटणामध्ये नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. परसा बाजार

Ladakh: लिलावात २५ हजार रुपयांना विकले गेले १० रुपये किमतीचे अंडे; इराणी पीडितांसाठीचा अनोखा उपक्रम चर्चेत

नवी दिल्ली: लडाखमधील लेह जिल्ह्यातील लोक इराणच्या लोकांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. युद्धाच्या काळात

Delhi: पार्किंगवरून महिला उपनिरीक्षक आणि वृद्ध व्यक्तीमध्ये वाद, पोलिसांनी काय कारवाई केली?

दिल्ली: दिल्लीतील उत्तर रोहिणी परिसरात पोलीस आणि नागरिकांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. मिळालेल्या