मी फुकट गोष्टी देणार नाही - राज ठाकरे

राळेगाव : लाडकी बहीण योजनेत अनेकांना पैसे मिळाले, काहींना नाही मिळाले. माझं सरकार आल्यानंतर मी फुकट गोष्टी देणार नाही. उलट माता भगिनींच्या हातांना मी काम देईन असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. सगळ्या बाजूंनी सत्यानाश होतो आहे. तुम्ही नीट पाहिलं पाहिजे, लोकांना समजावलं पाहिजे. आपण खड्ड्यात चाललो आहे असंही राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडणारा मनसे हा पहिला पक्ष आहे असं राज म्हटलं आहे. तसंच शरद पवारांना संत म्हणत टोला लगावला आहे. यवतमाळच्या राळेगाव या ठिकाणी राज ठाकरेंनी सभा घेतली. त्यावेळी राज ठाकरेंनी लाडकी बहीण योजनेवरुनही टीका केली आणि शरद पवारांना जातीपातींमध्ये द्वेष पसरवणारे संत म्हणत त्यांच्यावरही टीका केली.


आपल्याला सध्या जातीपातींमध्ये गुंतवलं जातं आहे. प्रत्येकाची ओळख जातींमध्ये होते. याआधीही जाती होत्या. मला आत्ता माहीत नाही की माझ्याबरोबर बसलेले सहकारी कोणत्या जातीचे आहेत. मला त्याच्याशी काही घेणंदेणं नाही. स्वतःच्या जातीबद्दल प्रेम असणं स्वाभाविक आहे. मात्र गेल्या दहा ते पंधरा वर्षांत स्वतःच्या जातीबद्दल प्रेमापेक्षा दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष पसरवला गेला असा महाराष्ट्र नव्हता. छत्रपती शिवराय, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर कुणीही आम्हाला जातीपातींचा द्वेष शिकवला नाही. ना आमच्या साधू संतांनी जातींचा द्वेष शिकवला. पण आमच्याकडे एक संत जन्माला आले त्यांचं नाव शरदचंद्र पवार. त्या संताने हे सगळं विष पेरलं. हा महाराष्ट्र हिंदुत्वाने भारावला होता. तो महाराष्ट्र जातीपातींमध्ये तोडण्याचं काम शरद पवार यांनी केलं. हाताला काहीही लागणार नाही, या घाणेरड्या गोष्टींमुळे. या सगळ्याच्या जातीपातींपलिकडे माझा तरुण मोठा झाला पाहिजे तरुणी मोठ्या झाल्या पाहिजेत. असं राज ठाकरे म्हणाले.


मी आज तुम्हाला फक्त जागं करायला आलो आहे. महाराष्ट्राचं मतदान पाच वर्षांनी होणार आहे. शाहरुख खान आणि सलमान खानचा सिनेमा नाही. शुक्रवारी पडला तर सोमवारी दुसरा लागला. त्यामुळे मतदान प्रक्रियेकडे तुम्ही गांभीर्याने पाहिलं पाहिजे. २० तारखेला रेल्वे इंजिन या निशाणीवर अशोक मेश्राम यांना विजयी करा हे सांगायला मी आलो आहे असंही राज ठाकरे म्हणाले.

Comments
Add Comment

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी

केंद्राकडून महाराष्ट्राला ६,४१८ कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता, उपमुख्यमंत्री पवारांकडून आभार

मुंबई : केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी

IMD Weather Update : तिहेरी संकट! महाराष्ट्रासह १४ राज्यांवर पावसाचा धोका; IMD कडून 'हाय अलर्ट' जारी

नवी दिल्ली : भारताच्या समुद्र क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मोठी नैसर्गिक घडामोड झाली असून, एकाच वेळी दोन कमी दाबाचे

Jejuri Dussehra : मर्दानी दसऱ्याची सांगता! फक्त ४ मिनिटांत ९० वेळा फिरवली ४२ किलो वजनाची खंडा तलवार

जेजुरी : कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी गडावर आज 'खंडा स्पर्धे'ने मर्दानी दसरा उत्सवाची सांगता झाली. या