आग्रा येथे हवाई दलाचे विमान कोसळले, पायलटसह २ जणांनी शेतात उड्या घेत...

आग्रा : उत्तर प्रदेशातील आगरा येथे आज एक मोठी दुर्घटना घडली. हवाई दलाच्या विमानाने आकाशातच पेट घेतला. ही आग वाढल्यानंतर विमान एका शेतात कोसळले. दरम्यान, अपघातावेळी विमानातील पायलट आणि आणखी २ व्यक्तींनी शेतात उडी मारून आपला जीव वाचवला. विमान जमिनीवर कोसळताच आग आणखी भडकली. आग्रा येथील कागारौल भागातील सोंगा गावाजवळ ही दुर्घटना घडली.

या घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचत आहेत. विमान शेतात कोसळताना पाहून गावातील सर्व लोकही तेथे पोहोचले. या दुर्घटनेनंतर, तातडीने चौकशीचे आदेश करण्यात आले आहेत. तसेच, दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी संबंधित सर्व संस्थांना सतर्क करण्यात आले आहेत.


पंजाबमधून केले होते उड्डाण -


एएनआय या वृत्त संस्थेने संरक्षण अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, हे मिग-२९ विमान होते. पंजाबमधील अदमपुर येथून या विमानाने उड्डाण घेतले होते. विमान रूटीन एक्सरसाइजसाठी आगरा येथे जात होते. दुर्घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Comments
Add Comment

Bolivia Plane Crash : बोलीवियात नोटांनी भरलेलं विमान थेट रस्त्यावर कोसळलं; १५ जणांचा जागीच मृत्यू, दुर्घटनेनंतर रस्त्यावर विखुरला पैशांचा खच!

दक्षिण अमेरिकेतील बोलीविया देशातून शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) एक अतिशय भीषण बातमी समोर आली. राजधानी ला पाझजवळील

प्रदूषणाच्या विळख्यात जीवनवाहिन्या?

४६ % नद्यांसोबतच गंगा-यमुनाही दूषित नवी दिल्ली : कोट्यवधी भारतीयांची जीवनवाहिनी आणि श्रद्धेचे प्रतीक असलेल्या

भारत-पाक सीमेवर 'प्रचंड' हेलिकॉप्टरमध्ये सह-वैमानिक म्हणून राष्ट्रपती मुर्मू यांनी रचला इतिहास

जयपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी राजस्थान मधील जैसलमेर येथे स्वदेशी हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर

RTO Rules Upadate : चालकांसाठी आरटीओचे 'हे' नवीन नियम; नितीन गडकरी यांची घोषणा

नवी दिल्ली : देशात रस्ते अपघातांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. गाड्यांच्या धडकेत निष्पाप नागरिक प्राण गमावत

Amit Shah : सीमांचलमधून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

सीमांचल भागातून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम सुरू केली जाईल, असे विधान करत केंद्रीय

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर