Assembly Election : उबाठाची गळती थांबेना! तीन माजी नगरसेवकासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेसेनेत प्रवेश

भाईंदर : ऐन विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) रणधुमाळीत उबाठाला (UBT Shivsena) पुन्हा एकदा गळती लागली असून उबाठा गटाचे तीन नगरसेवक, उपजिल्हा प्रमुख, शहरप्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच काँग्रेसची एक नगरसेविका आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख पदाधिकारी यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.


भाईंदर पूर्वेकडील उबाठा गटाचे माजी नगरसेवक जयंतीलाल पाटील, माजी नगरसेवक अरविंद ठाकूर आणि माजी नगरसेविका सुनिता पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. तसेच उप जिल्हाप्रमुख जयराम मेसे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संतोष पेंडूरकर, अनिल साबळे, यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी खासदार नरेश म्हस्के, युवा सेना प्रमुख पूर्वेश सरनाईक इत्यादी उपस्थित होते.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार