Assembly Election : उबाठाची गळती थांबेना! तीन माजी नगरसेवकासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेसेनेत प्रवेश

भाईंदर : ऐन विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) रणधुमाळीत उबाठाला (UBT Shivsena) पुन्हा एकदा गळती लागली असून उबाठा गटाचे तीन नगरसेवक, उपजिल्हा प्रमुख, शहरप्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच काँग्रेसची एक नगरसेविका आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख पदाधिकारी यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.


भाईंदर पूर्वेकडील उबाठा गटाचे माजी नगरसेवक जयंतीलाल पाटील, माजी नगरसेवक अरविंद ठाकूर आणि माजी नगरसेविका सुनिता पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. तसेच उप जिल्हाप्रमुख जयराम मेसे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संतोष पेंडूरकर, अनिल साबळे, यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी खासदार नरेश म्हस्के, युवा सेना प्रमुख पूर्वेश सरनाईक इत्यादी उपस्थित होते.

Comments
Add Comment

शतप्रतिशत भाजपसाठी रणनीती; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची राज्यस्तरीय संचालन समिती जाहीर

महत्वाच्या पदांवर अनुभवी नेतृत्व; विविध समाजघटकांसाठी स्वतंत्र संपर्क प्रमुख केशव उपाध्ये, नवनाथ बन यांच्यावर

Jalna Crime : 'तेच घडलं ज्याची भीती होती!' सख्या दीर-भावजयच्या 'लफड्याची' गावभर चर्चा; अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा निर्घृण खून, बदनापूर परिसरात खळबळ

जालना : अनैतिक प्रेमसंबंधात (Illegal Relationship) अडथळा ठरणाऱ्या सख्ख्या भावाचा दुसऱ्या भावानेच काटा काढल्याची एक धक्कादायक

Chhatrapati Sambhaji Nagar : गाझा मदतीच्या नावाखाली देशाच्या सुरक्षेशी खेळ? QRने गोळा केलेले लाखो रुपये थेट परदेशात; एटीएसकडून एकाला अटक, काय घडतंय नेमकं?

छत्रपती संभाजी नगर : गाझा-पॅलेस्टाईन येथे सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या मदतीच्या

स्थानिक निवडणुकांतून ‘पिपाणी’ वगळली

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा मुंबई  : शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी मोठा

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे