नंदूरबार : नंदूरबार जिल्ह्यात धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. लोय पिंपळोद गावाजवळ एका बोलेरा गाडीने रस्त्याच्या कडेला दुचाकीसह उभ्या असलेल्या नागरिकांना चिरडले. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री आठ वाजेच्या सुमारास नंदूरबार ते धानोरा रस्त्यावर एक दुचाकी खराब झाली होती. या ठिकाणी आणखीही दोन दुचाकी थांबलेल्या होत्या. त्याच वेळी धानोरा गावाकडे भरधाव वेगात एक बोलेरो जीप निघाली होती. या जीपचा दुचाकीला धडकून भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की तीन दुचाकींचा अक्षरशः चक्काचूर झाला. बोलेरोही उलटून पडली. तसेच दुचाकीसह रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, अपघातातील एका जखमी व्यक्तीला नंदूरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. घटनास्थळी पोलिसही दाखल झाले असून या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…