Accident News : भीषण अपघात! बोलेरोने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाच जणांना चिरडले

नंदूरबार : नंदूरबार जिल्ह्यात धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. लोय पिंपळोद गावाजवळ एका बोलेरा गाडीने रस्त्याच्या कडेला दुचाकीसह उभ्या असलेल्या नागरिकांना चिरडले. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री आठ वाजेच्या सुमारास नंदूरबार ते धानोरा रस्त्यावर एक दुचाकी खराब झाली होती. या ठिकाणी आणखीही दोन दुचाकी थांबलेल्या होत्या. त्याच वेळी धानोरा गावाकडे भरधाव वेगात एक बोलेरो जीप निघाली होती. या जीपचा दुचाकीला धडकून भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की तीन दुचाकींचा अक्षरशः चक्काचूर झाला. बोलेरोही उलटून पडली. तसेच दुचाकीसह रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांचा जागीच मृत्यू झाला.


दरम्यान, अपघातातील एका जखमी व्यक्तीला नंदूरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. घटनास्थळी पोलिसही दाखल झाले असून या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Comments
Add Comment

Weather Alert: महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: राज्यातील हवामानात बदल जाणवायला सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावर पोहोचताच हवामानात

कुंभमेळ्यात महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्या

नाशिक : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देश – विदेशातून महिला भाविक येतील. या

महाशिवरात्रीनिमित्त भाविकांसाठी प्रशासनाकडून जादा बसेसची सोय? बस कुठून कुठे धावणार जाणून घ्या..

पुणे : महाशिवरात्रीनिमित्त पुणे महानगर परिवहन मंडळाकडून भाविकांसाठी विशेष जादा बसेसची सोय ही कऱण्यात आली आहे.

Ambulance Network: महाराष्ट्रात ‘अॅम्बुलन्स’चे जाळे मजबूत होणार; १०० कोटींचा अतिरिक्त निधी

अत्याधुनिक उपकरणांसह रुग्णसेवेचा वेग वाढणार मुंबई : आपत्कालीन वैद्यकीय सेवेचा प्रतिसाद अधिक जलद, अचूक आणि

Pandharpur Crime News : पंढरपूर दुहेरी हत्याकांड : अवघ्या १० मिनिटांत मायलेकावर सपासप वार, तपास अधिकारी बदलले अन् असं उकललं पंढरपूरचं हत्याकांड

पंढरपूर : आषाढी वारीच्या पवित्र काळानंतर पंढरपूरला हादरवून सोडणाऱ्या मायलेकाच्या निर्घृण हत्याकांडाचा तपास

Free School Bag: राज्यसरकारच्या मोठा निर्णय! १ ते ८ विच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर

मुंबई: राज्यसरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांना