उजनी धरणाचे दरवाजे आता ३ महिने राहणार बंद !

सोलापूर: जुलैपर्यंत उणे पातळीतील उजनी धरण ४ ऑगस्टपूर्वी भरले आणि धरणातून पाणी भीमा नदी, कॅनॉल, उपसा सिंचन योजनांमधून सोडून द्यावे लागले. मागील दोन महिन्यांत धरणातून तब्बल १०६ टीएमसी पाणी सोडून द्यावे लागले आहे. अजूनही उजनीत दौंडवरून २८०० क्युसेकचा विसर्ग सुरू असून, धरण सध्या १११ टक्के भरले आहे. त्यामुळे आगामी आठ दिवसांत विसर्ग बंद झाल्यावर उजनीचे सगळेच दरवाजे पुढे तीन महिन्यांसाठी बंद केले जाणार आहेत.


सोलापूर शहर, धाराशिव, कर्जत- जामखेड, इंदापूरसह सोलापूर जिल्ह्यातील १३० हून अधिक ग्रामपंचायती, एमआयडीसी व साखर कारखान्यांना आणि दीड लाख हेक्टरला उजनीच्याच पाण्याचा आधार आहे. शेतीशिवाय एकूण ४३ योजना उजनी धरणावर अवलंबून आहेत. गतवर्षीच्या दुष्काळानंतर यंदा उजनी धरण ओव्हरफ्लो झाले असून सध्या धरणात १२ महिने पुरेल इतका पाणीसाठा आहे.या पार्श्वभूमीवर जानेवारीअखेर शेतीला पहिले आवर्तन तर मार्चअखेर किंवा एप्रिलच्या सुरवातीला दुसरे आवर्तन आणि मेअखेर गरजेनुसार आणखी एक आवर्तन सोडले जाऊ शकते. धरणातील पाण्याचे नियोजन कालवा सल्लागार समितीत निश्चित होणार असून, समितीची बैठक आता नवीन सरकार सत्तेवर आल्यावर डिसेंबरअखेर होणार आहे.

Comments
Add Comment

Vande Bharat : पुण्यात वंदे भारतचा डबा घसरला

पुणे : पुणे स्टेशनजवळ संध्याकाळी २२२२५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा चौथा डबा

Land Scam : अमरावती भूखंड घोटाळ्याची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी

मुंबई : अमरावती शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षित असलेले भूखंड अन्य व्यक्तींना बेकायदेशीरपणे

Agriculture Minister Dattatray Bharne : "बोगस बियाणे ओळखण्यासाठी बियाण्यांची डीएनए फिंगर प्रिंट टेस्ट केली जाणार" : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

"बियाण्यांची डिजिटल नोंद ठेवण्यासाठी ‘साथी’ पोर्टलचा वापर बंधनकारक : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बियाणे उत्पादक

लक्ष द्या ! लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख टाकणे अनिवार्य होणार ? नेमकी शिफारस काय ?

लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे , दोन कुटुंबाचे मिलन. पण वयोमर्यादा अपूर्ण असली तरी अनेक लग्न होतात, अर्थात बालविवाह

Crime : पत्नीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, मित्रावर संशय गेला; पारा चढला अन मित्रानंच मित्राचा काटा काढला

Beed Crime : बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचं चित्र आहे. बीडमध्ये मैत्रीला काळिमा

Pratap Sarnaik : रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी बंधनकारकच; परिवहन मंत्र्यांची ठाम भूमिका; आजच्या बैठकीत काय घडलं ?

(Marathi Language Compulsory Taxi-Auto ) : आगामी 1 मे महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य