उजनी धरणाचे दरवाजे आता ३ महिने राहणार बंद !

सोलापूर: जुलैपर्यंत उणे पातळीतील उजनी धरण ४ ऑगस्टपूर्वी भरले आणि धरणातून पाणी भीमा नदी, कॅनॉल, उपसा सिंचन योजनांमधून सोडून द्यावे लागले. मागील दोन महिन्यांत धरणातून तब्बल १०६ टीएमसी पाणी सोडून द्यावे लागले आहे. अजूनही उजनीत दौंडवरून २८०० क्युसेकचा विसर्ग सुरू असून, धरण सध्या १११ टक्के भरले आहे. त्यामुळे आगामी आठ दिवसांत विसर्ग बंद झाल्यावर उजनीचे सगळेच दरवाजे पुढे तीन महिन्यांसाठी बंद केले जाणार आहेत.


सोलापूर शहर, धाराशिव, कर्जत- जामखेड, इंदापूरसह सोलापूर जिल्ह्यातील १३० हून अधिक ग्रामपंचायती, एमआयडीसी व साखर कारखान्यांना आणि दीड लाख हेक्टरला उजनीच्याच पाण्याचा आधार आहे. शेतीशिवाय एकूण ४३ योजना उजनी धरणावर अवलंबून आहेत. गतवर्षीच्या दुष्काळानंतर यंदा उजनी धरण ओव्हरफ्लो झाले असून सध्या धरणात १२ महिने पुरेल इतका पाणीसाठा आहे.या पार्श्वभूमीवर जानेवारीअखेर शेतीला पहिले आवर्तन तर मार्चअखेर किंवा एप्रिलच्या सुरवातीला दुसरे आवर्तन आणि मेअखेर गरजेनुसार आणखी एक आवर्तन सोडले जाऊ शकते. धरणातील पाण्याचे नियोजन कालवा सल्लागार समितीत निश्चित होणार असून, समितीची बैठक आता नवीन सरकार सत्तेवर आल्यावर डिसेंबरअखेर होणार आहे.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा