LPG: ऐन दिवाळीत खिशाला ताण, ६२ रूपयांना महागला गॅस सिलेंडर

मुंबई: देशभरात दिवाळीचा उत्साह प्रचंड आहे. त्यात ऐन दिवाळीतच सामान्यांना मोठा झटका बसला आहे. दिवाळीला महागाईचा जोरदार झटका बसला आहे. लक्ष्मीपुजनाच्या दिवशीच म्हणजे १ नोव्हेंबरला गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे खिशाला चांगलाच फटका बसणार आहे.


१९ किलोग्रॅम वजनाच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. १९ किलोच्या कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात ६२ रूपयांची वाढ झाली आहे. दरम्यान, तेल कंपन्यांकडून १४.२ किलोग्रॅम वजनाच्या सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. कमर्शियल गॅस सिलेंडरचे वाढलेले दर आजपासून म्हणजेच १ नोव्हेंबर २०२४ पासून लागू होतील.


आज नोव्हेंबरचा पहिला दिवस आहे. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरचे दर ठरवले जातात. तेल कंपन्यांनी शुक्रवारपासून १९ किलोच्या कमर्शियल सिलेंडरच्या दरात ६२ रूपयांनी वाढ केली आहे.


दिल्लीमध्ये सिलेंडरचे दर - १७४० रूपयांवरून वाढून १८०२
कोलकातामध्ये सिलेंडरचे दर - १८५० रूपयांवरून वाढ १९११.५० रूपये
मुंबईत सिलेंडरचे दर - १६९२ रूपयांवरून वाढून १७५४ रूपये
चेन्नईत सिलेंडरचे दर - १९०३ रूपयांवरून वाढून १९६४ रूपये

Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च