LPG: ऐन दिवाळीत खिशाला ताण, ६२ रूपयांना महागला गॅस सिलेंडर

मुंबई: देशभरात दिवाळीचा उत्साह प्रचंड आहे. त्यात ऐन दिवाळीतच सामान्यांना मोठा झटका बसला आहे. दिवाळीला महागाईचा जोरदार झटका बसला आहे. लक्ष्मीपुजनाच्या दिवशीच म्हणजे १ नोव्हेंबरला गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे खिशाला चांगलाच फटका बसणार आहे.


१९ किलोग्रॅम वजनाच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. १९ किलोच्या कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात ६२ रूपयांची वाढ झाली आहे. दरम्यान, तेल कंपन्यांकडून १४.२ किलोग्रॅम वजनाच्या सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. कमर्शियल गॅस सिलेंडरचे वाढलेले दर आजपासून म्हणजेच १ नोव्हेंबर २०२४ पासून लागू होतील.


आज नोव्हेंबरचा पहिला दिवस आहे. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरचे दर ठरवले जातात. तेल कंपन्यांनी शुक्रवारपासून १९ किलोच्या कमर्शियल सिलेंडरच्या दरात ६२ रूपयांनी वाढ केली आहे.


दिल्लीमध्ये सिलेंडरचे दर - १७४० रूपयांवरून वाढून १८०२
कोलकातामध्ये सिलेंडरचे दर - १८५० रूपयांवरून वाढ १९११.५० रूपये
मुंबईत सिलेंडरचे दर - १६९२ रूपयांवरून वाढून १७५४ रूपये
चेन्नईत सिलेंडरचे दर - १९०३ रूपयांवरून वाढून १९६४ रूपये

Comments
Add Comment

'टायटॅनिक पोज' आणि 'उभं राहून बाईक' चालवणं पडलं महागात! मानसी पारेख आणि टिकू तल्सानियावर गुन्हा दाखल, व्हिडिओ व्हायरल

अहमदाबाद : अभिनेत्री मानसी पारेख (Manasi Parekh) आणि ज्येष्ठ अभिनेते टिकू तल्सानिया (Tiku Talsania) यांच्यावर अहमदाबादच्या

Mamta kulkarni : वाद वाढताच ममता कुलकर्णीचा 'यू-टर्न'; 'दाऊद दहशतवादी नाही' म्हणणारी अभिनेत्री आता म्हणाली...

'मी दाऊदबद्दल नाही, तर विकी गोस्वामीबद्दल बोलत होते...  अभिनयक्षेत्रातून अध्यात्माकडे वळलेली अभिनेत्री ममता

फेसबुक वापरल्याच्या क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या!

हाजीपूर, बिहार: बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील बिदुपूर पोलीस स्टेशन हद्दीत एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून

२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली: केंद्रीय

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे नवे सरन्यायाधीश; २४ नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून

भारताला सागरी रोजगाराचे जागतिक केंद्र बनवणार!

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला इंडिया मेरीटाईम वीकमध्ये विश्वास नवी दिल्ली : केंद्रीय