कांद्याचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा

पुणे: इंदापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील आठवडे बाजारात कांद्याचे दर वाढल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे दिवाळीच्या तोंडावर किराणा मालासह खाद्यतेलाच्या दराने अचानक उसळी घेतली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.


गेल्या दोन-तीन महिन्यांपूर्वी कांद्याचे दर प्रतिकिलो १० ते १५ रुपये असे होते. त्यात नुकतीच वाढ होत प्रतिकिलो कांदा २५ ते ३० रुपये दराने विक्री होत आहे. परतीचा पाऊस व बदलत्या हवामानामुळे हळव्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तसेच शेतकर्‍यांनी साठवलेला जुना गावरान कांदा संपला असल्याने दराने उसळी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना काहीसा दिलासा मिळत आहे. याशिवाय इतर भाजीपाल्याच्या किमतीतही वाढ झालेली आहे.

Comments
Add Comment

नवरात्र काळात महालक्ष्मी मंदिरास ५७.१९ लाख रुपयांचे दान

थेट देणगीद्वारे १८ लाख, तर लाडू विक्रीतून १७ लाख रुपये कोल्हापूर : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री

लाडकी बहीण योजना सुरूच राहणार - एकनाथ शिंदे

शिवसेनेतर्फे बुथप्रमुख कार्यशाळा, पदाधिकारी बैठक नाशिक : लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार असून बहिणींच्या

विरारमध्ये रो-रो फेरीबोट सेवा तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत, प्रवाशांची सुखरूप सुटका

विरार (पालघर): सफाळे ते विरार दरम्यान चालणारी रो-रो (Ro-Ro) फेरीबोट आज तांत्रिक बिघाडामुळे काही काळासाठी विस्कळीत

पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

पुणे (प्रतिनिधी) : पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. महापालिकेच्या ४१ प्रभागांमधून ५ हजार

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार भरीव मदत करणार – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

केंद्रीय मंत्री शाह यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा नूतनीकरण

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर