अयोध्येत दीपोत्सव, बनले दोन गिनीज रेकॉर्ड

मुंबई: या वर्षी अयोध्येमध्ये राम मंदिराचे उद्धाटन झाल्यानंतर पहिली दिवाळी साजरी केली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अयोध्येतील दिवाळी प्रसिद्ध आहे आणि यंदाच्या वर्षीही पुन्हा दिवाळी चर्चेत आली आहे. उत्तर प्रदेशने बुधवारी अयोध्येत दीपोत्सवादरम्यान दोन नवे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनले आहेत.


हे रेकॉर्ड सर्वाधिक लोकांनी दिवे पेटवले आणि सोबतच सगळ्यात मोठे तेलाचे दिवे लावल्याचे रेकॉर्ड बनले आहेत. २५, १२, ५८५ लाख दिवे लावत हा रेकॉर्ड उत्तर प्रदेश सरकारच्या पर्यटन विभाग आणि अयोध्येच्या जिल्हा प्रशासनाने बनवला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कार्यक्रमादरम्यान गिनीजच्या एका अधिकाऱ्याकडून सर्टिफिकेट घेतले.



२५ लाख दिव्यांची आरास


आठव्या दीपोत्सवादरम्यान शरयू नदीच्या किनारी २५ लाखाहून अधिक मातीचे दिवे लावण्यात आले. यामुळे सर्वाधिक दिवे लावण्याचा रेकॉर्ड बनला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की स्थानिक कारागिरांना दिव्यांची ऑर्डर देण्यात आली होती. आदित्यनाथ यांनी या समारंभाचे नेतृत्व केले आणि आपल्या मंत्रिमंडळाच्या सदस्यांसह काही दिवे लावत दीपोत्सवाचा शुभारंभ केला. या वर्षी २२ जानेवारीला रामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर हा पहिला दीपोत्सव होता.

Comments
Add Comment

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.