अयोध्येत दीपोत्सव, बनले दोन गिनीज रेकॉर्ड

मुंबई: या वर्षी अयोध्येमध्ये राम मंदिराचे उद्धाटन झाल्यानंतर पहिली दिवाळी साजरी केली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अयोध्येतील दिवाळी प्रसिद्ध आहे आणि यंदाच्या वर्षीही पुन्हा दिवाळी चर्चेत आली आहे. उत्तर प्रदेशने बुधवारी अयोध्येत दीपोत्सवादरम्यान दोन नवे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनले आहेत.


हे रेकॉर्ड सर्वाधिक लोकांनी दिवे पेटवले आणि सोबतच सगळ्यात मोठे तेलाचे दिवे लावल्याचे रेकॉर्ड बनले आहेत. २५, १२, ५८५ लाख दिवे लावत हा रेकॉर्ड उत्तर प्रदेश सरकारच्या पर्यटन विभाग आणि अयोध्येच्या जिल्हा प्रशासनाने बनवला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कार्यक्रमादरम्यान गिनीजच्या एका अधिकाऱ्याकडून सर्टिफिकेट घेतले.



२५ लाख दिव्यांची आरास


आठव्या दीपोत्सवादरम्यान शरयू नदीच्या किनारी २५ लाखाहून अधिक मातीचे दिवे लावण्यात आले. यामुळे सर्वाधिक दिवे लावण्याचा रेकॉर्ड बनला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की स्थानिक कारागिरांना दिव्यांची ऑर्डर देण्यात आली होती. आदित्यनाथ यांनी या समारंभाचे नेतृत्व केले आणि आपल्या मंत्रिमंडळाच्या सदस्यांसह काही दिवे लावत दीपोत्सवाचा शुभारंभ केला. या वर्षी २२ जानेवारीला रामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर हा पहिला दीपोत्सव होता.

Comments
Add Comment

Bolivia Plane Crash : बोलीवियात नोटांनी भरलेलं विमान थेट रस्त्यावर कोसळलं; १५ जणांचा जागीच मृत्यू, दुर्घटनेनंतर रस्त्यावर विखुरला पैशांचा खच!

दक्षिण अमेरिकेतील बोलीविया देशातून शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) एक अतिशय भीषण बातमी समोर आली. राजधानी ला पाझजवळील

प्रदूषणाच्या विळख्यात जीवनवाहिन्या?

४६ % नद्यांसोबतच गंगा-यमुनाही दूषित नवी दिल्ली : कोट्यवधी भारतीयांची जीवनवाहिनी आणि श्रद्धेचे प्रतीक असलेल्या

भारत-पाक सीमेवर 'प्रचंड' हेलिकॉप्टरमध्ये सह-वैमानिक म्हणून राष्ट्रपती मुर्मू यांनी रचला इतिहास

जयपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी राजस्थान मधील जैसलमेर येथे स्वदेशी हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर

RTO Rules Upadate : चालकांसाठी आरटीओचे 'हे' नवीन नियम; नितीन गडकरी यांची घोषणा

नवी दिल्ली : देशात रस्ते अपघातांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. गाड्यांच्या धडकेत निष्पाप नागरिक प्राण गमावत

Amit Shah : सीमांचलमधून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

सीमांचल भागातून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम सुरू केली जाईल, असे विधान करत केंद्रीय

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर