दिवाळीनिमित्त दुकानांमध्ये विकले जातेय भेसळयुक्त तूप, असा ओळखा फरक

मुंबई: दिवाळीचा सण एका दिवसावर येऊन ठेपला आहे. दिवाळी विविध पक्वानांची रेलचेल असते. मिठाई बनवली जाते. दिव्यांची आरास, रोषणाई केली जाते. सगळीकडे आनंदीआनंद असतो. ३१ ऑक्टोबरला संपूर्ण देशात दिवाळसणाचा खऱ्या अर्थाने सुरूवात होते आहे.


दिवाळीला लोक जे पदार्थ बनवतात तसेच घरामध्ये गोड पदार्थ बनवले जातात त्यावेळेस तुपाचा वापर केला जातो. मात्र दिवाळीच्या निमित्ताने अनेक दुकानांमध्ये भेसळयुक्त तूप विकले जाते. दिवाळीला तुपाची मागणी अधिक असते. यामुळे अधिक फायदा मिळवण्यासाठी दुकानदार भेसळयुक्त तूप विकतात.


भेसळयुक्त तुपाचा वापर केल्याने पदार्थांना चव येत नाहीच मात्र आरोग्यावर वाईट परिणाम होतो. भेसळयुक्त तुपामुळे तुमची तब्येतही खराब होऊ शकते. यामुळे तुम्ही जेव्हा बाजारात जाल तेव्हा जे तूप खरेदी करत आहात ते खरे आहे की खोटे याची तपासणी करा. खऱ्या तुपामध्ये छोटे छोटे दाण असतात. भेसळयुक्त तुपामध्ये असे नसते.


यासोबत तुम्हाला तूप गरम केल्यानंतरही त्याची तपासणी करता येते. यासाठी थोडे तूप घ्या ते गरम करा तर तूप लगेचच विरघळले आणि त्याचा रंग थोडासा तपकिरीसारखा झाला तर ते तूप खरे आहे. मात्र तूप वितळल्यासाठी वेळ घेत असेल आणि त्याचा रंग पिवळा झाल्यास त्यात भेसळ आहे.


याशिवाय तुम्ही आयोडिनने त्याची तपासणी करू शकता. यासाठी थोड्याशा तुपामध्ये आयोडिनचे काही थेंब टाका. जर तूप शुद्ध असेल तर त्यात कोणताही बदल होणार नाही मात्र जर तुपामध्ये भेसळ असेल तर त्याचा रंग व्हॉयलेट अथवा वांगी कलर होईल.

Comments
Add Comment

Sunetra Pawar : मोठी बातमी : सुनेत्रा पवार यांचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा!

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील एका मोठ्या पर्वाची आजपासून सुरुवात होत आहे. अजित पवार यांच्या निधनाने

होत्याच झालं नव्हतं... धावती लोकल पकडायला गेली अन्.....

बदलापूर : सकाळची प्रचंड गर्दीची वेळ आणि प्रत्येक जण वेळेवर लोकल पकडून कामावर वेळेवर जाणयासाठी धावपळ करत असतो. पण

Sunetra Pawar Live Updates : सुनेत्रा पवार यांची विधिमंडळाच्या गटनेतेपदी एकमताने निवड!

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत मोठी घडामोडी समोर येत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर आता त्यांच्या

Mumbai Local Accident : शीव स्थानकाजवळ लोकलमधून ३ प्रवाशांचा तोल गेला अन् थेट रुळांवर फेकले गेले; २ जण गंभीर जखमी तर एक...

मुंबई : मुंबईच्या लोकल प्रवासातील जीवघेणी गर्दी पुन्हा एकदा प्रवाशांच्या मुळावर उठली आहे. शुक्रवारी सकाळी ऐन

राज्यात नवीन रक्तपेढी सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

रक्तपिशव्यांचे संकलन करण्यासाठी हमीपत्राची गरज मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यात नवीन रक्तपेढी सुरू

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावरील वाहतूक बंद

मुंबई : नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याची कामे