दिवाळीनिमित्त दुकानांमध्ये विकले जातेय भेसळयुक्त तूप, असा ओळखा फरक

  69

मुंबई: दिवाळीचा सण एका दिवसावर येऊन ठेपला आहे. दिवाळी विविध पक्वानांची रेलचेल असते. मिठाई बनवली जाते. दिव्यांची आरास, रोषणाई केली जाते. सगळीकडे आनंदीआनंद असतो. ३१ ऑक्टोबरला संपूर्ण देशात दिवाळसणाचा खऱ्या अर्थाने सुरूवात होते आहे.


दिवाळीला लोक जे पदार्थ बनवतात तसेच घरामध्ये गोड पदार्थ बनवले जातात त्यावेळेस तुपाचा वापर केला जातो. मात्र दिवाळीच्या निमित्ताने अनेक दुकानांमध्ये भेसळयुक्त तूप विकले जाते. दिवाळीला तुपाची मागणी अधिक असते. यामुळे अधिक फायदा मिळवण्यासाठी दुकानदार भेसळयुक्त तूप विकतात.


भेसळयुक्त तुपाचा वापर केल्याने पदार्थांना चव येत नाहीच मात्र आरोग्यावर वाईट परिणाम होतो. भेसळयुक्त तुपामुळे तुमची तब्येतही खराब होऊ शकते. यामुळे तुम्ही जेव्हा बाजारात जाल तेव्हा जे तूप खरेदी करत आहात ते खरे आहे की खोटे याची तपासणी करा. खऱ्या तुपामध्ये छोटे छोटे दाण असतात. भेसळयुक्त तुपामध्ये असे नसते.


यासोबत तुम्हाला तूप गरम केल्यानंतरही त्याची तपासणी करता येते. यासाठी थोडे तूप घ्या ते गरम करा तर तूप लगेचच विरघळले आणि त्याचा रंग थोडासा तपकिरीसारखा झाला तर ते तूप खरे आहे. मात्र तूप वितळल्यासाठी वेळ घेत असेल आणि त्याचा रंग पिवळा झाल्यास त्यात भेसळ आहे.


याशिवाय तुम्ही आयोडिनने त्याची तपासणी करू शकता. यासाठी थोड्याशा तुपामध्ये आयोडिनचे काही थेंब टाका. जर तूप शुद्ध असेल तर त्यात कोणताही बदल होणार नाही मात्र जर तुपामध्ये भेसळ असेल तर त्याचा रंग व्हॉयलेट अथवा वांगी कलर होईल.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेचे अधिकारी कंटाळले प्रशासनाच्या कार्यपद्धतीला

रिक्त पदांअभावी अतिरिक्त कामांची जबाबदारी आणि चौकशीचा ससेमिरा मुंबई:मुंबई महापालिकेचा कारभारात आता

दादर स्थानक परिसरात पोलिसांना न जुमानता होतो व्यवसाय

पण गावातील महिलांना दिला जातो त्रास मुंबई :मुंबई महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त विद्यमान सध्या दादरसह इतर

छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ठिकाणांना भेट देण्यासाठी विशेष ट्रेन

भारत गौरव ट्रेन टूरला १०० टक्के बुकिंगसह प्रचंड प्रतिसाद नवी दिल्ली :इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम

ई-शिवनेरी बस सेवेला मुंबईकरांची कायम पसंती

महामंडळाच्या तिजोरीत जवळपास ५० कोटीं महसूल जमा मुंबई : ई-शिवनेरी मुंबईकरांची लाडकी बनली असून एसटीचा आधुनिक

समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या संख्येत वाढ

मुंबई :नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी – आमणे हा शेवटचा टप्पा गुरुवारी सायंकाळी वाहतूक सेवेत दाखल

शालेय बस चालकांची दर आठवड्याला होणार मद्यपान चाचणी

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्य शासनाचा निर्णय मुंबई : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय बस