दिवाळीनिमित्त दुकानांमध्ये विकले जातेय भेसळयुक्त तूप, असा ओळखा फरक

  77

मुंबई: दिवाळीचा सण एका दिवसावर येऊन ठेपला आहे. दिवाळी विविध पक्वानांची रेलचेल असते. मिठाई बनवली जाते. दिव्यांची आरास, रोषणाई केली जाते. सगळीकडे आनंदीआनंद असतो. ३१ ऑक्टोबरला संपूर्ण देशात दिवाळसणाचा खऱ्या अर्थाने सुरूवात होते आहे.


दिवाळीला लोक जे पदार्थ बनवतात तसेच घरामध्ये गोड पदार्थ बनवले जातात त्यावेळेस तुपाचा वापर केला जातो. मात्र दिवाळीच्या निमित्ताने अनेक दुकानांमध्ये भेसळयुक्त तूप विकले जाते. दिवाळीला तुपाची मागणी अधिक असते. यामुळे अधिक फायदा मिळवण्यासाठी दुकानदार भेसळयुक्त तूप विकतात.


भेसळयुक्त तुपाचा वापर केल्याने पदार्थांना चव येत नाहीच मात्र आरोग्यावर वाईट परिणाम होतो. भेसळयुक्त तुपामुळे तुमची तब्येतही खराब होऊ शकते. यामुळे तुम्ही जेव्हा बाजारात जाल तेव्हा जे तूप खरेदी करत आहात ते खरे आहे की खोटे याची तपासणी करा. खऱ्या तुपामध्ये छोटे छोटे दाण असतात. भेसळयुक्त तुपामध्ये असे नसते.


यासोबत तुम्हाला तूप गरम केल्यानंतरही त्याची तपासणी करता येते. यासाठी थोडे तूप घ्या ते गरम करा तर तूप लगेचच विरघळले आणि त्याचा रंग थोडासा तपकिरीसारखा झाला तर ते तूप खरे आहे. मात्र तूप वितळल्यासाठी वेळ घेत असेल आणि त्याचा रंग पिवळा झाल्यास त्यात भेसळ आहे.


याशिवाय तुम्ही आयोडिनने त्याची तपासणी करू शकता. यासाठी थोड्याशा तुपामध्ये आयोडिनचे काही थेंब टाका. जर तूप शुद्ध असेल तर त्यात कोणताही बदल होणार नाही मात्र जर तुपामध्ये भेसळ असेल तर त्याचा रंग व्हॉयलेट अथवा वांगी कलर होईल.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.