विधानसभा निवडणुकीसाठी आठ नगरसेवक; तर आधीच्या कार्यकाळातील पाच नगरसेवकांचा समावेश

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात आठ नगरसेवक आपले नशीब आजमावणार आहेत. २०१७ च्या कार्यकाळातील आठ नगरसेवक आणि त्याआधीच्या कार्यकाळातील पाच नगरसेवक यंदा निवडणुकीत उभे राहणार आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील ३६ मतदारसंघांसाठी आतापर्यंत सर्व राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार दिले आहेत. या उमेदवारांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या २०१७ च्या कार्यकाळातील आठ नगरसेवक निवडणूकीसाठी उभे राहणार आहेत. आधीच्या कार्यकाळातील मिळून डझनभर माजी नगरसेवक निवडणुकीत आपले नशीब आजमावणार आहेत.


शिवसेना ठाकरे गटाचे सर्वाधिक माजी नगरसेवक असून त्यात श्रद्धा जाधव (वडाळा), अनंत नर (जोगेश्वरी पूर्व), प्रवीणा मोरजकर (कुर्ला), मनोज जामसुतकर (भायखळा), समीर देसाई (गोरेगाव), उदेश पाटेकर (मागाठाणे) यांचा समावेश आहे. तर ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी वर्सोवामधून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. राष्ट्रवादी (शरद पवार)च्या राखी जाधव (घाटकोपर पूर्व), महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे (वरळी), स्नेहल जाधव (वडाळा), भाजपचे विनोद शेलार (मालाड पश्चिम), कॉंग्रेसमधून आसिफ झकेरिया (वांद्रे पश्चिम), शिवसेना (शिंदे) मुरजी पटेल (अंधेरी पूर्व), सुवर्णा करंजे (विक्रोळी) या नगरसेवकांचा समावेश आहे.


गेल्या विधानसभा निवडणूकीत २०१९ मध्ये चार नगरसेवक आमदार बनले होते. त्यामध्ये यामिनी जाधव (भायखळा), दिलीप लांडे (चांदिवली), रमेश कोरगावकर (भांडूप), पराग शाह (घाटकोपर पूर्व) यांचा समावेश होता.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.