नाशिकमध्ये फिरत होता तोतया आयपीएस अधिकारी!

नाशिक: नाशिकमध्ये तोतया आयपीएस (IPS) अधिकारी बनून एका व्यावसायकाची १ कोटीहून अधिक रकमेची फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली आहे. नाशिक मधील अंबड पोलीस स्टेशन हद्दीत हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, आरोपीने बनावट ओळखपत्रं दाखवून रेल्वेचं बनावट टेंडर मिळवून देण्याचं अमिष दाखवून ही फसवणूक केल्याचं समोर आले आहे. इतकंच नव्हे तर आरोपीने पीडित व्यावसायिकांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून खंडणीची मागणी केल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे. या प्रकरणी तोतया आयपीएस अधिकाऱ्याला अंबड पोलिसांनी अटक केली आहे.

कशा प्रकारे उघड झाला गैरप्रकार?


विठ्ठल सखाराम वाकडेंनी अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे, आरोपी गौरव अच्छेराम मिश्रा याने २०१८ मध्ये त्यांच्याशी ओळख करून घेतली. आरोपी मिश्रा हा स्वतःला भारतीय पोलीस सेवेतील (IPS) अधिकारी असल्याचं भासवत होता. तो नेहमी पोलीस गणवेश परिधान करून लाल-निळ्या दिव्यांची गाडीतून फिरत असे. त्याने आपल्याकडे शासनाने दिलेले सुरक्षा रक्षक असल्याचं दाखवून वाकडे यांचा विश्वास संपादन केला. मिश्रा याने वाकडे यांना रेल्वेचे बनावट टेंडर मिळवून देण्याचं अमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळल्याचंही समोर आलं आहे.
Comments
Add Comment

‘हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस’ची स्टार कास्ट ‘कौन बनेगा करोड़पति’च्या सेटवर

मुंबई : आमिर खान प्रोडक्शन्सची आगामी मनोरंजक चित्रपट हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस आपल्या खास ऊर्जा आणि खुमासदार

सरत्या वर्षाला द्या निरोप , प्रियजनांना द्या २०२६ नववर्षाच्या हटके शुभेच्छा!

आज संपूर्ण जगभरात मध्यरात्री सर्वजण सरत्या वर्षाला निरोप दिला जातो. २०२६ नवीन वर्षाचे स्वागत केले जाईल. सरत्या

‘हॅप्पी न्यू इयर’चा एक मेसेज करू शकतो बँक खाते रिकामे

सफाळे पोलिसांकडून सायबर स्कॅमबाबत हाय अलर्ट सफाळे : नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह सर्वत्र असतानाच, सायबर

भाजप जिल्हाध्यक्षांसह मंडळ अध्यक्षांना संधी

संघटनातील अनेक पदाधिकाऱ्यांना उमेदवारी गणेश पाटील विरार : वसई-विरार महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता

आज मध्यरात्री उशिरापर्यंत धावणार 'मेट्रो १'

मुंबईकरांना इच्छितस्थळी जाणे सुकर होणार मुंबई : घाटकोपर,वर्सोवा,अंधेरी मेट्रो-१ मार्गिकेवरील सेवा उद्या

१ ते ३१ जानेवारी दरम्यान राज्यात ‘रस्ता सुरक्षा अभियान’

मुंबई : रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती