आधी केली आईची हत्या नंतर आत्महत्येचा प्रयत्न, मुंबईतील धक्कादायक घटना

मुंबई: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील वरळी भागातील एका मुलाने आपल्या आईची हत्या केली आणि त्यानंतर आपल्या हाताची नस कापत आत्महत्येचा प्रयत्न केला.


वरळी येथे राहणारे ५० वर्षीय बालसुब्रमण्यम कृपास्वामी मुंबईत आपली पत्नी आणि मुलीसह राहत होते. कधी कधी ते त्याच भागात राहणाऱ्या आपल्या आईला भेटायला येत असतं. २६ ऑक्टोबरला शनिवारी दुपारीही बालसुब्रमण्यम आपल्या आईला भेटायला गेले. त्यानंतर उशीने तोंड दाबून त्यांनी तिची हत्या केली. त्यानंतर हाताची नस कापली.



काय लिहिले सुसाईड नोटमध्ये


बालासुब्रमण्यम यांनी चार पानांची सुसाईड नोट लिहिले. यात त्यांनी कर्जामुळे बेजार झाल्याने हे पाऊल उचलल्याचे म्हटले आहे. सुसाईड नोटमध्ये त्यांनी लिहिले की माझ्याकडे कोणतेही काम नाही आहे आणि मी पूर्णपणे कर्जात बुडालो आहे. मी कर्जाचा ईएमआय चुकता करू शकत नाही यामुळे मी माझी आई आणि माझे जीवन संपवत आहे.


बालसुब्रमण्यम यांची स्थिती चिंताजन असून त्यांच्यावर वोकहार्ट येथे उपचार सुरू आहेत. बालसुब्रमण्यम यांची पत्नी आणि मुलीशी पोलिसांनी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र ते त्या स्थितीत नाही.पोलिसांनी या प्रकरणी केस दाखल केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

Comments
Add Comment

सायन प्रतीक्षा नगर येथील चार इमारती अतिधोकादायक घोषित

सायन प्रतीक्षानगर येथील म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरातील चार इमारती

मुंबईतील ३८८ म्हाडा पुनर्रचित इमारतींचा पुनर्विकास समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून होणार

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या

महापालिका शाळांमधील मुलांचे व्याकरण होणार अधिक मजबूत

इयत्ता पाचवी ते आठवीच्या मुलांना देणार व्याकरणाची पुस्तके मुंबई (खास प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांचे भाषेच्या

मुंबई–वाढवण प्रवासाला नवे पंख; कसा असेल वाढवण बंदराशी जोडणारा उन्नत पूल?

मुंबई : मुंबई ते वाढवण बंदरापर्यंतचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुलभ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दक्षिण

बिबट्याच्या दहशतीवर उपाययोजना करण्याची मागणी

मुंबई: ग्रामीण महाराष्ट्रातील बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना

पद्मभूषण सन्मानित धर्मेंद्र यांना शासकीय अंत्यसंस्कार नाहीत; खरे कारण समोर

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले असून, त्यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले