आधी केली आईची हत्या नंतर आत्महत्येचा प्रयत्न, मुंबईतील धक्कादायक घटना

मुंबई: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील वरळी भागातील एका मुलाने आपल्या आईची हत्या केली आणि त्यानंतर आपल्या हाताची नस कापत आत्महत्येचा प्रयत्न केला.


वरळी येथे राहणारे ५० वर्षीय बालसुब्रमण्यम कृपास्वामी मुंबईत आपली पत्नी आणि मुलीसह राहत होते. कधी कधी ते त्याच भागात राहणाऱ्या आपल्या आईला भेटायला येत असतं. २६ ऑक्टोबरला शनिवारी दुपारीही बालसुब्रमण्यम आपल्या आईला भेटायला गेले. त्यानंतर उशीने तोंड दाबून त्यांनी तिची हत्या केली. त्यानंतर हाताची नस कापली.



काय लिहिले सुसाईड नोटमध्ये


बालासुब्रमण्यम यांनी चार पानांची सुसाईड नोट लिहिले. यात त्यांनी कर्जामुळे बेजार झाल्याने हे पाऊल उचलल्याचे म्हटले आहे. सुसाईड नोटमध्ये त्यांनी लिहिले की माझ्याकडे कोणतेही काम नाही आहे आणि मी पूर्णपणे कर्जात बुडालो आहे. मी कर्जाचा ईएमआय चुकता करू शकत नाही यामुळे मी माझी आई आणि माझे जीवन संपवत आहे.


बालसुब्रमण्यम यांची स्थिती चिंताजन असून त्यांच्यावर वोकहार्ट येथे उपचार सुरू आहेत. बालसुब्रमण्यम यांची पत्नी आणि मुलीशी पोलिसांनी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र ते त्या स्थितीत नाही.पोलिसांनी या प्रकरणी केस दाखल केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

Comments
Add Comment

खोदलेले चर बुजवण्यात कंत्राटदारांची हातचलाखी

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक रस्ते आणि पदपथाखालून विविध सेवा सुविधांचे जाळे जात असून यामध्ये तांत्रिक

वांद्रे पश्चिममधील एस. व्ही. रोडवरील त्या तुंबणाऱ्या पावसाच्या पाण्यापासून मिळणार मुक्ती

मुंबई (सचिन धानजी) : वांद्रे पश्चिम येथील एस व्ही रोड आणि के.सी मार्गावर पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या वारंवारच्या

ब्रिटिशकालीन १२ वर्षांच्या पुलाचा शेवट; रेल्वे ट्रॅकवरील काम जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई: मुंबईतील ११२ वर्षांचा जुना आणि महत्त्वाचा ब्रिटिशकालीन रस्ता पूल, एलफिन्स्टन पूल पाडण्याच्या कामाचा

मविआच्या दुटप्पी भूमिकेची पोलखोल करण्यासाठी भाजपचे आंदोलन

निवडणुकांच्या तोंडावर फेक नरेटिव्हचा 'मविआ' चा कट उधळून लावा – भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण मुंबई: आगामी

वेध निवडणुकीचा : कलिना आणि वांद्रे पूर्व भाजपसाठी अनुकूल; २० ते २२ नगरसेवक निवडून येतील

उत्तर मध्य भाजप जिल्हाध्यक्ष विरेंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केला विश्वास सचिन धानजी मुंबई : मुंबई उत्तर मध्य

मुंबईत राजकीय रणकंदन पेटले! विरोधकांच्या ‘सत्याचा मोर्चा’ला भाजपचे 'मूक आंदोलन' करत जशास तसे प्रत्युत्तर

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि मतदार यादीतील मोठ्या गोंधळावर आक्षेप घेत, आज (दि. १) मुंबईत महाविकास