आधी केली आईची हत्या नंतर आत्महत्येचा प्रयत्न, मुंबईतील धक्कादायक घटना

मुंबई: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील वरळी भागातील एका मुलाने आपल्या आईची हत्या केली आणि त्यानंतर आपल्या हाताची नस कापत आत्महत्येचा प्रयत्न केला.


वरळी येथे राहणारे ५० वर्षीय बालसुब्रमण्यम कृपास्वामी मुंबईत आपली पत्नी आणि मुलीसह राहत होते. कधी कधी ते त्याच भागात राहणाऱ्या आपल्या आईला भेटायला येत असतं. २६ ऑक्टोबरला शनिवारी दुपारीही बालसुब्रमण्यम आपल्या आईला भेटायला गेले. त्यानंतर उशीने तोंड दाबून त्यांनी तिची हत्या केली. त्यानंतर हाताची नस कापली.



काय लिहिले सुसाईड नोटमध्ये


बालासुब्रमण्यम यांनी चार पानांची सुसाईड नोट लिहिले. यात त्यांनी कर्जामुळे बेजार झाल्याने हे पाऊल उचलल्याचे म्हटले आहे. सुसाईड नोटमध्ये त्यांनी लिहिले की माझ्याकडे कोणतेही काम नाही आहे आणि मी पूर्णपणे कर्जात बुडालो आहे. मी कर्जाचा ईएमआय चुकता करू शकत नाही यामुळे मी माझी आई आणि माझे जीवन संपवत आहे.


बालसुब्रमण्यम यांची स्थिती चिंताजन असून त्यांच्यावर वोकहार्ट येथे उपचार सुरू आहेत. बालसुब्रमण्यम यांची पत्नी आणि मुलीशी पोलिसांनी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र ते त्या स्थितीत नाही.पोलिसांनी या प्रकरणी केस दाखल केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

Comments
Add Comment

वेध निवडणुकीचे : धारावीमध्ये फुलणार भाजपचे कमळ

मुंबई(सचिन धानजी) : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील धारावी विधानसभा क्षेत्रात भाजपचा एकही नगरसेवक निवडून

'अंधेरी - घाटकोपर जोड मार्गावरील उड्डाणपुलाच्‍या बांधकामामुळे बाधित होणा-या पात्र रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा'

महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे प्रत्‍यक्ष पाहणी दौ-यादरम्‍यान निर्देश मुंबई (खास

देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील जैव खाणकामासाठी नवयुग इंजिनिअरींगची निवड

बायोमायनिंग प्रकल्पासाठी तब्बल ३०३५ कोटी रुपये होणार खर्च मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्यावतीने देवनार

मेट्रो ३ ने दाखवली ‘स्पीड’ची ताकद : पहिल्याच दिवशी ऐतिहासिक प्रतिसाद!

मुंबई : मुंबईकरांनी मेट्रो ३, म्हणजेच अ‍ॅक्वा लाईनला दिलेला प्रतिसाद पाहता हा प्रकल्प खऱ्या अर्थाने यशस्वी ठरत

ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक व त्रैमासिक पास योजना सुरु

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळाने) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक

डिजिटल क्रांतीद्वारे भारताची जागतिक महासत्तेकडे वाटचाल

मुंबई : डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून भारत आत्मनिर्भरतेकडून जागतिक महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. या