आधी केली आईची हत्या नंतर आत्महत्येचा प्रयत्न, मुंबईतील धक्कादायक घटना

मुंबई: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील वरळी भागातील एका मुलाने आपल्या आईची हत्या केली आणि त्यानंतर आपल्या हाताची नस कापत आत्महत्येचा प्रयत्न केला.


वरळी येथे राहणारे ५० वर्षीय बालसुब्रमण्यम कृपास्वामी मुंबईत आपली पत्नी आणि मुलीसह राहत होते. कधी कधी ते त्याच भागात राहणाऱ्या आपल्या आईला भेटायला येत असतं. २६ ऑक्टोबरला शनिवारी दुपारीही बालसुब्रमण्यम आपल्या आईला भेटायला गेले. त्यानंतर उशीने तोंड दाबून त्यांनी तिची हत्या केली. त्यानंतर हाताची नस कापली.



काय लिहिले सुसाईड नोटमध्ये


बालासुब्रमण्यम यांनी चार पानांची सुसाईड नोट लिहिले. यात त्यांनी कर्जामुळे बेजार झाल्याने हे पाऊल उचलल्याचे म्हटले आहे. सुसाईड नोटमध्ये त्यांनी लिहिले की माझ्याकडे कोणतेही काम नाही आहे आणि मी पूर्णपणे कर्जात बुडालो आहे. मी कर्जाचा ईएमआय चुकता करू शकत नाही यामुळे मी माझी आई आणि माझे जीवन संपवत आहे.


बालसुब्रमण्यम यांची स्थिती चिंताजन असून त्यांच्यावर वोकहार्ट येथे उपचार सुरू आहेत. बालसुब्रमण्यम यांची पत्नी आणि मुलीशी पोलिसांनी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र ते त्या स्थितीत नाही.पोलिसांनी या प्रकरणी केस दाखल केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

Comments
Add Comment

नवी मुंबई एअरपोर्टला मिळणार गोल्डन लाईन; मेट्रो ८ द्वारे जोडली जाणार 'ही' स्थानके

नवी मुंबई : नवी मुंबई एअरपोर्ट पर्यंतचा प्रवास आता आणखी सुसाट होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या

आयएसएफ २०२५ अंतर्गत ‘वन इनोव्हेशन’ राष्ट्रीय स्पर्धेत अरजित मोरे विजेता

मुंबई  : महाराष्ट्रातील इयत्ता ८ वी चा विद्यार्थी अरजित अमोल मोरे यांची ‘वन इनोव्हेशन – टुवर्ड्स अ सेल्फ रिलायंट

जिगरबाज सैनिकांसाठी मनोरंजन मेजवानी

देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना सीमेवर जाऊन सांस्कृतिक 'सलामी ' मुंबई  : प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सीमेवर तैनात

मुंबईतील ९ विधानसभांमध्ये उबाठाचे 'शून्य' नगरसेवक

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष हा उबाठा ठरला असला तरी प्रत्यक्षात मुंबईतील ०९

विद्याविहार रेल्वे पूल येत्या ३१ मे २०२६ पर्यंत होणार पूर्ण, पूर्व दिशेकडील कामे २८ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण होणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पूर्व उपनगरातील पूर्व व पश्चिम यांना जोडणारा विद्याविहार रेल्वे स्थानकावरील

सोशल मीडिया वापरासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना निर्बंध, फेसबुक-एक्सवर पोस्ट कर्मचाऱ्यांना महागात पडणार

मुंबई : राज्य शासनाचे कर्मचारी आपल्या वैयक्तिक सोशल मीडिया अकाऊंटवर गणवेशातील फोटो, कार्यालयाचे लोगो, पदनाम,