विक्रमगडचा गड राखणार कोण..?

महाविकास आघाडी,महायुतीत चुरशीची लढत होणार


मोखाडा : विक्रमगड विधानसभा मतदारसंघ हा ग्रामीण भागातील मतदार संघ असून आजमितीला जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्रे याच मतदारसंघातून सुरू आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर वर्चस्व मिळविण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी प्रयत्नशील आहेत.२००९ आणि २०१४ ही दोन दशके विक्रमगड मतदारसंघ भाजपा बालेकिल्ला राहिलेला होता. मात्र,२०१९च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे सुनील भुसारा यांनी मंत्री पुत्र विद्यमान खासदार डॉ.हेमंत सावरा यांचा मोठ्या फरकाने पराभव करून भाजपाचा बालेकिल्ला ढासळला होता.परंतु गेलेला विक्रमगडचा गड पुन्हा जिंकण्यासाठी महायुतीने कंबर कसली असून तुल्यबळ उमेदवार देऊन विजयश्री मिळविण्यासाठी योग्य उमेदवार कोण ? असणार हे अजूनही घोषित केलेले.यामुळे महायुतीतील इच्छुक उमेदवारांच्या भुवया उंचावल्या आहेत.


२०१४ च्या निवडणुकीत विक्रमगड विधानसभेत एकूण मतदारांची संख्या २,४६,४३१ होती. यापैकी १,६५,५२४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता तर ८०,९०७ मतदारांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरवली होती. या निवडणुकीत भाजपाचे विष्णू सावरा यांना ४०,२०१ मते मिळाली होती तर शिवसेनेचे प्रकाश निकम यांना ३६,३५६ मत मिळाली होती. तसेच आताचे विद्यमान आमदार सुनील भुसारा यांना तिसऱ्या क्रमांकाची ३२,०५३ इतकीच मत मिळाली होती.या निवडणुकीत विष्णू सावरा यांनी शिवसेनेचे उमेदवार प्रकाश निकम यांचा ३८४५ मतांनी पराभव केला होता.चौथ्या क्रमांकावर बहुजन विकास आघाडीचे हेमंत गोविंद यांना १८०८५ एवढी मत मिळाली होती.मात्र २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या रणांगणाचे चित्र पुर्ण बदलून गेले आणि भाजपाच्या परंपरागत बालेकिल्ल्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुनील भुसारा यांनी सुरुंग लावून आपला विजयश्री खेचून आणला होता.


२०१९ च्या निवडणुकीत विक्रमगड विधानसभेत एकूण मतदारांची संख्या २,६६,५७६ होती यापैकी १,८२,८४१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.तर ८३,७३५ मतदारांनी मतदान केंद्राकडे पाठफिरवली होती.या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे सुनील भुसारा यांना ८८,४२५ मत मिळाली होती.तर भाजपाचे हेमंत सावरा यांना ६७,०२६ एवढी मत मिळाली होती.या निवडणुकीत सुनील भुसारा यांनी २१ हजार ३९९ मतांनी भाजपाचे हेमंत सावरा यांचा पराभव केला होता.निवडणुकीत चर्चेचा केंद्रबिंदू ठरला तो म्हणजे तिसऱ्या क्रमांकाची ८ हजार ४९५ मते कोण्या एका राजकीय पक्षांच्या नेत्याला न मिळता नोटा समोरील बटण दाबून मतदार राजाने आपली नाराजगी व्यक्त केली होती.त्यामुळे याही निवडणुकीत मतदारांना आपला योग्य उमेदवार आवडतो का ? की मागील निवडणुकीतील नोटांच्या मताची आकडेवारी वाढते की काय अशी शंका उपस्थित होत आहे.


यावर्षीच्या ही निवडणुकीत महाविकास आघाडी कडून इच्छुकांची गर्दी नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे तिकीट विद्यमान आमदार सुनील भुसारा यांना मिळाले असून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.मात्र महायुती मध्ये भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी दावेदारी दाखल केल्यामुळे विक्रमगड विधानसभेतील महायुतीचा तिढा अजूनही सुटलेला नाही..

Comments
Add Comment

Intelligence Bureau : पालघरमध्ये 'इंटेलिजन्स ब्युरो'साठी हक्काची जागा

- महसूल विभागाचा मोठा निर्णय; वसईत कार्यालय आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा मुंबई : पालघर जिल्ह्याच्या

Cyclone Shelter Center in Dapoli : दापोली तालुक्यातील चक्रीवादळ निवारा केंद्रासाठी महसूलकडून विनामूल्य जागा

मुंबई : कोकण किनारपट्टीवरील आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला

Onion processing industry: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा प्रक्रिया उद्योगास चालना देणार - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा दरातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळून स्पर्धात्मक दर मिळावा,

Industries Minister Dr. Uday Samant : पांढरकवडा येथे 86 हेक्टरवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापनेला गती - उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केळापूर तालुक्यातील मौजे

Industries Minister Dr. Uday Samant - 'एमआयडीसी’कडे लवकरच हस्तांतरित करणार : उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरन येथील 250 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी

Ashok Kharat : 'लक्ष्मण' ते भोंदूबाबा 'अशोक खरात'; ४० वर्षांपूर्वीच गावकऱ्यांनी दिला होता बेदम चोप!

अहिल्यानगर : महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या अशोक खरात याच्या कृत्यांची मुळं चाळीस