ज्येष्ठांना १० नोव्हेंबरपासून घरातूनच करता येईल मतदान

  107

सोलापूर: विधानसभा निवडणुकीसाठी ८५ वर्षांवरील ज्येष्ठांना घरबसल्या मतदान करता येणार आहे, पण त्यासाठी त्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे एक अर्ज द्यावा लागतो. तो अर्ज देण्याची मुदत २२ ते २६ ऑक्टोबरपर्यंत आहे. घरबसल्या मतदान करण्याचा पर्याय निवडलेल्या ज्येष्ठांना १० नोव्हेंबरपासून मतदान करता येणार आहे. त्यासाठी चौघांचे पथक त्यांच्या घरी जाईल. सोलापूर जिल्ह्यात ८५ वर्षांवरील ५२ हजार ७९६ मतदार आहेत.२०१९च्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, माळशिरस, करमाळा, बार्शी या चार मतदारसंघातील आमदार अवघ्या पाच हजारापेक्षा कमी मताने विजयी झाले होते. त्या निवडणुकीतील बहुतेक विजयी उमेदवारांचे मताधिक्य पाहता यंदाच्या निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघातील लढती काठावरील आहेत, त्या उमेदवारांसाठी ८५ वर्षांवरील ज्येष्ठांचे मतदान निर्णायक ठरणार आहे.

करमाळा, माढा, बार्शी, मोहोळ, पंढरपूर या पाच मतदारसंघातील ८५ वर्षांवरील मतदारांची संख्या पाच ते सहा हजारांपर्यंत आहे. त्यामुळे या मतदारांची यादी घेऊन उमेदवार त्यांच्यापर्यंत पोचण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतील. यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांची संख्या, बंडखोरी पाहता ज्येष्ठांच्या मताला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे.
Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या