चंद्रकांत पाटलांचे रोहिणी खडसेंना आव्हान

जळगाव (प्रतिनिधी) : राज्यात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार असून, सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मुक्ताईनगरमध्ये चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. आज मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चंद्रकांत पाटील यांची राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार रोहिणी खडसे यांच्यासोबत लढत होणार आहे. ४० वर्षांनंतर प्रथमच मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेकडे आली आहे.


मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाची उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मुक्ताईनगरमध्ये महायुतीच्या मेळाव्यात चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती, तर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार असून त्यांच्या विरोधात चंद्रकांत पाटलांची लढत होणार आहे. एकनाथ खडसे यांचं या मतदारसंघावर एक हाती वर्चस्व होते. मात्र, एकनाथ खडसेंचा हा गड भेदण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारीचा शुभारंभ हा मुक्ताईनगरमध्ये केला आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

शरद पवार गटाच्या सूर्यकांत मोरेंकडून विधिमंडळ सभागृहाचा अवमान

मुंबई : शरद पवार गटाचे सूर्यकांत मोरे यांनी दोन दिवसांपूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे झालेल्या सभेत

नवनीत राणांनी व्यक्त केली खासदार होण्याची इच्छा, मुख्यमंत्र्यांनी दिलं हे उत्तर

अमरावती : अमरावतीच्या धारणी नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील चोथमल आणि धारणीमधील भाजपच्या सर्व

शिवकुमारांचा संयम की सिद्धरामय्यांचा निर्धार! कर्नाटकच्या राजकारणात खळबळ सुरू असल्याचे चिन्हं

कर्नाटक: कर्नाटक काँग्रेसमधील सत्तावाटपाचा वाद पुन्हा एकदा तापला आहे. सत्तेत परतल्यानंतर २०२३ मध्ये,

'विकास आणि संस्कृतीला समान महत्त्व देत कार्य करणार'

त्र्यंबकेश्वर (प्रतिनिधी) : कुंभमेळ्यासाठी जगभरातून लाखो-कोट्यवधी भाविक नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये येणार

लातूरमध्ये नगरपंचायत निवडणुकीत शिउबाठाला मोठा धक्का; ११ उमेदवारांनी घेतली माघार

लातूर : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण गोंधळले

१२ वर्षांचा दुरावा संपला; दानवे–लोणीकर पुन्हा एकत्र, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

जालना : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम वाढत असताना जालना जिल्ह्यातील एक मोठी राजकीय घडामोड