‘त्या’ १२ जागांमुळे सुटेना महायुतीच्या जागावाटपाचा तिढा

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात महायुतीत २७६ जागांवर बोलणी पूर्ण झाली आहेत. परंतु अद्याप सुमारे १२ जागांचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळेच अद्याप महायुतीने आपले जागावाटप जाहीर केलेले नाही. दरम्यान, गुरुवारी गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सुमारे २५ जागांचा वाद मिटल्याची माहिती आहे. उर्वरित जागांपैकी काहींवर भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्यात रस्सीखेच सुरू आहे, तर काहींवर भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यात चर्चा सुरू आहे. याशिवाय ४ ते ५ जागा अशा आहेत ज्यावर भाजप, शिवसेना आणि अजित राष्ट्रवादी तिघांनी दावा केला आहे.


पालघर, बोईसर, वसई, नालासोपारा याबाबत भाजप आणि शिवसेना यांच्यात अद्याप एकमत होऊ शकलेले नाही, तर बडगाव शेरी, आष्टी आणि तासगावच्या जागांवर भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये एकमत झाले नाही. या जागांसाठीचे उमेदवार परस्पर संमतीने ठरवावेत, उमेदवारांची संख्याबळ आणि त्यांच्या विजयाची प्रबळ शक्यता लक्षात घेऊन उमेदवार निश्चित करावेत, अशा सूचना गृहमंत्र्यांनी दिल्या आहेत.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. भाजप सुमारे १५५/१५६ जागांवर, शिवसेना सुमारे ८२/८३ जागांवर आणि राष्ट्रवादी ५०/५१ जागांवर निवडणूक लढवणार आहे. मात्र, राज्यातील ३१ विधानसभा जागांबाबत महायुती चिंतेत आहे. महायुतीसमोर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई उपनगरच्या जागा आहेत, जिथे महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत आघाडी घेतली होती.


गेल्या विधानसभा (२०१९) च्या आकडेवारीवर नजर टाकली तर, महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८ जागांपैकी ३१ जागा अशा होत्या, जिथे विजय आणि पराभवाचा फरक पाच हजार मतांपेक्षा कमी होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निकराच्या लढतीत या ३१ पैकी महायुतीने १५ तर महाविकास आघाडीने १६ जागा जिंकल्या होत्या. यावेळी विधानसभा निवडणुकीत या जागांवर महायुतीचा आकडा सुधारण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

Comments
Add Comment

Jayant Patil : अजित दादांची 'ती' इच्छा अधुरीच...राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत जयंत पाटलांचा मोठा खुलासा!

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी

Amravati News : आयआरबीची मलमपट्टी, प्रवाशांच्या जिवाशी खेळ! नांदगाव पेठमध्ये भरवस्तीत उड्डाण पुलाचे काँक्रिट कोसळले

अमरावती : राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव पेठ येथे आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या (IRB) निकृष्ट कामाचा नमुना

Sunetra Pawar : मी सुनेत्रा अजित पवार...उद्या राज्याला मिळणार पहिली महिला उपमुख्यमंत्री ?

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील आकस्मिक निधनामुळे राज्याच्या मंत्रिमंडळात मोठी

Sunil Tatkare : सुनेत्रा पवार आणि मुलांशी चर्चा करूनच उपमुख्यमंत्रिपदावर होणार शिक्कामोर्तब; सुनील तटकरेंनी दिले स्पष्ट संकेत

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये

राज्यातील 'आयटीआय' होणार 'स्किल डेव्हलमपेंट हब'

मंत्री मंगल प्रभात लोढा; पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे जिल्ह्याचा समावेश मुंबई : पंतप्रधान

Rohit Pawar : दादा… कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय… Love U दादा! 'त्या' एका मिठीसाठी व्याकुळ झाला पुतण्या

मुंबई : राज्याच्या राजकारणातील एक शिस्तप्रिय, धडाडीचे आणि अत्यंत कार्यक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे