‘त्या’ १२ जागांमुळे सुटेना महायुतीच्या जागावाटपाचा तिढा

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात महायुतीत २७६ जागांवर बोलणी पूर्ण झाली आहेत. परंतु अद्याप सुमारे १२ जागांचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळेच अद्याप महायुतीने आपले जागावाटप जाहीर केलेले नाही. दरम्यान, गुरुवारी गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सुमारे २५ जागांचा वाद मिटल्याची माहिती आहे. उर्वरित जागांपैकी काहींवर भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्यात रस्सीखेच सुरू आहे, तर काहींवर भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यात चर्चा सुरू आहे. याशिवाय ४ ते ५ जागा अशा आहेत ज्यावर भाजप, शिवसेना आणि अजित राष्ट्रवादी तिघांनी दावा केला आहे.


पालघर, बोईसर, वसई, नालासोपारा याबाबत भाजप आणि शिवसेना यांच्यात अद्याप एकमत होऊ शकलेले नाही, तर बडगाव शेरी, आष्टी आणि तासगावच्या जागांवर भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये एकमत झाले नाही. या जागांसाठीचे उमेदवार परस्पर संमतीने ठरवावेत, उमेदवारांची संख्याबळ आणि त्यांच्या विजयाची प्रबळ शक्यता लक्षात घेऊन उमेदवार निश्चित करावेत, अशा सूचना गृहमंत्र्यांनी दिल्या आहेत.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. भाजप सुमारे १५५/१५६ जागांवर, शिवसेना सुमारे ८२/८३ जागांवर आणि राष्ट्रवादी ५०/५१ जागांवर निवडणूक लढवणार आहे. मात्र, राज्यातील ३१ विधानसभा जागांबाबत महायुती चिंतेत आहे. महायुतीसमोर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई उपनगरच्या जागा आहेत, जिथे महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत आघाडी घेतली होती.


गेल्या विधानसभा (२०१९) च्या आकडेवारीवर नजर टाकली तर, महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८ जागांपैकी ३१ जागा अशा होत्या, जिथे विजय आणि पराभवाचा फरक पाच हजार मतांपेक्षा कमी होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निकराच्या लढतीत या ३१ पैकी महायुतीने १५ तर महाविकास आघाडीने १६ जागा जिंकल्या होत्या. यावेळी विधानसभा निवडणुकीत या जागांवर महायुतीचा आकडा सुधारण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात गारठा वाढला, काही भागांत पावसाची शक्यता!

पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या 'दितवाह' चक्रीवादळाचा परिणाम देशभर जाणवू लागला असून, अनेक राज्यांमध्ये

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक; २ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी

मुंबई : नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होत असून, मतदानासाठी

मुलगा व्हावा म्हणून छळ; पैशांच्या मागणीला कंटाळून २५ वर्षीय गर्भवतीची आत्महत्या

नांदेड : मुलाच्या हव्यासापोटी आणि पैशांच्या सततच्या मागणीमुळे त्रस्त झालेल्या २५ वर्षीय गर्भवती विवाहितेने

राज्यात तीन दिवसांसाठी ड्राय-डे

नवी दिल्ली : राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी आजपासून तीन दिवसांसाठी ड्राय डे असणार आहे.

मतदानाच्या तोंडावर २० जिल्ह्यांत तारखांमध्ये बदल

नगर परिषदांसाठी २ ऐवजी २० डिसेंबरला मतदान राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय बारामती, मंगळवेढ्यासह अनेक नगर

पुण्यातील पंचतारांकीत हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलिसांची धावपळ, कॉल करणारा जेरबंद

पुणे : कोरेगाव पार्कमधील एका प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर शुक्रवारी