Pune Airport Blast Threat : अज्ञाताकडून पुणे विमानतळावरील विमाने उडवण्याची धमकी; शहरात भीतीचे वातावरण!

पुणे : राज्यभरातील सर्व विमानतळांवर विमानात बॉम्ब ठेवल्याची तसेच विमाने उडवण्याची धमकी (Bomb threat) देणारे प्रकरण सातत्याने वाढत चालले आहे. दोन दिवसांपूर्वी दहशतवादी पन्नूने एअर इंडियाची विमाने उडवण्याची धमकी दिली होती. या धमक्यांमुळे हवाई वाहतूक विभाग, विमानतळे आणि भारतीय गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. अशातच आता एका अज्ञाताकडून पुणे विमानतळावरील विमाने उडवण्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


पुण्यातील विमान क्षेत्रात नामांकित असलेल्या कंपनीच्या मॅनेजरला एक मेल आणि एक्स पोस्टद्वारे विविध ठिकाणी निघालेले ११ विमाने उडवण्याची धमकी दिली. दिल्ली ते पुणे आणि पुणे ते कलकत्ता यासह वेगवेगळ्या शहरात निघालेल्या विमानात बॉम्ब असून बॉम्ब थोड्याच वेळात ब्लास्ट होणार अशी धमकी अज्ञाताने दिली.


दरम्यान, या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात विमानतळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून कडक तपास केला जात आहे.

Comments
Add Comment

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर

Congress: काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर, नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचले, बैठकीत नेमकं घडलं काय?

दिल्ली: चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातील राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ