Pune Airport Blast Threat : अज्ञाताकडून पुणे विमानतळावरील विमाने उडवण्याची धमकी; शहरात भीतीचे वातावरण!

  128

पुणे : राज्यभरातील सर्व विमानतळांवर विमानात बॉम्ब ठेवल्याची तसेच विमाने उडवण्याची धमकी (Bomb threat) देणारे प्रकरण सातत्याने वाढत चालले आहे. दोन दिवसांपूर्वी दहशतवादी पन्नूने एअर इंडियाची विमाने उडवण्याची धमकी दिली होती. या धमक्यांमुळे हवाई वाहतूक विभाग, विमानतळे आणि भारतीय गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. अशातच आता एका अज्ञाताकडून पुणे विमानतळावरील विमाने उडवण्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


पुण्यातील विमान क्षेत्रात नामांकित असलेल्या कंपनीच्या मॅनेजरला एक मेल आणि एक्स पोस्टद्वारे विविध ठिकाणी निघालेले ११ विमाने उडवण्याची धमकी दिली. दिल्ली ते पुणे आणि पुणे ते कलकत्ता यासह वेगवेगळ्या शहरात निघालेल्या विमानात बॉम्ब असून बॉम्ब थोड्याच वेळात ब्लास्ट होणार अशी धमकी अज्ञाताने दिली.


दरम्यान, या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात विमानतळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून कडक तपास केला जात आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या