मुख्यमंत्री एकनाथ शिंदेविरुद्ध शिवसेनेकडून केदार दिघे मैदानात, कोण आहेत केदार दिघे?

मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेच्या(uddhav thackeray) शिवसेना(shivsena) गटाने ६५ जागांवर उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत ठाण्याच्या कोपरी-पाचपाखाडी जागेवरून केदार दिघे यांना शिवसेनेने तिकीट दिले आहे. ही महाराष्ट्राची हॉट सीट आहे कारण येथून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले आहेत.



कोण आहेत केदार दिघे?


केदार दिघे हे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे नातेवाईक आहेत. आनंद दिघे यांना एकनाथ शिंदे यांचे राजकारणातील गुरू मानले जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने जेव्हा मंगळवारी २२ ऑक्टोबरला आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली होती त्यात लिहिले होते की 'हिंदूहृदय सम्राट आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय आनंद दिघे साहेब यांच्या आशिर्वादाने शिवसेना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४साठी उमेदवारांची यादी जाहीर करत आहे'.


आनंद दिघे यांच्याच मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे यांनी राजकारणात आपली पकड मजबूत केली होती. आनंद दिघे हे शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते. बाळासाहेब ठाकरे यांनी ठाण्यामध्ये पक्ष मजबूत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती आणि त्यांनी ती निभावलीही होती. आता दिघेंचे नातेवाईक शिवसेनेकडून मैदानात उतरल्याने येथील चुरस अधिक रंगतदार झाली आहे.


उद्धव ठाकरे यांच्या गटाने बुधवारी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांना वरळी मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. तर ठाणे येथून राजन विचारे यांना तिकीट देण्यात आले आहे. वरूण सरदेसाई यांना बाबा सिद्दीकी यांचा मुलगा जिशान सिद्दीकी यांच्याविरुद्ध वांद्रे पूर्व येथून उमेदवारी देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे