मुख्यमंत्री एकनाथ शिंदेविरुद्ध शिवसेनेकडून केदार दिघे मैदानात, कोण आहेत केदार दिघे?

मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेच्या(uddhav thackeray) शिवसेना(shivsena) गटाने ६५ जागांवर उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत ठाण्याच्या कोपरी-पाचपाखाडी जागेवरून केदार दिघे यांना शिवसेनेने तिकीट दिले आहे. ही महाराष्ट्राची हॉट सीट आहे कारण येथून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले आहेत.



कोण आहेत केदार दिघे?


केदार दिघे हे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे नातेवाईक आहेत. आनंद दिघे यांना एकनाथ शिंदे यांचे राजकारणातील गुरू मानले जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने जेव्हा मंगळवारी २२ ऑक्टोबरला आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली होती त्यात लिहिले होते की 'हिंदूहृदय सम्राट आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय आनंद दिघे साहेब यांच्या आशिर्वादाने शिवसेना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४साठी उमेदवारांची यादी जाहीर करत आहे'.


आनंद दिघे यांच्याच मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे यांनी राजकारणात आपली पकड मजबूत केली होती. आनंद दिघे हे शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते. बाळासाहेब ठाकरे यांनी ठाण्यामध्ये पक्ष मजबूत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती आणि त्यांनी ती निभावलीही होती. आता दिघेंचे नातेवाईक शिवसेनेकडून मैदानात उतरल्याने येथील चुरस अधिक रंगतदार झाली आहे.


उद्धव ठाकरे यांच्या गटाने बुधवारी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांना वरळी मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. तर ठाणे येथून राजन विचारे यांना तिकीट देण्यात आले आहे. वरूण सरदेसाई यांना बाबा सिद्दीकी यांचा मुलगा जिशान सिद्दीकी यांच्याविरुद्ध वांद्रे पूर्व येथून उमेदवारी देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे